वाई:-पांडे गावचे रहिवासी गोपाळ राजाराम जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन, न्याय न मिळाल्यास जाधव कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा.
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
पांडे गावचे रहिवासी गोपाळ राजाराम जाधव यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वाई प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन, न्याय न मिळाल्यास जाधव कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा.
नित्यानंद मोरे, वाई प्रतिनिधी
दिनांक 26 मार्च रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा. किरण बगाडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते गोपाळ राजाराम जाधव मुक्काम पोस्ट पांडे, तालुका वाई येथील रहिवासी आहेत. पांडे गावामध्ये 808 गट नंबर वर त्यांची स्व मालकीची शेतजमीन आहे. त्यांच्या स्वमालकीच्या 808 गट नंबर मधून आठ फूट रस्ता शासनाकडून नेला जात आहे व तो रस्ता पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या आठ फूट रस्त्याबाबत तहसीलदार वाई यांच्या दालनात खटला सुरू असताना तहसीलदार यांनी कोणत्याही गोष्टीची पूर्णपणे चौकशी न करता गोपाळ राजाराम जाधव यांच्याच मिळकती मधून आठ फूट रस्ता करण्याचा अन्यायकारक निर्णय दिला जोकी अन्यायकारक आहे . या विरोधात गोपाळ गणेश जाधव यांनी माननीय उपविभागीय अधिकारी वाई यांच्या दालनात अपील केले असून अजून अपिलावर कोणताही आदेश होण्याच्या अगोदरच पांडे गावच्या मंडलाधिकारी यांनी जेसीबीच्या साह्याने प्रशासनाची धाक दाखवत, संबंधित जाधव कुटुंबासोबत अरेरावीची भाषा करत, मिळकत धारकाची कोणतीही परवानगी न घेता आठ फूट रस्ता करून जाधव कुटुंबावर अत्याचार केला आहे. नियमानुसार जाधव कुटुंब चार फूट रस्त्यासाठी देण्यासाठी तयार असताना देखील समोरच्या जागा मालकाबद्दल प्रशासनाच्या मनात एवढे तळमळ का? कोणत्या राजकीय दबावापोटी प्रशासन मुद्दामून गोपाळ राजाराम जाधव आणि त्यांच्या कुटुंबाला त्रास देत आहे ,असा प्रश्न महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. सदर बेकायदेशीर रस्ता कोणताही निर्णय होण्याअगोदर तात्काळ थांबवावा अन्यथा येत्या काही दिवसातच महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वाई उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर जाधव कुटुंबीयांच्या वतीने आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देखील प्रशासनाला जिल्हाध्यक्ष किरण बगाडे यांनी दिला यावेळी गोपाळ राजाराम जाधव , वैभव गोपाळ जाधव, गणेश गोपाळ जाधव, सर्व जाधव कुटुंब आणि वाई विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे, वाई तालुकाध्यक्ष विजय सातपुते, वाई तालुका युवक अध्यक्ष आकाश भाई गायकवाड, वाई तालुका युवक उपाध्यक्ष रोहित कवळे, अक्षय भाई गायकवाड, बापू शिंदे, राज भाई गायकवाड , प्रथमेश कांबळे आणि सहकारी उपस्थित होते.