ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुसेगाव:-लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना वेगळ्या उंचीवर असेल- माजी आमदार बाबुराव माने.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना वेगळ्या उंचीवर असेल- माजी आमदार बाबुराव माने.

पुसेगाव दि: राजकीय घडामोडी वेगाने घडलेल्या आहेत. निष्ठा- तत्त्व- प्रणाली विसर्जन करून आता गद्दारांनीचकाही काळाच्या सत्तेच्या मोहापाई आपले विचार गहाण ठेवलेले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आदरणीय दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लोकसभा निवडणुकीनंतर वेगळ्या उंचीवर असेल. असा ठाम विश्वास सातारा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना निरीक्षक व माजी आमदार बाबुराव माने यांनी काही पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला आहे .
सातारा जिल्ह्याचे नेर तालुका खटाव येथील सुपुत्र असलेल्या माजी आमदार बाबुराव माने यांनी युवक अवस्थेपासूनच शिवसेनेची नाळ जोडलेली आहे. शिवसेना म्हणजेच त्यांचा राजकीय श्वास आहे. त्यामुळे शिवसेना व्यतिरिक्त सच्चा शिवसैनिक कोणताही विचार करत नाही. याच माध्यमातून सामान्य माणसांची थेट भेट घेऊन होऊ द्या चर्चा या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून ते सध्या सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकांच्या मध्ये जाऊन लोकांचे विचार ऐकून घेत आहेत. धारावी मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार, नगरसेवक म्हणून केलेल्या केलेल्या कार्याची आजही लोक आठवण काढत आहेत .आता त्यांचे कार्यक्षेत्र वाढले असून महाराष्ट्रातील असे सच्चे शिवसैनिक शिवसेनेसाठी पुन्हा एकदा रणांगणात उतरले आहेत.
याबाबत माजी आमदार बाबुराव माने यांना काही पत्रकारांनी छेडले असता त्यांनी सांगितले की, शिवसेना संघटना मुळातच अनेक भूकंप सहन करून उभी राहिलेली आहे .शिवसेना संपावी म्हणून अनेकांनी गोड पदार्थावर तिखट- मीठ चोळले. पण शिवसेना आज ही मिठाई सारखी गोड राहिली आहे.पण, विरोधक यांचे विसर्जन जवळ आले आहे. शिवसेनेची कमान उंचावत आहे.
आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, व मान्यवर मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक शहरी भागात व ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचलेले आहेत .आता फक्त मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारे व सर्व समाजाला सामावून घेणारे हिंदुत्व अबाधित राखण्यासाठी शिवसैनिकांसोबतच युवक, तरुण, सुशिक्षित वर्ग, कष्टकरी, मराठा, ओ. बी. सी. व एस. सी. आदिवासी, भटके, अल्पसंख्याक अशा विविध जाती धर्मातील लोक शिवसेनेच्या छायेखाली मोठ्या प्रमाणात बांधणी करत आहेत .
सव्वा वर्षापूर्वी शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. ही अस्वस्थता दूर करण्याचे काम महाराष्ट्रातील अनेक मातब्बर शिवसेना नेत्यांनी केलेले आहे. त्यामुळे मोठ्या जिद्दीने फिनिक्स पक्षासारखे राखेतून गरुड झेप घेणारे शिवसैनिक निवडणुकीसाठी सज्ज झालेले आहेत. शिवसैनिक पेटून उठला असून क्रांती साठी त्यांनी हाती मशाल घेतली आहे.उदाहरण द्यायचे झाले तर खटाव तालुक्यातील वेठणे गावात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थ दहा दिवस अमर उपोषण करत आहे. शिवसेना त्यांच्या सोबत आहे.या उपोषणाकडे एकही सत्ताधारी लोकप्रतिनिधी अथवा अधिकारी पोहोचत नाही. दुसऱ्या बाजूला चार महिन्यात पंचवीस कोटी रुपये खर्च करून गतिमान सरकार अशी खोटी जाहिरात केली जात आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे.
एका बाजूला लोकांच्या अन्याय करायचा दुसऱ्या बाजूला लोकांची कामे केली आहेत. असे सांगायचं ही विसंगती आहे. पूर्वी वैचारिक बांधिलकी जपणारे सरकार सत्ता राबवत होते. आता देशापासून ते खालील ग्रामपंचायतीपर्यंत भांडवलदारांचा हस्तक्षेप सुरू झाल्यामुळे सरकारची कल्याणकारी योजना ही भांडवलदारांसाठी पर्वणी ठरू लागलेली आहे. खाजगीकरणाचे वारे आता घराघरात पोहोचलेले आहे. कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या नष्ट होत आहे .त्यामुळे ज्यांनी शिवसेनेची गद्दारी केलेली आहे. त्या सर्वांचे आगामी निवडणुकीत डिपॉझिट जप्त होणार आहे. आता कोणीही खोके अथवा आमिषाला बळी पडणार नाही. आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली सत्व व तत्त्वाचे राजकारण केले आहे. प्रसंगी एक घाव दोन तुकडे केलेले आहेत .तसेच सर्वांना सामावून घेण्याची ही धमक शिवसेनेमध्ये आहे. सातारा लोकसभा निवडणुकीमध्ये निरीक्षक म्हणून काम पाहताना शिवसैनिकांनी निर्माण केलेले जाळे आजही मजबूत आहे. त्याला अद्यापही धक्का लागलेला नाही. असे माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.
काहींनी खोके घेऊन अपशकून केलेले आहे. तरीसुद्धा शिवसेना सोडून गेलेले प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांच्या घाबरण्यामुळेच भाजप सारख्या पक्षाला सर्व निवडणुका पुढे ढकलावे लागत आहेत. महाराष्ट्रात पोट निवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झालेला आहे. त्याची पुनरावृत्ती आगामी निवडणुकीत दिसून येणार आहे. शिवसेनेसोबत येण्यासाठी भाजप उत्सुक असून भाजपमधील निष्ठावंत लोकांना शिवसेना सोबत हवी आहे. परंतु, आता शिवसेनेने भाजपची दोर कापलेली आहे. आता पुन्हा एकत्र येणे अशक्य आहे. भाजपला लोकांनी लाथडले आहे . नरेंद्र मोदींच्या जुमल्यामुळे मतदारांनी भाजपला नाकारण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.
भारत देशाच्या राजकारणामध्ये एक मोठी कलाटणी मिळणार असून इंडिया आघाडीच्या माध्यमातून २८ पक्ष एकत्र आलेले आहेत तर भाजप सोबत जाणारे एन.डी.ए .मधील काही पक्ष भाजपच्या राजनीतीला कंटाळून सोडून जात आहे. सध्या थेट भेटीच्या माध्यमातून जुने जाणते शिवसैनिक तसेच शिवसेनेची निष्ठा असणारे व हितचिंतक आणि महाविकास आघाडी सोबत निष्ठेने काम करणारे सर्वच मतदार आज निवडणुकीची वाट पाहत आहेत.
आदरणीय शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईसारख्या ठिकाणी पुन्हा एकदा भगवा फडकवण्याची जिद्द ठेवलेली आहे. त्यामुळे दक्षिण- मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून काम पाहताना शिवसेनेचे मिळणारे प्रेम शिवसैनिकांना जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे .पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शिवसेनेत आतुर झालेले आहेत. एक मराठा लाख मराठा… हम तेरे साथ अगर, क्यु की सच्चा है धनगर,,, अशा घोषणाबाजी होत असून शिवसेनेची ताकद निश्चितच वाढली आहे. हे चित्र पाहायला मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान ,शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानुगडे – पाटील, हर्षद कदम,सचिन मोहिते, अमोल आवळे,मुंबईतील युवा नेते श्याम रोकडे, युवराज पाटील,दिलीप गायकवाड व अनेक मान्यवर शिवसैनिक रमेश बोराटे,फडतरे, जाधव, पाटील, गोडसे, भानुदास कोरडे, हणमंत चवरे- पाटील हे सुध्दा थेट भेट व होऊ दे चर्चा कार्यक्रमातून लोकांशी संवाद साधून मनोगत व्यक्त करीत आहेत.

———————————————

फोटो कॅप्शन- शिवसेनेच्या थेट भेट व उद्या चर्चेच्या निमित्ताने लोकांची संपर्क साधल्यानंतर माहिती देताना माजी आमदार बाबुराव माने (छाया- निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button