सातारा:-घरकुल साठी पाच लाख रुपयाची तरतूद करण्याची एम.आर.पी.ची मागणी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
घरकुल साठी पाच लाख रुपयाची तरतूद करण्याची एम.आर.पी.ची मागणी.
सातारा दि: सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली. आजही काही घरांची देखभाल दुरुस्ती चांगल्या पद्धतीने होत आहे. परंतु, आता नव्याने मंजूर केलेल्या घरकुल योजना ही ठराविक ठेकेदारांसाठी आहे का ? असा प्रश्न उपस्थित करून गरिबाला लाभ मिळावा यासाठी घरकुल योजनेच्या प्रत्येक लाभार्थी पाच लाख रुपये करावा अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष तथा एमआरपी जिल्हाध्यक्ष किरण बगाडे, युवक जिल्हाध्यक्ष सोमनाथ धोत्रे यांनी केली आहे. दरम्यान, घरकुलाच्या बांधकामाची शंभर दिवसात किमान शंभर घरकुलाची तपासणी करावी असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सातारा जिल्ह्यात मोदी आवास घरकुल योजनेस सुरुवात झाली असून २०२३-२४ या वर्षात १ हजार ७७७ घरांचे उद्दिष्ट होते . त्यातील ५९४ प्रस्तावांना मान्यता प्राप्त झाली आहे. राज्य पुरस्कृत आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील इतर मागास, विशेष मागास प्रवर्गातील बेघर अथवा कच्चे घर असलेल्या कुटुंबांना या घरकुल योजनेचा लाभ दिला जात आहे. या अंतर्गत किमान २६९ चाैरस फूट चटई क्षेत्र एवढे पक्क्या घराचे बांधकाम करण्यासाठी १ लाख २० हजार रुपयांचे अनुदान लाभार्थीच्या बॅंक खात्यात बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यानंतर जमा केले जाते. लाभार्थीने स्वतःच्या घरकुलासाठी ९० दिवस अकुशल काम केल्यास रोजगार हमी योजने अंतर्गत २४ हजार ५७० रुपये मिळतात. तर लाभाऱ्थी कुटुंबाकडे पूर्वी शाैचालय नसल्यास किंवा या अनुदानाचा लाभ घेतला नसेल तर रोजगार हमी योजना अथवा स्वच्छ भारत मिशनमधून १२ हजार रुपये मिळतात. त्यामुळे सर्व मिळून लाभार्थीस १ लाख ५६ हजार ५७० रुपये निधी त्यांच्या खात्यात जमा केला जातो. मात्र त्या खात्यातून लाभार्थीने जे पैसे काढले. ते साहित्य व इतर कारणासाठी काढले असतील असे गृहीत धरले जाते.
सातारा जिल्ह्यात पहिला टप्पा तालुका निहाय मंजूर घरकुले जावळी ४८,कऱ्हाड ४६,खंडाळा ६५,खटाव ६०,महाबळेश्वर १७,माण १७५,पाटण ४१,फलटण ६३,सातारा ३४,
वाई ४३ अशी आहेत. वाढत्या महागाईमुळे अनेक घरकुल यांचे कामे ठप्प झालेले आहेत.
पंतप्रधान घरकुल योजना-ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत जिल्ह्यात चार हजार ६०० घरांचे उद्दिष्ट प्राप्त झाले. यामध्ये आतापर्यंत तीन हजार १७३ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर केले असून, २१० अपात्र लाभार्थींना आवास प्रणालीतून वगळण्यात आले आहे.
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार ४५ ४२२ घरकुले मंजूर झालेली आहेत .अशी माहिती राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. तर दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारकडून घरकुलासाठी मंजुरी आणल्याचे प्रसिद्ध पत्रक सातारचे खासदार उदयनराजे भोसले समर्थकांनी देऊन त्वरित प्रसारमाध्यमाकडे पाठवली आहे.
सातारा जिल्ह्याचा जर विचार केला तर गरिबाच्या नावाने आतापर्यंत बांधण्यात आलेल्या घरकुलाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे . तर काही ठेकेदार व साहित्य विक्रेत्यांची बंगले तयार झालेले आहेत. घरकुलाची काही ठिकाणी खिडक्या उघड्या पडलेल्या आहेत. दरवाजे तुटलेली आहेत. फरशी उध्वस्त झालेली आहे. उद्दिष्ट गाठले म्हणजे योजने पूर्ण केली असा डांगोरा पिटल जात आहे .पण ,प्रत्यक्षात घरकुलाची वस्तुस्थिती
फार विचित्र असून गरिबांची चेष्टा होत आहे. एवढा अल्पावधीमध्ये कमी पैशात तेवढ्या आकाराचे प्लास्टर सुद्धा होत नसताना घरकुल बांधले जातात. हाच मोठा संशोधनाचा विषय आहे. नेमके याचा लाभ मर्जीतील साहित्य विक्रेते व ठेकेदार लाभार्थींना होत आहे का? असाही प्रश्न महाराष्ट्र रिपब्लिक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. किमान या घरकुल योजनेसाठी पाच लाख रुपये दिले तर साडेतीन लाख रुपयांची तरी घरकुल चांगले होईल असाही दावा त्यांनी केला आहे. या वेळेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे राहुल माने प्रणित मोरे संतोष वाल्मिकी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
– _________________________
फोटो– मंजूर घरकुलासाठी पाच लाख रुपयाच्या तरतुदीची मागणी करताना कार्यकर्ते
(छाया- अजित जगताप सातारा)