कोयना नगर:-मुनावळे प्रकल्प थांबवण्याच्या आदेशाने ठेकेदाराला चांगली चपराक.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मुनावळे प्रकल्प थांबवण्याच्या आदेशाने ठेकेदाराला चांगली चपराक.
कोयना नगर दि: सातारा जावळी विधानसभा मतदारसंघात ठेकेदारीच्या माध्यमातून हम करे सो कायद्याप्रमाणे वागणाऱ्या ठेकेदाराला मुनावळे प्रकल्प थांबवण्याच्या आदेशाने चांगलीच चपराक मिळाली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देताना कागदपत्राची पडताळणी केली जाते परंतु ठेकेदाराला परवानगी नसताना कार्यारंभचा आदेश देणे म्हणजे ठेकेदारांसाठीच आपल्या पदाचा वापर करणे हे सिद्ध झाले आहे याबाबत आता स्थानिकांमध्ये चर्चेला उधाण आलेले आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी लोकशाही मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. परंतु अधिकाऱ्यांनी निवेदनापूर्वीच संबंधित ठेकेदाराची मर्जी संभाळण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला होता. कोणती परवानगी मिळाल्याशिवाय शासकीय कामे करता येत नाही. असे असतानाही ठेकेदाराने मुनावळे (ता.जावळी) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलपर्यटन प्रकल्प विकसित करण्याचे काम विविध विभागाच्या परवानग्या प्रलंबित असतानाच ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. त्यामुळे सामाजिक, माहिती अधिकार, पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बुधवार दि.२ एप्रिल रोजी शिवसागर जलायशात जलसमाधीचा इशारा दिला होता.
या आंदोलन वेळी संबंधित विभागाने याबाबत सर्व परवानग्या घेतल्यानंतरच ठेकेदाराला काम सुरु करण्यास सांगितल्याचे लेखी पत्र दिल्याने श्री. मोरे यांच्या आंदोलनाचा दणका बसला आहे. परंतु ज्यांनी असे आदेश दिलेले आहेत त्यांची चौकशी करून त्यांच्यावर ती कारवाईची मागणी करणे. त्यांच्या सेवा पुस्तिकेत नोंद करणे हे गरजेचे आहे.
मौजे मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन्स म्हणून जाहीर केले आहे. याठिकाणी कोणताही पर्यटन प्रकल्प राबवताना वन पर्यावरण व हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्यजीव मंडळ, राज्य वन्यजीव मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या ना-हरकत परवानग्या मिळविणे. अशा प्रकल्पासाठी अत्यावश्यक आहे. देशातील ४९ राष्ट्रीय प्रकल्पांना परवांची बंधनकारक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सिद्ध केले आहे. ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाल्याशिवाय मुनावळे पर्यटन प्रकल्पातील कामे सुरू करू नयेत, असे लेखी आदेश मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य यांना दिले . त्यापूर्वी कार्यारंभ आदेश का काढला याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. ही निविदा प्रक्रिया रद्द करून पर्यावरणीय, वन्यजीव तरतुदींचा भंग करून निविदेला तांत्रिक मंजुरी देणारे जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक व कोयना सिंचनचे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार यांच्या निलंबनाची मागणीही श्री. मोरे यांनी केली होती. ज्यांना वाचवण्यासाठी आता मंत्रालय ते सातारा जावळीतील छोटा वाल्मिकी यांची धावपळ सुरू झालेली आहे. असे खात्रीलायक वृत्त हाती आली आहे. लेखी परवानगी नंतरच काम सुरू करणेत येणार आहे असे ठोस आश्वासन अधीक्षक अभियंता श्री नाईक यांनी दूरध्वनी द्वारे श्री मोरे यांना दिले. या परवानगी पूर्वी एक वीट सुद्धा मुनावळे प्रकल्पाला लावून देणार नाही. असा कुणी इशारा दिला नसला तरी कार्यारंभ आदेश रद्द झाल्याने ठेकेदाराची अब्रू चव्हाट्यावर आल्याचे मानले जात आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
__________________________________
फोटो मुनावळे प्रकल्पाच्या कार्यारंभ आदेश रद्द करण्याचे पत्र देताना अधिकारी व आंदोलक मोरे (छाया- अजित जगताप सातारा)