महाबळेश्वर तालुक्यात सत्तेचा माज संपणार! जनतेचा आवाज बुलंद होणार!
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

महाबळेश्वर तालुक्यात सत्तेचा माज संपणार! जनतेचा आवाज बुलंद होणार!

संविधानप्रेमी, दिलदार आणि संघर्षातून घडलेली नेतृत्त्वाची ओळख असलेल्या पूनम गोळे यांनी भिलार गणात उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेना एकनाथ शिंदे गटाची ताकद आणि निलेश गोळे यांचे संघटन कौशल्य यामुळे भिलार गणात एकमुखी पाठिंबा उभा राहिला असून प्रतिस्पर्ध्यांचे धाबे दणाणले आहेत.
काही मोजक्या लोकांच्या हातात सत्ता ठेवून उद्घाटनांचे नारळ फोडणे म्हणजे विकास नाही!
चार महिन्यात रस्ता खराब होतो, रोजगार नाही, शेतकरी कर्जबाजारी, मुलांचे शिक्षण कुचकामी अवस्थेत — हा विकास कुणासाठी?
मतदार म्हणजे गुलाम नाही!
दबाव, धमकी, दादागिरी यांना आता थारा नाही.
प्रत्येक मत अमूल्य आहे आणि मतदाराला पर्याय देण्यासाठीच पूनम गोळे मैदानात उतरल्या आहेत.
भिलार गण म्हणजे एखाद्या एक-दोन व्यक्तींची जहागिरी नाही —
हा संपूर्ण तालुक्याचा श्वास आहे!
शेतकऱ्यांच्या सोसायट्या स्वतःच्या फायद्यासाठी वापरणे म्हणजे विकास नव्हे,
तो मतदारांचा घोर अपमान आहे!
आता निर्णय स्पष्ट आहे
विकासाच्या नावाखाली फसवणूक नको
महिलांचे आक्रमक, निर्भीड नेतृत्व हवे
संविधान, सन्मान आणि स्वाभिमान हवा
भिलार गणात परिवर्तन अटळ आहे!




