
असाही एक विवाह मायणी प्रतिनिधी____सध्याच्या धावपळीच्या युगात मुले आई वडीलांना सांभाळत नाहीत त्यांना किंमत देत नाहीत त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते परंतु येथील राजाराम, दादासाहेब या दोन बंधूनी आपल्या वडिलांचा लग्नाचा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करून एक आदर्श विवाह घडवून आणला याबाबत अधिक माहिती अशी की धनगर समाजातील गरीब कुटुंबातील कार्यकर्ते विलास सखाराम कचरे व सौ विमल विलास कचरे यांच्या 45 वाढदिवस यानिमित्ताने त्यांचा विवाह घडवून आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याचा या दोन बंधूंनी प्रयत्न केला आहे यावेळी बोलताना राजाराम कचरे यांनी सांगितले की माझ्या वडिलांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती माझे वडील दुसऱ्याकडे चाकरी करीत होते आई दुसऱ्याच्या शेतात काम करायची पण आमच्या वरची त माया कधीच कमी केली नाही शिवाय माझी आई दुसऱ्याला नेहमी मदत करायची या आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्ही त्यांचा विवाह घडवून आणला या विवाह सोहळ्यास त्यांचे नातेवाईक मामा पत्रकार हितचिंतक डॉक्टर मकरंद तोरो राजेंद्र मोहित मुन्शी तबिब तसेच सुना नातवंडे मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री विलास कचरे व सौ विमल कचरे यांनी उपस्थितांना आशीर्वाद दिले