फलटण:-दुधीबावी गावात प्रवाशांना मिळाला आपत्ती व्यवस्थापनाने दिलासा…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
दुधीबावी गावात प्रवाशांना मिळाला आपत्ती व्यवस्थापनाने दिलासा…
फलटण दि: गेली आठवडाभर कोसळत असणाऱ्या अवकाळी पावसाने सातारा जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था काही ठिकाणी सुरळीत आहे तर काही रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. यामध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना फलटण तहसील कार्यालय व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने भोजन व निवासाची सोय करून दिलासा देण्यात आला.
दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण तालुक्यात पावसाळ्याच्या आगमनापूर्वीच अवकाळी पावसाने आपले अस्तित्व दाखवले.
फलटणमध्ये १६३.५ मि.मी.
इतका पाऊस झाला. सुरक्षितता व उपाययोजना करण्यासाठी तातडीने
एन.डी.आर.एफ.ची एक चमू
फलटणमध्ये दाखल झालेले आहेत.
काल दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओढे यांना पूर आला. काही ठिकाणी दहिवडीजी फलटण तसेच अन्य मार्गावरील रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली. यामध्ये पुढील प्रवासासाठी निघालेल्या ३० प्रवासी
नागरिकांची दुधेबावी गावाशेजारी तात्पुरत्या सोयीसुविधांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या चमकदार कामगिरीची दखल घ्यावी लागली.
वाहतूक पूर्णपणे बंद झाल्यामुळे भाडळे व दुधीबावी मार्गावर अडकून पडलेल्या प्रवाशांना स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व सामाजिक कार्यकर्ते यांनी मानवता भावनेतून सहकार्य केले. यामुळे प्रवाशांना चांगलाच दिलासा मिळाला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले.
सातारा जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत सर्व भागांमध्ये लक्ष ठेवून असून तातडीने मदत कार्य पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज झालेले आहे. अद्यापही काही ठिकाणी वाहतूक अडथळा निर्माण झाल्यामुळे इच्छा असूनही महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांना पंचनामे करण्यासाठी घटनास्थळी जाण्यास अडथळे येत आहेत. तरीही कोणीही नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील गाव कुसाच्या बाहेरील वाडी वस्तीमध्ये वाहतूक समस्या बिकट झाली असून नदी ओढे नाल्या शेजारी नागरी वस्तीमध्ये जाणे अशक्य झालेले आहे अशा ठिकाणी तातडीने मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य दखल घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष संजय गाडे, दलित सेनेचे प्रेमानंद जगताप- सायगावकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागासवर्गीय सेल सातारा जिल्हाध्यक्ष अमोल पाटोळे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश यांनी केली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
_______________________
फोटो – फलटण तालुक्यातील दुधी बावी येथील प्रवाशांना मदत करताना प्रशासन (छाया- निनाद जगताप दुधीबावी)