ताज्या घडामोडी

सातारा:-सातारा जिल्हा बँकेच्या भरती परीक्षा पुणे तर मुलाखती दिल्लीला घेणार का?

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा जिल्हा बँकेच्या भरती परीक्षा पुणे तर मुलाखती दिल्लीला घेणार का?

सातारा दि: सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी सक्षमरित्या बँकेचा कारभार करणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कनिष्ठ लेखनिक व कनिष्ठ शिपाई या पदासाठी पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा गुरुवार दिनांक पाच ते सोमवार दिनांक नऊ डिसेंबर पर्यंत सातारा व पुणे या ठिकाणी होत आहे. यामध्ये उत्तीर्ण उमेदवारांच्या मुलाखती दिल्लीला घेणार का? असा मार्मिक सवाल काही उमेदवारांच्या पालकांनी विचारलेला आहे .
वास्तविक पाहता सध्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असल्यामुळे सरकारी नसेल तरी सहकार क्षेत्रात नोकरी मिळावी. या आशेने अनेकांनी ५९० रुपये प्रत्येकी भरून अर्ज दाखल केलेले आहेत. अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांच्या मुलाखती आता साताऱ्यातील वाढे फाटा, पुणे जिल्ह्यातील महामार्गावरील बिबवेवाडी, कोंढवा बुद्रुक ,वाघोली या ठिकाणी होणार आहे. सदर परीक्षा सकाळी दहा ते साडे अकरा दुपारी एक ते अडीच व दुपारी चार ते सायंकाळी साडेपाच या वेळेत ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होत आहे. ९० मिनिटाच्या परीक्षेमध्ये ९० प्रश्न उत्तर द्यावी लागणार आहेत. सदर संकेतस्थळावर शनिवार दिनांक ३० नोव्हेंबर पासून सातारा जिल्हा बँक भरती प्रवेश पत्र उपलब्ध केले जाणार आहे. काहींचा अर्ज स्वीकारला नाही मात्र ती रक्कम बँकेत अजूनही जमा आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संकेतस्थळावर याबाबतचा तपशील देण्यात आलेला आहे. दिनांक १२ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट पर्यंत हजारो बेरोजगार सुशिक्षित पदवीधर व दहावी पास उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेपूर्वी दोन तास अगोदर परीक्षार्थींनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. कनिष्क लिपिक पदाच्या २६३ व कनिष्ठ शिपाई पदासाठी ६० जागा आहेत. यातील काही जण परिश्रम घेतले तर आय.ए.एस. आय.पी.एस. होऊ शकतात. हे पण खरे आहे.
सध्या महामार्गाची अवस्था बिकट असून अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. वाहतुकीचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे . सर्व परीक्षार्थीनी वेळेपूर्वीच तीन तास अगोदर त्या ठिकाणी पोहोचणे गरजेचे आहे. तसेच परीक्षा देताना प्रवेश पत्राव्यतिरिक्त कुठल्याही साहित्य घेऊन जाणे म्हणजे कॅल्क्युलेटर, स्मार्टवॉच, इलेक्ट्रिक घड्याळ, ब्लूटूथ ,मोबाईल फोन, पेजर आधी साहित्य घेऊन जाऊ नये. फक्त आवश्यक पेन, मूळ ओळखपत्र सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे. असे सूचित केलेले आहे.
सातारा- पुणे येथे लेखी परीक्षा पण तोंडी मुलाखती मात्र दिल्लीला घेऊ नका. अशी विनंती काहींनी केलेली आहे. त्याची खमंग चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झालेली आहे.
सध्या महायुतीचे केंद्र व राज्यात सरकार असून जिल्हा बँकेचे चेअरमन हे राज्यसभा सदस्य आहेत. त्यामुळे मुलाखती मुंबई, पुणे किंवा दिल्लीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे काहींनी विनोदी शैलीत सांगितले……

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button