सातारा:-सातारा – रत्नागिरी रूटवर जुनी बस सोडल्यास खबरदार सुहास राजेशिर्के यांचा सातारा आगाराला इशारा.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष
सातारा रत्नागिरी रूटवर जुनी बस सोडल्यास खबरदार सुहास राजेशिर्के यांचा सातारा आगाराला इशारा.
सातारा दिनांक 14 प्रतिनिधी
उन्हाळी सुट्ट्या आणि आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर सातारा रत्नागिरी ही बंद पडलेली बस सातारा आगारातर्फे पुन्हा 17 मार्चपासून सुरू करण्यात येत आहे .सातारा आगाराला दहा लाख रुपयांचे उत्पन्न देणाऱ्या या मार्गावर तांत्रिकदृष्ट्या नादुरुस्त अथवा जुनी बस सोडल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिला आहे .
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी या प्रश्नासंदर्भात तातडीने लक्ष घालून हा प्रश्न सोडवावा अशी मागणी त्यांनी केली आहे .सातारा जिल्ह्यामध्ये कोकणातून येऊन स्थायिक झालेल्या कोकण बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे सातारा शहराच्या पश्चिम भागामध्ये ही संख्या लक्षणीय आहे .कोविड नंतरच्या काळामध्ये कुणबी समाज संघ सातारा यांच्या मागणीप्रमाणे सातारा आगाराचे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी सातारा रत्नागिरी गाडी नियमितपणे सुरू केली होती . मात्र या मार्गासाठी नवीन बस उपलब्ध नसल्याने जुन्या नादुरुस्त गाड्यांवर हा रूट सुरू ठेवण्याची नामुष्की सातारा आगारावर ओढवली होती .
सुहास राजेशिर्के व कुणबी समाज संघ सातारा व दिलीप गायकवाड यांचा सातारा आगाराच्या गाडीसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता . साधारण तीन महिन्यापूर्वी सातारा आगाराने कुणबी समाज संघाच्या मागणीची दखल घेऊन सातारा रत्नागिरी गाडी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू केली होती मात्र हवेत धूर सोडणे वारंवार गाडी बंद पडणे गाडीचा पाटा तुटणे यामुळे प्रवासी आणि वाहक यांच्यामध्ये वारंवार वादावादीचे प्रसंग घडत होते किमान 15 दिवस कशीबशी सुरू असलेली सातारा रत्नागिरी बस सेवा नवीन गाड्यांच्या अभावामुळे पुन्हा बंद पडली . सुहास राजेशिर्के व कुणबी सातारा समाज व दिलीप गायकवाड यांच्या वतीने पुन्हा झालेल्या पाठपुराव्यामुळे विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी सातारा रत्नागिरी गाडी पुन्हा दि १७ मार्च पासून सुरू करण्याचे आदेश दिले आहेत तसेच या बससाठी आगाऊ नोंदणीची सुविधा सुध्दा उपलब्ध झाली आहे
मात्र यावेळी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची सातारा आगाराने नादुरुस्त गाड्या पाठवून जर चेष्टा केली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल असा इशारा सुहास राजेशिर्के यांनी दिला आहे . शिवाई ईबसे मुंबई पुण्याला मिळतात मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असलेल्या साताऱ्याला मात्र मिळू शकत नाही हे दुर्दैव आहे . पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने दळणवळणाच्या या गंभीर प्रश्नांमध्ये तातडीने लक्ष घालावे अशी मागणी राजेशिर्के यांची आहे .आगामी उन्हाळी सुट्ट्या तसेच होळीच्या सणासाठी साताऱ्यातील कोकणस्थ बांधवांना जाण्यासाठी सातारा रत्नागिरी ही बस 17 तारखेपासून सुरू होणार आहे मात्र ती बस नवी आणि व्यवस्थित असावी अशी प्रवाशांची अपेक्षा आहे सातारा आगाराच्या विभाग नियंत्रकांनी यासंदर्भात नवीन बस उपलब्ध करून द्याव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा सुहास राजेशिर्के व कुणबी समाज संघ सातारा यांनी दिला आहे .