कराड:-नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीच शासन आपल्या दारी उपक्रम :- धैर्यशील कदम.
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष:-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष:-9623714741
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठीच शासन आपल्या दारी उपक्रम :- धैर्यशील कदम.
‘शासन आपल्या दारी’ हा ऐतिहासिक प्रकारचा हा उपक्रम आहे. दीड कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी या उपक्रमात लाभ घेतला आहे. या उपक्रमांद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राज्यातील सात ते आठ कोटी तर सातारा जिल्ह्यातील वीस लाख नागरिकांना या उपक्रमांतर्गत लाभ मिळेल,असा विश्वास भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी व्यक्त केला.
नवीन कृष्णाबाई मंगल कार्यालय कराड येते भारतीय जनता पार्टी कराड शहर आणि अजय पावसकर मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या कार्यक्रमात धैर्यशील कदम बोलत होते. भाजपा सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी अतुल भोसले,कराड नगरपालिकेचे जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर,कराड शहर भाजपा अध्यक्ष एकनाथ बागडी आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना कदम पुढे म्हणाले,शासन आपल्या दारी उपक्रमात जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत असून शासन मार्गदर्शनानुसार राज्यभरात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्या योजना लोकांच्या घरापर्यंत नेण्याचे काम शासनाने केले आहे शेतकऱ्याला केवळ एक रुपयात पीक विमा सुविधा दिली आहे, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना,लेक लाडकी, महात्मा फुले जीवदायी योजना या योजना जनसामान्यांमध्ये लोकप्रिय होत आहेत राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने अंगणवाडी सेविकांच्या मानधन, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये वाढ केली आहे.
महाराष्ट्र शासनाने जनसामान्यांसाठी राबविलेले विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे पात्र असणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी अतुल बाबा भोसले, विनायक पावसकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयोजक अजय पावसकर यांनी केले तर आभार एकनाथ बागडी यांनी मानले यावेळी कराड शहर व परिसरातील लाभार्थी तसेच भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.