ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आईला पाहून तिचा अश्रूचा बांध फुटला

प्रतिनिधि :- रईस शेख सातारा

आईला पाहुन तिचा अंश्रुचा बांध फुटला.

महिला म्हटंल की आज ही तिच्या असाह्यतेचा फायदा उठवला जाताे .एकादी महिला तिच्या घरगुती अडचणी मुळे घर साेडते कुठे जायचे काय कारायचे कशाचेच भान नसते तिला आणि समाज्यातिल काही नालायक असाह्यतेचा फायदा घेत तिला नकाे तसा त्रास देतात.

रात्री 11 वाजता पाेलिस एका 35 वर्षाच्या तरुण मुलीला घेऊन आले.तिला साधे उभा हि राहता येत नव्हतं पाेलिसांना विचारं तर ती दारु प्यायली आहे.असे सांगितले.ती म्हणत हाेती माझं मुलं हरवलं आहे.

तिच्याकडे पाहुन मला आेशाळल्यागत झाले.तिला शुध्दचं नव्हती कपडे सावरता येत नव्हते.ति स्वताशीच बाेलत हाेती.तिला समजावत जेवायला घातले.आणि स्वतंत्र रुम मध्ये झाेपायला दिले.

सकाळी तिची चाैकशी केली.माझं मुल हरवलं आहे.त्याला शाेधा हाे फार लहान आहे.पाेलिसांना फाेन केला तर पाेलिसांची शाेधा शाेध सुरु हाेती.मुलाच्या विचारानं ती व्याकुळ झाली हाेती.तीला समजावले.

तिला विचारले काय झाले.दादा नवरा एक महिन्या पुर्वी मेला मला एक 4 वर्षाचा मुलगा आहे.नवरा गेल्याच्या दुखांनं अवस्था फार वाईट झाली आहे.

दाेन दिवसा पुर्वी काेनालाच न सांगता मी मुलाला घेऊन घरातुन बाहेर पडले कुठे चाललाेय काय समजत नव्हते.एका पुला खाली बसले कुणी तरी खायला देत हाेते. मला काेल्ड्रीक्स मधुन काेणीतरी दारु पाजली.त्या पुढचं काहीच आठवत नाही काय झाले ते.

माझ्या साेबत माझा मुलगा हाेता.ताे कुठंय समजेना भितीने तिचे हात थरथरत हाेते.तिला जमजावले नातेवाईकाची माहिती घेतली.पंरतु त्या माहितीच्या आधारावती नातेवाईक यांचे पर्यत्न पाेहचता येईना.मुलाच्या काळजीने तिचे अंश्रु काही थांबेनात.

तिला समजावले.चाैकशी करता करता बराच वेळ झाला
पण तिच्यानातेवाई यांचे पर्यत्न पाेहचता येईना दुपारचे 3 वाजले हतबल झालाे .

पण 4 वाजता पाेलिसांचा फाेन आला रवि मुलगा आणि नातेवाईक दाेन्ही सापडलेत.माझा जिवातजिव आला आता तिचं मुल तिला भेटणार हाेते.आणि ती घरि जाणार हाेती.हे समाधान फार माेठे हाेते.

5 वाजण्याच्या सुमारास तिचा भाऊ , आई व इतर 15 नातेवाईक आश्रमात पाेहचले आईला भावाला पाहताच तिचा अंश्रुचा बांध फुटला मुलाला छातीला कवठाळत गच्च मिठी मारली.ती बराच वेळ त्या बाळाला बिलगुन रडत हाेती.तिच्या डाेळ्यातुन आंनद अंश्रु वाहत हाेते.

आम्ही मात्र फक्त तिच्या कडे पाहत हाेताे माय लेकराची आणि नातेवाईकाची परत झालेली भेटीचा प्रसंग अगदी चित्रपटला शाेभेल असा हाेता.मी आश्रमातील कागपत्राची पुर्तेता केली.आणि त्याना जाण्याची परवानगी दिली.जाताना त्या तरुण महिल्याच्या चेहर्‍यावरती समाधान हाेतं.परत घर साेडुन नकाे हे मात्र तिला बजावलं

पण ती तरुण महिला गेल्यानंतर मनात काहुर माजले आजही समाज्यात महिला सुरक्षीत आहेत का प्रत्येक स्त्री च्या असाह्यतेचा फायदा समाज्यातील लाेक का घेत आहेत.तिला दारु पाजण्या पर्यत्न मजल गेली.हर वेळीच पाेलिस पाेहचंले नसते तर काय झालं असते.

अगदी आपल्या घरातील आई,बहिनी प्रमाणे विचार केला तर काेनत्याच असाह्य महिले वरती आत्याचार हाेणार नाहीत.आणि प्रत्येक महिलेला सुरक्षीत वाटेल.

आज समाज्याने दृष्टिकाेन बदलला पाहिजे महिलांना ही सन्माने जगण्याचा अधिकार आहे.त्याना जगु द्या .प्रत्येक वेळी महिला हि उपभाेगाची वस्तु ह्या भावनेने तिच्या कडे पाहणे चुकिचे आहे

आज यशाेधन च्या माध्यमातुन या असाह्य महिलांना मदत करतना फार दु:ख हाेते.देवा कधीच काेनत्याही ताई,माई वरती अशी वाईट वेळ येवु नये.ती सन्माना ने तिच्या आई आणि भावासाेबत घरि गेली.फार समाधान वाटले कारण

माणुसकी अजुन जिंवत आहे

रवि बाेडके
गजानंत विहार
यशाेधन ट्रस्ट वेळे वाई जि.सातारा
9922424236 ,9921482223

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button