महाबळेश्वर:-पारुट गावचा कुमार प्रसाद जाधव उर्फ बंटी झाला PHD डॉक्टरेट – आईच्या डोळ्यातून आले आनंदाचे अश्रू.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पारुट गावचा कुमार प्रसाद जाधव उर्फ बंटी झाला PHD डॉक्टरेट – आईच्या डोळ्यातून आले आनंदाचे अश्रू.
पारूट गावचे रहिवासी श्री.अनंत गणपत जाधव ( गुरुजी ) याचे मोठे सुपुत्र कुमार प्रसाद जाधव याने PHD मिळवून डॉक्टर झाले आणि आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले..
मंडळी ज्या गावात साधी प्राथमिक शाळा देखील नव्हती त्या गावात प्रसाद चे वडील शिक्षक असल्यामुळे १९९० मध्ये प्राथमिक शाळा सुरू झाली आणि त्याच शाळेत प्राथमिक शिक्षण घेत प्रसाद ने जीवनाची वाटचाल सुरू केली.
गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुढील शिक्षण महाबळेश्वर मध्ये सुरू केले त्यावेळी फार हलाकीचा काळ होता दळणवळणाची नीट सोय देखील नव्हती..ना कोणती एस टी बस ..रोज उठून मांघर गोल पर्यंत पायी चालत जाऊन तापोळा वरून येणारी एस टी पकडायची आणि मग त्या गर्दीत शाळेत जायचे आणि परत येताना देखील तोच त्रास आसायचा हे सर्व हाल त्याची आई बघत असायची..
पण मंडळी आई ही आई असते तिला आपल्या लेकराची काळजी असते आणि त्या काळजी पोटी प्रसाद ची आई सौ.ललिता जाधव मुला बरोबर रोज जायच्या आणि मुलगा शाळेतून सुटे पर्यंत एस टी स्टँड वर बसून राहायच्या आणि संध्याकाळी पुन्हा आपल्या मुलाला त्या गर्दीतून घेऊन परत यायचा शेवटी आईच ती आपल्या मुलाच्या भल्या साठी काही करायची तिची तयारी असतेच तेच या माऊलीने केले आणि मुलाला माध्यमिक शिक्षण महाबळेश्वर मध्ये शिकवले.
मनात जिद्द आणि चिकाटी सोबत मेहनत करायची तयारी असली की यश खेचून आणता येते हेच ध्येय प्रसाद ने निश्चित केले आणि पुढील शिक्षण यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेज सातारा या ठिकाणी केले तर अभियांत्रिकी शिक्षण कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज सातारा येथे पूर्ण झाले पुढे पदवी चे शिक्षण संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी पूर्ण करत प्रसाद जाधव ने पुणे या ठिकाणी मराठवाडा मित्र मंडळाचे अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी प्राध्यापक म्हणून नोकरीस सुरवात केली..
जीवनात काहीतरी करायची इच्छा असते ना तेव्हा आपले मन स्वस्थ बसू देत नाही याचे उदाहरण म्हणजे नोकरी करत असताना प्रसाद जाधव च्या मनात PHD करण्याचा विचार आला आणि त्यांनी ठरवले की PHD करायची…मित्रानो जीवनात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे प्रसाद जाधव ने ठरवले आणि भारतातील नामांकित युनिव्हसिर्टी वेल्लोर चेन्नई या ठिकाणी प्रवेश घेतला…
त्यानंतर प्रसाद जाधव चे अनेक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले आणि प्रसाद ने घेतलेला निर्णय बरोबर होता हे त्याच्या प्रयत्नांनी दाखवून दिले व त्याला विद्यापीठाकडून नुकतीच PHD डॉक्टरेट ही पदवी जाहीर करण्यात आली. ही कुमार प्रसाद जाधव याच्या जीवनातील फार मोठी अचिवमेंट होती तर त्याच्या कुटुंबीयांसाठी गर्व होता.. कारण मंडळी संतांनी सांगितलेच आहे..
शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी
मुलगा PHD करत डॉक्टरेट झाला आणि आईच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले तिच्या जीवनाचे सार्थक झाले कारण मुलासाठी मुलगा शाळेतून सुटे पर्यंत तिने एस टी स्टँड वर बसून दिवस काढले होते..
माझी तरुण मुला आणि मुलींना विनंती आहे तुमच्या आई बापाला तुमच्या कडून काय आपेक्षा आहेत त्यांची एकच अपेक्षा आहे आम्ही कष्ट करतो आहे तुम्ही शिकून मोठे व्हा…आम्हाला नाही जमले पण तुमच्या नशिबाने आहे त्याचा फायदा घ्या शिका आणि मोठे व्हा..
कधी कधी संस्कार.. संगत..आजूबाजूचे वातावरण..घराणेशाही ह्या गोष्टी मुलांना पुढे नेत्यात मदत करतात कारण त्या त्या मुला / मुली समोर तो आदर्श असतो आणि कुमार प्रसाद जाधव याच्या समोर तसा आदर्श होता कारण वडील श्री.अनंत गणपत जाधव हे पेशाने शिक्षक होते तर प्रसाद जाधव चे मामा प्रसिद्ध व्यापारी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असणारे श्री.सीताराम कोंडीबा भोसले – तापोळा याचा भाचा आणि त्यामुळे संस्काराची शिदोरी मजबूत होती प्रसाद जवळ…यांचं जोरावर प्रसाद ने खूप मेहनत घेतली आणि जाधव व भोसले दोन्ही कुटुंबाचे नावलौकीक केले…
मंडळी एका खेडेगावातील तरुण मुलगा ज्या गावात धुक्याची फक्त चादर पाहायला मिळते…ना व्यवस्थित गाडी घोडे ना नीट लाईट तरीही एवढा संघर्ष करून प्रसाद जाधव सारखा मुलगा PHD करतो आणि समाजातील अनेक मुलांना आदर्श निर्माण करतो ही खूप मोठी कामगिरी आहे आणि एवढेच नाही तर मंडळी या प्रसाद जाधव ने मिळवलेल्या यशाबद्दल राजकीय क्षेत्रातील लोकांनी देखील प्रसाद चे कौतुक केले..सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती श्री.उदयनराजे भोसले,रायगड जिल्ह्याचे खासदार
मा.श्री.श्रीरंग अप्पा बारणे,महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री ना.श्री.मकरंद (आबा) जाधव पाटील या सर्व मान्यवरांनी कुमार प्रसाद जाधव याचे अभिनंदन केले.
जीवनात वेळ सर्वांची येते कारण जेव्हा चढ लागतो त्याच्या नंतर उतार हा असतोच…पण घाई करू नका संयम ठेवा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता ठेवा.. घेतलेला निर्णय बरोबरच कसा होता हे आपल्या मेहनतीतून आणि कर्तुत्वाने समाजाला दाखवा…आणि मग जीवनात काहीतरी केले त्याचा आनंद साजरा करा.
डॉ.कुमार प्रसाद जाधव ( PHD ) तुझे पुन्हा पुन्हा खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा तू केलेल्या संघर्षाची जाणीव ठेवत समाजाची देखील निस्वार्थी सेवा तुझ्या हातून घडावी हीच अपेक्षा.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
धन्यवाद…….✍🏻✍🏻
उत्तम भालेराव
( सामाजिक कार्यकर्ते – पत्रकार )