वाई:-ओझर्डे गावच्या शाळेत विविध कामांचे उद्घाटनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ओझर्डे गावच्या शाळेत विविध कामांचे उद्घाटनाचा कार्यक्रम सोहळा संपन्न.
वाई प्रतिनीधी
वाई तालुक्यातील ओझर्डे गावची शाळा ही महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक शाळा बनलेली आहे या अत्याधुनिकी कामाचे उद्घाटन सोहळा दि.22 रोजी दुपारी पतित पावन विद्यामंदिरओझर्डे या शाळेत संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साळुंखे सर मुख्याध्यापक यांनी केले. यावेळी शाळेचे कंपाउंड, वर्ग खोल्या नूतनीकरण, ध्वज स्तंभाच्या कामाचे पूजन अशा विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले तसेच EDGEFX मार्फत महाराष्ट्रातील पहिली अत्याधुनिक तंत्रज्ञान STEM लॅब चे उद्घाटन हे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा. अभयकुमार साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. बेलोशे मॅडम यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच जुन्या शाळेबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाषण प्रा. अभयकुमार साळुंखे यांनी केले तेव्हा त्यांनी बापूजींच्या आठवणींना उजाळा दिला त्यांच्या काळातील अडीअडचणी सांगितल्या 1960 साली स्थापन झालेल्या शाळेचा पूर्वीचा अवतार व पन्नास वर्षानंतरच्या शाळेचा अवतार यात खूप बदल झालेला दिसून येत आहे. मराठी भाषेला प्राधान्य देऊन पतित होऊन पावन विद्यार्थी घडावेत व ते पुढील आयुष्यात उज्वल व्हावेत असे ते बोलले. बापूजींनी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घेऊन आपले पूर्ण आयुष्य समाज घडवण्यात घालवले त्यांना संत गाडगेबाबा यांचा मोठा सहवास लाभला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काय केले पाहिजे यातून या संस्थेचा विचार मनात आला व त्यांनी शिक्षण तळागाळात पोहोचवण्यासाठी मोठे प्रयत्न केले. बैलगाडी मधून त्यांनी 11 जिल्ह्यात 176 शाळा चालू केल्या बापूजी ज्या गावात जायचे त्या गावातील लोकांना ते आवाहन करून लोकांची साथ घेऊन तेथे शाळा चालू करत होते. समाजात शिक्षण प्रसार करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता व लोकांनी शिक्षण घेऊन आपला देश प्रगत करावा असे त्यांना वाटत होते. ग्रामीण भागात शिक्षण नव्हते म्हणून त्यांनी ग्रामीण भागात आपले लक्ष केंद्रित केले त्यामुळे आज अडीच लाख लोक या संस्थेच्या अंतर्गत महाराष्ट्रात शाळा शिकत आहेत. याच लोकांना बापूजींनी ज्ञानाचा वसा दिला आजच्या काळात शिक्षक हे गटबाजी करत असतात परंतु या संस्थेतील शिक्षक बापूजींचे विचार पुढे घेऊन चालले आहेत. गांधीवादी विचार मनात घेऊन या संस्थेची स्थापना बापूजींनी केली. बापूजींनी शिक्षकांच्या मनात चांगले विचार बिंबवल्याने विद्यार्थी देखील चांगले घडले. तेव्हा अभय कुमार साळुंखे यांनी Education fx हैदराबाद ची कंपनीचे देखील आभार मानले. सकाळ फाउंडेशनचे देखील त्यांनी आभार मानले सकाळ फाउंडेशनने सात लाखाची मदत करून शाळेस पुनर्जीवित केले असे देखील ते बोलले. गावातील नागरिकांचे देखील त्यांनी आभार मानले. या कार्यक्रमास प्रा. अभय कुमार साळुंखे, सकाळ फाउंडेशन सातारा टीम, शाहीद सोमनाथ तांगडे यांच्या वीर पत्नी रेश्मा तांगडे, अजित फरांदे शाळा व्यवस्थापन समिती, स्टीम लॅबचे राजदीप जमादार, मनोज यादव प्रकाश कुंभार, गणेश बाबर, सरपंच, ग्रामस्थ, शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक व माजी विद्यार्थी, पत्रकार व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता व आभार फरांदे सर यांनी केले.