सातारा:-महाराष्ट्रात स्थानिक निवडणुका लांबल्याने काहींची गोची …
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
महाराष्ट्रात स्थानिक निवडणुका लांबल्याने काहींची गोची …
सातारा दि: निर्भीड व निपक्षपातीपणाने वार्तांकन व वृत्तवाहिनीची जबाबदारी घेणाऱ्या मीडिया कन्सल्टंट व पत्रकारांना राजकीय पटलावर कार्यशाळा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे पाहिले जाते. परंतु ,या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे अभ्यासू व होतकरूंची चांगलीच गोची झालेली आहे .
महाराष्ट्र गेल्या तीन वर्षांमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुका वगळता फारशा अशा निवडणुका न झाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राचा विचार केला २९ महानगरपालिका २५७ नगरपालिका२६ जिल्हा परिषद व २८९ पंचायत समित्या असे मिळून सुमारे ६०० निवडणुकीची रणधुमाळी महाराष्ट्रात होण्याची आशा पल्लवी झाली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाच्या ५ फेब्रुवारी च्या सुनावणीनंतर आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता या निवडणुका पुढे गेलेले आहेत.
वास्तविक पाहता स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधीच्या सोबत असणारे कार्यकर्ते कम ठेकेदार यांनी चांगलीच तयारी केली होती. एखाद्याच्या तमाशाचा फड उभा करताना जसे तबलावाला, पेटीवाला ,झांजवाला यांची मदत लागते. तशा पद्धतीने यंत्रणा सोबत होती. पण, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे निवडणुकीचे साहित्य, प्रचार निमित्त लागणारी वाहने ,धाबा संस्कृती व खोकला झाला तर त्यासाठी लागणारे औषध, जेवणावळी या सर्वांचे वजा बेरीज करतात किमान सातारा जिल्ह्यात शंभर कोटीची उलाढाल ठप्प झालेली आहे. अशी आता अर्थ विभागाशी निगडित माहिती असणारे ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे.
सध्या समाज माध्यमाच्या रूपाने माहितीचा खजाना हाती आल्यामुळे काही राजकीय मंडळींचा मुखवटे व चेहरे दाखवण्यासाठी चढाओढ लागलेली आहे. खोटे पण चकचकीत पणाने मिरवत असले तरी सोन्यासारखे सत्य कधीतरी सोन्याच्या दुकानात उघड होतेच. समाज माध्यम व युट्युबच्या माध्यमातून अनेक जण चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करत आहेत.त्यांच्या निस्वार्थी व निपक्षपातीपणाने अन्यायग्रस्त, धरणग्रस्त, दलित, पददलित, कष्टकरी, शोषित, शेतमजूर एवढेच नाहीतर आदिवासींचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे. वेळेप्रसंगी पदरमड करून सत्य पत्रकारिता जपत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून घडणाऱ्या घडामोडीकडे आता सर्वांचे लक्ष लागले होते . स्थानिक निवडणुका पुढे ढकलल्यामुळे देवा बाप्पा मोरया … स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर घ्या…. एवढेच म्हणण्याची पाळी आता काही भक्तांवर आलेली आहे. हे मात्र लपून राहिलेले नाही. निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनेक जण पर्यटनाला जाऊन कुटुंबासमोर आनंद व्यक्त करतात. थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी महाबळेश्वर मध्ये ही पर्यटनासाठी बरेच लोक आल्याची माहिती पाचगणी टेन्ट हाऊस व हॉलिडे रिसॉर्टचे डॉक्टर विजय दिघे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्र मध्ये महाविकास आघाडी व महायुती त्याचबरोबर स्वबळावर निवडणूक लढवून आपले अनामत रक्कम जप्त होण्याची वाट पाहणारे सुद्धा कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी वेट अँड वॉच म्हणजे सुद्धा जड झालेले आहे. प्रसार माध्यमातून आता नवीन क्रांती आली आहे. पूर्वी एकटाच पत्रकार शोधक पत्रकारिता करून माहिती गोळा करत होते. आता काळ बदलला असून संघटित रित्या बातम्या मिळवण्यासाठी प्रयत्न होत आहे . एकामेका साह्य करू अवघे धरू सुपंथ.. याच धर्तीवर साथी हात बढाना. असा नवीन प्रयोग ग्रामीण भागात होत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. मात्र, निवडणुका पुढे गेल्याने व्यावसायिकांची गोची झाली. हे अनेक जण मान्य करू लागलेले आहेत.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
________________________________
फोटो- निवडणुका