खटाव:-मायणीच्या ग्रामपंचायती कडून स्वच्छ भारत अभियानचे तीनतेरा – चांदणी चौक परिसर स्वच्छतागृहाविना.
पत्रकार एकनाथ जाधव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार एकनाथ जाधव
RP STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मायणीच्या ग्रामपंचायती कडून स्वच्छ भारत अभियानचे तीनतेरा – चांदणी चौक परिसर स्वच्छतागृहाविना.
मायणी दि.५ :- प्रतिनिधी
मायणी , खटाव तालुक्यातील विकसनशील असे शहर व्यापारी बाजारपेठ, शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांचे भागात केंद्रीय स्थान बनू पाहत आहे. परंतु , मायणी गावातील मुख्य बाजारपेठेपेक्षा जास्त उलाढाल आणि महत्त्वपूर्ण बाबींसाठी ठळक स्थान बनलेल्या चांदणी चौकातील व्यापारी, ग्रामस्थ,महिला आणि विद्यार्थी वर्गाला वर्षानुवर्ष भेडसावणारा एकच प्रश्न आज अखेर सुटलेला पहावयास मिळत नाही तो म्हणजे “सार्वाजनिक स्वच्छतागृह”. याठिकाणी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मिशनचे तीनतेरा वाजले असून प्रवाशी व स्थानिकांची मोठी गैरसोय होत असलेली पहावयास मिळत आहे.
मल्हारपेठ – पंढरपूर व बेळगाव – मनमाड या दोन महामार्गाच्या क्रॉस मुळे तयार झालेला चांदणी चौक परिसर. आज येथील व्यापाराच्या आर्थिक उलाढालीचा मुख्य परिसर बनला आहे. याच परिसरात चारी बाजूस चौकाचे कोपरे बस थांबे बनले आहेत. शाळा, कॉलेज, दवाखाने, राष्ट्रीय बँक, पोलीस ठाणे यांमुळे दररोज हजारो लोकांची याठीकानाहून येजा होत असते. त्याचबरोबर मायणी चौकातील शेकडो व्यापारी आपल्या व्यवसायासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत याच ठिकाणी थांबलेले असतात.
याच चौकाच्या ठिकाणी राजकीय व्यासपीठावरून कोट्यवधी निधीच्या बाता झाल्या , बॅनर बाजी झाली पण या स्थानिक राज्यकर्त्यांना ” ग्रामीण भाषेतील ” मुतारी” बांधायची झाली नाही . ही शोकांतिका आहे .
प्रवासी तर व्यापाऱ्यांना दररोज प्रश्न विचारताना दिसतात . ” ते, नव्हं ,इथ मुतारी कुठे आहे. ” या प्रश्नांना त्यांना व्यापाऱ्यांकडून नेहमीच उत्तर मिळत. “खाली किलोमिटर वरील ओढ्यावर जावा नाहीतर कुठेतरी आडोसा धरा.”
मग तो प्रवासी स्थानिक राज्यकर्त्यांचे अस्सल गावरान भाषेत “कौतुक” करून आडोसा शोधतो .
हा झाला प्रश्न पुरुष मंडळींचा. परंतु खरी गैरसोय महिला वर्गाची होताना दिसत आहे. आज गावाच्या प्रथम नागरिक पदावर महिला विराजमान असतानाही महिलांच्या या प्रश्नांकडे त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे लक्ष न जावे. हे तर नवलच आहे.
मुख्य गावातील स्वच्छतागृहांची दशा दिखव्यापूर्तीच राहिली असताना . प्राथमिक गरजेच्या सुविधा देताना मायणी ग्रामपंचायत चांदणी चौक परिसरात कुचकामी ठरतं असल्याचे दिसून येत आहे . चौकातील कोपऱ्यात घोळक्याने लाखोकोटिंच्या कामाचे बॅनर लावून बाता मारणारे गावकारभारी कमीत कमी किमतीचे “मोबाईल टॉयलेट” तरी प्रवासी, महिला वर्ग व स्थानिक व्यापारी यांच्यासाठी बसवतात का ते आता बघावं लागेल?