आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-संच मान्यता शास्त्रज्ञ रद्द करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीचे साताऱ्यात जोरदार आंदोलन.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

संच मान्यता शास्त्रज्ञ रद्द करण्यासाठी प्राथमिक शिक्षक समितीचे साताऱ्यात जोरदार आंदोलन.

सातारा दि: भावी पिढी घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून शिक्षक वर्गाची मानसिकता सदृढ ठेवण्याच्या ऐवजी नियम व अटी घालून शिक्षकांवर मानसिक तणाव निर्माण करण्याची भूमिका घेतली जात आहे त्याचाच भाग म्हणून १५ मार्च २०१४ संच मान्यता शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केले. यावेळी जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.

राज्य शिक्षक नेते उदय शिंदे सातारा जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे व जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे यांच्या नेतृत्वाखाली आज शिक्षक समितीच्या आबासाहेब जाधव, विशाल कणसे, नवनाथ जाधव ,किरण यादव, अनिल चव्हाण, प्रदीप कदम, विठ्ठल फडतरे, नितीन शिर्के, सुरेश पवार, पुष्प लता बोबडे
यांच्यासह अनेक प्राथमिक शिक्षकांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. शिक्षणाधिकारी श्रीमती शबनम गुलाब मुजावर यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

निवेदनामध्ये नमूद केले आहे की
१५ मार्च २०२४ शासन निर्णयानुसार २०२४-२५ संच मान्यता अंतिम करण्यात
आली आहे. शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या व २८ ऑगस्ट २०१५ (सुधारित ८ जानेवारी २०१६) विसंगतअशा शासन निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाही. अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे राज्यात हजारो शिक्षक तर अतिरिक्त होतीलच; परंतु शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणात अडसर निर्माण होणार आहे. शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने / अत्यंत कमी प्राथमिक शिक्षकशिक्षक उपलब्ध असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना परगावच्या शाळेत दाखल करणे क्रमप्राप्त
होईल. अशी निवेदनात भीती व्यक्त केली आहे.
किशोरवयीन मुला-मुलींच्या शिक्षणाची परवड होईल व मुलींची सुरक्षितता
धोक्यात येण्याची स्थिती आहे. सोबतच बाहेरगावी दररोज जाणे-येणे करण्याचे स्थितीमुळे गळतीचे प्रमाण वाढेल.
या संबंधाने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.
प्राथमिक शालेय शिक्षण विभागाचे पत्रक्र.एसएसएन-२०१५/(प्र.क्र.१६/१५)/टीएनटी-२ दि. १०/०३/२०२५ नुसार इयत्ता ६
वी ते ७/८ वीची पटसंख्या २० किंवा २० पेक्षा कमी असल्यास १ नियमित शिक्षक मंजूर केला आहे. परंतु सदर बाब सुद्धा शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदीस विसंगत आहे.
बालकांचे शैक्षणिक नुकसान करणारा १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय अद्यापही रद्द करण्यात आलेला
नाही.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील शिक्षक संख्येवर प्रतिकूल परिणाम करणारा व स्वतःच्या गावातील शिक्षण
मिळवण्याचा हक्क डावलणारा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती ने १७ मार्च २०२५ रोजी संपूर्ण राज्यात धरणे/
निदर्शने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार आज जोरदार आंदोलन करण्यात आले..
सातारा जिल्ह्यातील दुर्गम अति दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितास
सर्वोच्च प्राधान्य देऊन सदर बाबतीत मागणीनुसार निर्णय घ्यावा.असे स्पष्ट करून शिक्षक नेत्यांनी आपल्या भूमिका मांडल्या. या आंदोलनाला अनेक शिक्षक वर्ग उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

_________________________________
फोटो – सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करताना प्राथमिक शिक्षक व शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्राथमिक शिक्षक समितीचे पदाधिकारी (छाया – प्रकाश वायदंडे सातारा

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button