सातारा:-सातारा जिल्हा नियोजन सदस्य पदी रिपाईची नियुक्ती करावी- सुरेश येवले.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
सातारा जिल्हा नियोजन सदस्य पदी रिपाईची नियुक्ती करावी- सुरेश येवले.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आसलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये समतेचा नारा देऊन सर्व समाजासाठी कार्यरत असणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( रिपाई) या पक्षाचे नेते आदरणीय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. परंतु, सातारा जिल्हा नियोजन समितीवर एकाही कार्यकर्त्याला संधी देण्यात आलेली नाही. ही बाब राजकीय दृष्ट्या परवडणारी नसून त्वरित किमान दोन जागी रिपाई कार्यकर्त्यांना सातारा जिल्हा नियोजन मंडळावर संधी द्यावी .अशी रास्त मागणी रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते सुरेश येवले यांनी केलेले आहे.
सातारा जिल्ह्यात सर्व समाजाच्या न्याय हक्कासाठी विशेषता मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, भटक्या, विमुक्त जाती जमाती व अल्पसंख्याक समाजावर अन्याय झाला की, आदरणीय नेते रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक जिल्हा पातळीवरील नेते यांच्या आदेशानुसार अनेक आंदोलने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व कार्यकर्ते करीत असतात .
राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्षाशी युती करण्यात आलेली आहे. आता शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भारतीय जनता पक्षाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत महायुती म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते सर्वच स्तरावर त्यांच्या भूमिकेचे स्वागत करत आहेत . होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत त्यांना विजयी करण्यासाठी खारीचा वाटा उचलत आहे . आज अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाची केंद्र व राज्यातही सत्ता आलेली आहे. परंतु दुर्दैवाने राजकीय दिलेल्या शब्दांनुसार अद्यापही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाने दिलेल्या मतानुसार अजूनही सत्तेचा वाटा मिळालेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. ही अस्वस्थता आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकट होण्याची भीती आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी तथा जिल्हाध्यक्ष यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा किमान सातारा जिल्हा नियोजन समितीवर रिपाईची निवड करण्यासाठी प्राधान्य द्यावे. अशी मागणी रिपाईचे ज्येष्ठ नेते सुरेश येवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलेली आहे.
सातारा जिल्ह्यातील अनेक खेड्यापाड्यांमध्ये ग्रामपंचायत, सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समिती व सहकारी संस्था त्याचप्रमाणे शासकीय पातळीवर सातारा जिल्ह्यातील अनेक समित्या आहेत. पण, रिपाईला जाणीवपूर्वक डावले जात आहे. ही खरं म्हणजे भाजप नेत्यांची अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेना उत्तर देण्याची धमक रिपाई पक्षात आहे. सध्या महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये वंचित बहुजन आघाडी केंद्रबिंदू ठरला आहे. वास्तविक पाहता प्रत्येक वंचित घटकाला न्याय द्यावा. ही भूमिका वरिष्ठ पातळीवर नेते घेत असतात. पण स्थानिक पातळीवर पाणी आडवा पाणी जिरवा योजनेसारखे रिपाई कार्यकर्त्याला आडवा व जिरवा असे जर होत असेल तर रिपाई पक्षाचे काही कार्यकर्ते हे राजकीय जिरवा जिरवीमध्ये नक्कीच काम करतील. अशी आता शंका नव्हे तर भीती वाटू लागलेले आहे.
त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी सातारा जिल्हा नियोजन समितीवर अभ्यासू व सातारा जिल्ह्यातील प्रश्नांची जाण असणाऱ्या किमान दोन व्यक्तींना संधी द्यावी. यामध्ये महिलांचाही सहभाग असावा. कारण, आज ५० टक्के पेक्षा जास्त महिला राजकारणात सक्रिय आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाने अद्याप महिलांना सातारा जिल्हा नियोजन समितीवर संधी दिलेली नाही .हे सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यात अशोभनीय आहे. रिपाईने महिलांना संधी देऊन त्यांच्या गुणवत्तेला वाव दिलेला आहे .त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळावर रिपाईच्या महिला पदाधिकाऱ्यांची निवड केली तर आनंद वाटेल. असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या मागणीला रिपाईचे ज्येष्ठ नेते भालेराव, महिला पदाधिकारी पूजा बनसोडे,कृणाल गडांकुश,विकास जाधव, संतोष भंडारे, रवी माने, महेंद्र गायकवाड, प्रकाश खंडाईत, प्रभाकर कांबळे, सौ वनिता कांबळे, सौ सविता तोरणे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
——————————————–
फोटो -रिपब्लिकन ज्येष्ठ नेते सुरेश येवले