खटाव:-किल्ले भूषणगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
किल्ले भूषणगड येथे शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न.
खटाव तालुक्यातील किल्ले श्री भूषणगड येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, खटाव माण व टीम भूषणगड च्या माध्यमातून ९ जून २०२५ रोजी शिवशक तिथीनुसार जेष्ठ शुद्ध त्रयोदशी हिंदू साम्राज्य दिन अर्थात शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
शिवराज्याभिषेक दिन म्हणजे फक्त एक सोहळा नाही हा तर एक रयतेचा आनंदोत्सव आहे. उत्सव आहे सर्वभौमत्वाचा, राष्ट्र, स्वराज्य आणि स्वाभिमानाची धगधगती ज्वाला उरी ठेऊन लोकंकल्याण राजासाठी साठी प्राणांची बाजी लावलेल्या तमाम मावळ्यांचा आणि रयतेचा एक स्वप्नपूर्तीचा दिवस. साक्षात एक सुवर्णक्षणचं. यां दिवशी एक हिंदू राजा समस्त पातशाह्यांना पायाखाली रोंदत स्वतंत्र अभिशिक्त छत्रपती झाला. छत्रपती झाला हिंदवी स्वराज्याचा. छत्रपती झाला समद्या रयतेचा. हे सर्व होण्यासाठी माझ्या राजानं आणि समद्या निष्ठावंत मराठा मावळ्यांनी कितीतरी अगणित संकटे झेलत, जिव धोक्यात घालून, काट्याकुट्यांची वाट चालत यां पारतंत्राच्या अग्निपथातून हे स्वातंत्र्य समद्या रयतेला मिळवून दिलं. त्याचाच हा सुवर्ण सोहळा म्हणजेच शिवछत्रपती राज्याभिषेक दिन होय.
या सोहळ्यास सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वंशज श्री. सयाजी नामदेव गुजर वंशज भोसरे, तसेच वडगाव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज, वेताळ भक्त दादा महाराज गोरेगाव वांगी,कदमवाडीचे रमेश महाराज , धारकरी आमदार श्री मनोज दादा घोरपडे कराड उत्तर, रॉयल कारभार ग्रुप अध्यक्ष मा सौरभ दादा जाधव, रॉयल कारभार ग्रुप संपर्क प्रमुख सुरज दादा पाटोळे, श्रीकांत पिसाळ,अनिल पिसाळ, धोंडीराम जगताप, सुधीर माने,यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. संपूर्ण दिवसभर जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणा, फटाक्यांची आतीषबाजी, हलगी, तुतारी, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक, देशभक्तीपर गीते, श्लोक यांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला. या कार्यक्रमाच्या निमिताने संपूर्ण गडाची स्वच्छता, सुशोभीकरण करण्यात आले होते.
गडावर आदल्या दिवशी पासूनच शिवभक्तांची उपस्थिती होती. आदल्या दिवशी रात्री आई हरणाई देवीचा गोंधळ घालण्यात आला, रात्री गडावर मशालोतस्व साजरा करून गड जगता ठेवला गेला.
सत्कार समारंभ व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वर्षीचं नव्हे तर दरवर्षीच याही पेक्षा मोठ्या स्वरूपात जास्त उत्साहाने शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान खटाव व टीम भुषणगड यांच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवव्याख्याते गुरुराज रसाळ याचे व्याख्यान झाले, वडुज ब्लड बँक यांचे कडून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आली होती.
यवेळी आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले आज शिवराज्याभिषेक सोहळ्यास मला आमदार म्हणून उपस्थित रहाता आले,हे आपल्या सर्वांनाच्या आमदार झालो, धर्मसत्ता व राजसत्ता एकत्र आली की इतिहास घडतो,जे या गडकिल्ल्यांच्या बाबतीत ज्या मागण्या आपण केल्या आहेत त्या येणाऱ्या काही दिवसात मंजूर करून देतो असे शब्द आज छत्रपतींच्या शिवराज्याभिषेक सोहळा दिवशी देतो,हितून पुढे तुमचा हिंदूत्वादी आमदार तुमच्या सर्व आडचणीवर विधानसभेत आवाज उठवताना तुम्हाला दिसेल,मला या ठिकाणी बोलवत त्या बद्दल सर्वांचे आभार, आणि शिवराज्याभिषेक सोहळाच्या सर्वांना शुभेच्छा.
प्रास्ताविक नितीन कुलकर्णी व आभार मानसिंग कदम यांनी मानले.