सातारा जिल्ह्यात महायुतीचे निवडून आले आठ, बाकी सर्व झाले सपाट..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा जिल्ह्यात महायुतीचे निवडून आले आठ, बाकी सर्व झाले सपाट..
सातारा दि:छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघाच्या निकाल स्पष्ट झाला . यामध्ये महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आलेआहेत . बाकी महाविकास आघाडी व अपक्ष असे सर्व उमेदवार सपाट झालेले आहेत. हा निकाल धक्कादायक असून अनेकांनी याबाबत नवल व्यक्त केले आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना १ लाख ७६ हजार ८४७ व अमित कदम यांना ३४ हजार ७२५ मते मिळाली. यामध्ये १ लाख ४२हजार १२४ मताची आघाडी त्यांनी घेतली .कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे मनोज घोरपडे यांना १लाख ३४ हजार६२६ व त्यांचे प्रतिस्पर्धी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना ९० हजार ९३५मते मिळाली. यामध्ये ४३ हजार ६९१मताधिक्य मिळाले आहे. कराड दक्षिण मतदार संघातून डॉ. अतुल बाबा भोसले यांना एक१ लाख ३८ हजार २५४ व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ९९ हजार ७५ मते मिळाली. या ठिकाणी ३९ हजार १७९ मताधिक्य मिळाले. माण खटाव मतदार संघात आ जयकुमार गोरे यांना १ लाख ५० हजार २१ मते मिळाली .त्यांचे प्रतिस्पर्धी प्रभाकर घार्गे यांना १ लाख ३४३ मतं मिळाली. त्या ठिकाणी ४९ हजार ६७५ मताधिक्य मिळाले. कोरेगाव मतदार संघात आ महेश शिंदे यांना १ लाख ३३ हजार९१४ व माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना ९४ हजार ९७९मते पडली. या ठिकाणी ३८हजार ९३५ मताधिक्य मिळाले आहे.
पाटण मतदारसंघात मंत्री शंभूराज देसाई यांना १ लाख २५ हजार ७५९ व त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष सत्यजित पाटणकर यांना ९० हजार ९३५ व शिवसेना उबाठा गटाचे हर्षल कदम यांना ९६२६ मते मिळाली. या ठिकाणी ३४ हजार ८२६ मताधिक्य मिळाले. वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात आ. मकरंद पाटील यांना १ लाख ४० हजार २७१ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी सौ अरुणादेवी पिसाळ यांना ७९ हजार ५३९ मते पडली. या ठिकाणी ६१ हजार ३९२ मताधिक्य मिळाले .
सातारा जिल्ह्यातील राखीव फलटण मतदारसंघात सचिन पाटील यांना १ लाख १९ हजार २८७ तर आमदार दीपक चव्हाण यांना १ लाख २हजार २४१ मते पडली. या ठिकाणी १७हजार ४६मताचे मताधिक्य मिळाले. अजित दादा पवार गटान यापूर्वी आमदार दिपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजितदादा गड सोडून पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबतच आमदार दीपक चव्हाण यांनीही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाऊन उमेदवारी मिळवली होती. त्याचा त्यांना चांगला तोटा झालेला आहे. राजकारणामध्ये काही निर्णय हे धाडसाने घ्यावे लागतात. हे धाडस करण्यास आमदार चव्हाण यांना अपयश आल्यामुळे त्यांचा पराभव झाल्याचे विश्लेषण होत आहे. सातारा जावळी मतदारसंघातील आमदार श्री राजीव भोसले यांना महाराष्ट्रात सर्वाधिक मते मिळाल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करावे अशी मागणी आता काही मतदारांनी केलेली आहे हे वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.