गोंदवले:-कोसळणाऱ्या पावसात मनसेने दुष्काळी भागात दाखवले धैर्य ….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कोसळणाऱ्या पावसात मनसेने दुष्काळी भागात दाखवले धैर्य ….
गोंदवले दि: सातारा जिल्ह्यात गेले आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण दैना उडवली आहे. दुष्काळी माण- खटाव तालुक्यात संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धैर्य दाखवून लोकांच्या मदतीला धावून आले. मनसेच्या या दिलसे कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत स्थानिक रहिवाशांनी माहिती दिली की, अवकाळी अचानक कोसळलेल्या पावसामुळे सर्वत्र महापुराचे स्वरूप आले आहे. दुष्काळी भागात डोंगररांगात पाऊस पडत असल्याने मानगंगा नदी तसेच ओढे, नाले, तलाव, बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर वाढल्याने थेट रस्ते व नागरी वस्तीमध्ये पाणी शिरून पावसाळ्यापूर्वीच चिखल, दलदल व जागोजागी पाण्याच्या प्रवाह होऊ लागलेली आहे.
या सर्व गोष्टींचा जाब विचारण्याची धमक व जिद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्याकडे आहे. परंतु, त्यांनी निवेदन देण्यापूर्वीच मनसे संकटासमयी धावून जाणारी संघटना आहे. हे सिद्ध करून दाखवले आहे. आज स्वतः रस्त्यात अडकलेली वाहने बाजूला काढून तसेच हातामध्ये फावडे घेऊन पाण्याचा प्रवाह वाहता ठेवण्यास मोलाची कामगिरी केलेली आहे. यासाठी त्यांना मनसे सैनिकांची खूप मोठी मदत झालेली आहे. या त्यांच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत होत आहे.
माण- खटाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये असलेले बंधारे, तलाव, विहिरी , शेत तळे भरून वाहत आहेत. काही ठिकाणी शेतजमीन खचून गेले असून बांध फुटल्याने सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे. लोकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे आपुलकीने वागणारी संघटना असा आता ब्रीदवाक्य झाले आहे. खरोखर मनसे म्हणजे खऱ्या अर्थाने संकटासमयी लोकांना दिलासा देणारी राजकीय शक्ती आहे. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक राजकीय पक्षाचे झेंडे दिसतील परंतु, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते धावून गेलेले आहेत. या त्यांच्या भूमिकेचं मनसेचे नेते राजसाहेब ठाकरे, बाळा नांदगावकर, कामगार आघाडीचे नारायण राणे, मितेश खाडे यांच्यासह मान्यवरांनीही कौतुक केले आहे.
माण तालुक्यातील लोकांच्या अडीअडचणीला मनसे संघटना धावून आल्यामुळे पुणे- मुंबई व ठाणे जिल्ह्यात वास्तविक करणाऱ्या माणवासियांना आपल्या घरातील मंडळी सुखरूप असल्याची भावना निर्माण झाली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
______________________________
फोटो मनसे पदाधिकारी अवकाळी पावसात मदत करताना (छाया– निनाद जगताप, गोंदवले)