सातारा:-राज्यात सातारा जिल्हा उद्योग केंद्राला पहिल्यांदा प्रथम पुरस्कार…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राज्यात सातारा जिल्हा उद्योग केंद्राला पहिल्यांदा प्रथम पुरस्कार…
सातारा दि: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सातारा जिल्हा उद्योग केंद्राने मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची योजना राबवली आहे. शासनामार्फत मिळणारे अनुदान उद्योग संचालनालय मार्फत त्यांनी निर्धारित केलेल्या बँकेमार्फत लाभार्थींची निवड करून त्यांना उद्योजक बनवण्यामध्ये यशस्वी ठरल्यामुळे सातारा जिल्हा उद्योग केंद्र आर्थिक वर्ष२०२४- २५ मध्ये गुणानुक्रमांकनुसार राज्यात प्रथम आले आहे. सातारा जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील व जिल्हा उद्योग केंद्राचे महा सरव्यवस्थापक श्री उमेशचंद्र दंडगव्हाळ यांच्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
सातारा जिल्हा उद्योग केंद्राची निर्मिती झाल्यापासून हा पहिल्यांदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. सातारा
जिल्हा उद्योग केंद्र मार्फत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक, इतर मागास प्रवर्ग, विभक्त व भटक्या जमाती, अल्पसंख्यांक यांना शहरी भागामध्ये ७० टक्के व ग्रामीण भागामध्ये ६० टक्के बँकेने कर्ज पुरवठा केलेला आहे.
उत्पादन व्यवसायासाठी जास्तीत जास्त ५० लाखापर्यंत कर्ज देण्यात आले. त्यामध्ये इमारत खर्च २० टक्के व खेळते भांडवल ३० टक्के मर्यादित आहे. सातारा जिल्ह्यातून ऑनलाईन पद्धतीने ६२१५ विविध खाजगी, सहकारी व राष्ट्रीयकृत वित्त संस्थेकडे आलेले अर्ज संबंधित बँकांना पाठवण्यात आले .त्यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया यांनी ९१५ लाभार्थींची निवड करून १३५.९६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे. तर ज्या लाभार्थींचा सिबिल कोर्स खराब आहे. पूर्वीच्या कर्जामध्ये थकबाकीदार आहेत. प्रोजेक्ट व्हॅल्युबल नाही. आणि शैक्षणिक कमतरता असूनही मोठ्या उद्योग व्यवसायासाठी प्रस्ताव दिल्यामुळे अनुभवाच्या आधारे ते नाकारण्यात आलेले आहेत.
एकूणच३९०४ प्रस्ताव विविध बँकेचे नामंजूर केलेले आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये पर्यटन वाढीसाठी खूप मोठी संधी व चालना मिळत आहे. त्यामुळे शेती उत्पादन प्रक्रिया व अन्न खाद्यपदार्थ निर्मितीसाठी ७० टक्के उद्योजक या व्यवसायासाठी सज्ज झालेले आहेत. मानवी सेवा म्हणजे केस कर्तनालय ,झेरॉक्स सेंटर, ब्युटी पार्लर या उद्योगातही दहा ते अकरा टक्के आणि अभियंता क्षेत्रात १९ ते २० टक्के उद्योग व्यवसाय सुरू झालेले आहेत. इतर व्यवसाय फक्त दोन टक्के आहेत. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. उमेशचंद्र दंडगव्हाळ यांनी दिलेले आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
______________________________
फोटो- सातारा जिल्हा उद्योग केंद्राचे महासंघ व्यवस्थापक श्री उमेशचंद्र दंडगव्हाळ