पडळ:-सर्वांच्या प्रयत्नातून पडळ येथील खटाव -माण साखर कारखाना नावारूपास आणावा – आ.मनोज घोरपडे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके राष्ट्रीय संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सर्वांच्या प्रयत्नातून पडळ येथील खटाव -माण साखर कारखाना नावारूपास आणावा – आ.मनोज घोरपडे.

यावर्षी पाऊस काळ चांगला झाला आहे. त्यामुळे ऊसाचे उत्पन्न गतिवर्षीपेक्षा अधिक होईल त्यामुळे कारखान्याने दहा लाख मे.टना चे उद्दिष्ट धरून काम करावे. परिसरातील विविध पाणी योजना व चांगल्या पावसामुळे येणाऱ्या काल हा कारखान्यासाठी सुवर्णकाळ असणार असून सर्वांनी अथक प्रयत्न करून कारखाना नावारुपास आणावा असे आवाहन खटाव -माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड, पडळ कारखान्याचे को चेअरमन आमदार मनोज दादा घोरपडे यांनी केले .
खटाव -माण तालुका ऍग्रो प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड, पडळ या कारखान्याच्या सातव्या गळीत हंगाम व रोलर पूजन प्रसंगी कारखाना स्थळावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . सदर वेळी कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे ,संचालक प्रीती घार्गे -पाटील, महेश घार्गे,विक्रम घोरपडे जनरल मॅनेजर काकासाहेब महाडिक कारखान्याचे सर्व संचालक पदाधिकारी कामगार वर्ग व शेतकरी उपस्थित होते.
आमदार मनोज दादा घोरपडे पुढे म्हणाले ,गेल्या सात वर्षापूर्वी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारखान्याची उभारणी केली भूमिपूजना वेळी अनेकांनी विविध शंका निर्माण केल्या. मात्र कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या अतिशय कडक शिस्त व योग्य आर्थिक नियोजन तसेच, कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यांनी टेकनिकल बाबतीत केलेली कारखान्याच्या प्रोजेक्टची उभारणी यामुळे अतिशय ताकतीने प्रयत्न केल्यामुळे कारखाना नावारुपास आला .या कारखान्यातील एकाही शेतकऱ्याचे देणे बाकी नसून त्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्यावर हेलपाटे घालावे लागले नाहीत .तर मुदतीपूर्वी व गरजेवेळी शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेत देणारा हा कारखाना जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाने कार्यरत आहे.
कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे म्हणाले, हा कारखान्याचा सातवा गळीत असून प्रत्येक हंगामामध्ये कारखान्याच्या गाळण क्षमतेमध्ये वाढ होत आहे . यावर्षी पाऊस काळ चांगला झाल्यामुळे यावर्षीचा हंगाम हा बंपर हंगाम आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन चांगले मिळेल त्यासाठी हा सीजन कारखान्यासाठी आव्हान असणार आहे.यावर्षी साडेनऊ हजार मीटर गाळप करण्याचा कारखान्याने संकल्प केला असून यंदा उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याने हा संकल्प पूर्ण करण्यात अडचण येणार नाही.
कारखान्याच्या संचालिका प्रीतीताई घार्गे -पाटील म्हणाल्या,सातत्याने या कारखान्याचा शेती विभाग अत्यंत कार्यक्षमतेने काम करत असल्यामुळे कारखान्याच्या गाळपक्षमते मध्ये प्रतिवर्षी वाढ होत आहे. कारखान्याने शेतकरी व सर्व कर्मचारी यांची सर्व देणी पूर्ण केली असून त्याबाबत कोणाही शेतकऱ्यांची तक्रार नाही. यावर्षीचा सिझन सगळ्यांनी एकजुटीने प्रयत्न करून विक्रमी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.