वाई:-प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई बस स्थानक आगार प्रमुख यांना निवेदन.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयी बाबत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई बस स्थानक आगार प्रमुख यांना निवेदन.
वाई आगराच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बसची सुविधा देणे ही अग्रक्रमाची बाब आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे एसटीचे ब्रीद वाक्य आहे. परंतु या ब्रीद वाक्यांनुसार आपल्या आगाराकडून प्रवाशांची सेवा होताना दिसत नाही. पक्षाकडे प्रवाशांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार वाई आगारात सुधारणा करण्यात याव्यात. अशी आम्ही विनंती आपणास करतो. आणि पुढीलप्रमाणे समस्या अशा आहेत.
1)वाई आगारात नव्या बसेस येणार कधी?, त्या आणण्यासाठी आपणाकडून पाठपुरावा सुरू आहे का?
2)वाई आगारात इतर आगारातून वापरलेल्या जुन्या कालबाह्य बसेस वापरात आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी त्या मध्येच बंद पडत आहेत.
3)रात्रीच्या दरम्यान प्रवास करताना त्या बसेसना चांगला प्रकाश असणे आवश्यक असते. परंतु वाई आगारतल्या अनेक बसेसना व्यवस्थित हेड लाईट नसल्याने अंधुक प्रकाशात चालकास बसेस चालवावी लागतात. कोणती दुर्घटना घडल्यावर प्रवाशांचा जीव गेल्यावर उपाय योजना करणार का?
4)वाई तालुक्यातील पश्चिम भागात मुक्कामी बसेस वेळेवर सोडल्या जात नाहीत. ग्रामीण भागात शाळा, कॉलेजच्या वेळेत बसेस सोडाव्यात.
5)स्वारगेट या रुटवर इलेक्ट्रॉनिक बसची सक्ती करून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याचे काम होत आहे.
6)आगारातून चालकास बस देताना ती सुस्थितीत आहे का नाही हे न पाहता चालकास दिली जाते. त्यामुळे प्रवाशी बसल्यावर बस नादुरुस्त असल्याचे समजताच, चालक, वाहक यांच्यासह प्रवाशांचा विनाकारण वेळ जातो.
7)वाई ते सातारा या विना वाहक रुटवर काही वाहक जे जाणीवपूर्वक कामात टिंगळमंगळ करतात. जेष्ठ, वृद्ध, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक यांच्याशी सौजन्याने वर्तन न करता, त्यांना त्यांची जागा देत नाहीत. उदा. दि.29 मार्च2025 रोजी सकाळी वाई हुन साताऱ्याकडे जाणारी बस क्रमांक एम.एच.11बी.एल.9454 ही सकाळी 8.30 ला सुटली. त्या बसमध्ये प्रवाशांना तिकीटवर नंबर दिले नाहीत. बसमध्ये 39 प्रवाशी असले तरी नियमानुसार तिकिटावर नंबर टाकणे क्रम प्राप्त आहे.
8)वाई आगारात सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावीपणे नसून, तिथल्या पोलीस नियंत्रण कक्षात पोलीस कर्मचारी उपलब्ध नसतात. त्यामुळे वाई आगारातुन अनेक चोरीच्या घटना घडल्या असल्याने उपाय करावेत.
9)काही कर्मचारी हे प्रामाणिकपणे काम न करता वेळ कसा जाईल, ट्रिप कशी खाता येईल यासाठी तत्पर असतात. त्यामुळे प्रवाशांना फटका बसतो. गाड्या वेळेवर सोडल्या जात नाहीत.
सदर रोखठोक मुद्यांकरिता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा संघटक विकास दादा जाधव, वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, वाई तालुका युवक उपाध्यक्ष रोहित कवळे, अक्षय भाई गायकवाड आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत वाई आगार प्रमुख युवराज कदम यांना प्रवाशांच्या तक्रारीनुसार आगारात लिहिण्यास पेन उपलब्ध नसल्याने पेनचे पाकीट भेट देण्यात आले.