कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-नवीन महाबळेश्वरला सरकारच्याच धोरणाने स्थानिकांचा प्रखर विरोध….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

नवीन महाबळेश्वरला सरकारच्याच धोरणाने स्थानिकांचा प्रखर विरोध….

सातारा दि: सध्या निसर्गाकडे सर्वांचा ओढा आहे. पन्नास वर्षांपूर्वी मुंबई नंतर नवी मुंबई धर्तीवर आता सातारा जिल्ह्यात नवीन महाबळेश्वरच्या प्रकल्पाकडे लक्ष वेधलेले आहे. परंतु, स्थानिक पातळीवर मेढा महाबळेश्वर जावळी पाटण या ठिकाणी प्रचंड विरोध होत आहे. एकूणच सातारा जिल्ह्यात पर्यटनाला चालना देणाऱ्या अनेक गावात स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय होत असून सातारा जिल्हा प्रशासन फक्त धनदांडग्यासाठी असल्याने या प्रकल्पाला प्रखर विरोध होत असल्याचे समोर आलेले आहे.
निसर्गरम्य परिसर व सह्याद्रीच्या रांगेमध्ये असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये विपुल साधन सामग्री आहे. नैसर्गिक वरदान लाभल्यामुळे अनेकांना सातारा जिल्ह्यातील तापोळा ,बामणोली, कास पठार, पाचगणी, महाबळेश्वर, पाटण, वाई सातारा अशा विविध भागात आपले फार्म हाऊस, हॉटेल, शेती , उद्योग असावेत. अशी स्वप्न पडू लागलेली आहेत. त्यातूनच मग स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनीवर ताबा घेण्यासाठी स्पर्धा लागलेली आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ याप्रमाणे स्थानिक दलाल सुद्धा निर्माण झालेले आहेत.
या सर्व गोष्टींचा अनुभव व नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी आराखडा तयार होणाऱ्या गावांमध्ये चलबिचल सुरू झालेले आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पात सातारा तालुक्यातील ३४, जावळी- ४६,महाबळेश्वर ६०, पाटण ९५ असे मिळून २३५ गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.
या गावांच्या सातबाराच्या नव्याने दहा वर्षात झालेल्या नोंदी पाहता अनेकांनी या ठिकाणी जमिनी घेऊन वेगळ्या पद्धतीच्या आरक्षण लाभ घेतलेला आहे. यासाठी दलालच्या हेलपाट्यामुळेसा अधिकाऱ्यांची चांदी झालेली आहे. सातारा जिल्हा प्रशासनातील महसूल, पोलीस व पर्यावरण, वनखाते यांनी अक्षरशः पायघड्या घातलेले आहेत. या सर्व गोष्टीचा स्थानिकांना प्रचंड राग असून हाच राग महाबळेश्वर व मेढा आणि सातारा पंचायत समिती येथे एम.एम. आर. डी. सी. कडून आयोजित केलेल्या बैठकीत दिसून आला.
या बैठकीला आ . शशिकांत शिंदे,आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, व त्यांचे समर्थक, माहिती अधिकाराचे कार्यकर्ते शिवाजी राऊत, शहर सुधार समितीचे अस्लम तडसरकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले, सतीश बुध्दे, एम एम आर डी चे अधिकारी तसेच संजय गायकवाड राजू भोसले, सोमनाथ जाधव, संजय कासुर्डे, विशाल धनवडे, संतोष शिंदे, प्रकाश शिंदे राजू ढेंबे, उद्योजक व विकासक श्रीधर कांग्राळकर, बाळासाहेब शिरकांडे, सुधीर शिंदे, जयंत ठक्कर ,वास्तु विशारद विपुल सा, अनुराधा जोशी, श्रेयस वाळिंबे, हर्षवर्धन टपळे, ऍड .विकास पाटील- शिरगावकर व संस्थानिक भूमिपुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ हे या प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरण असून स्थानिक विकासात तसेच स्थानिक भूमिपुत्रांचा सहभाग घेतल्याशिवाय या प्रकल्पाला कोणीही पाठिंबा द्यायच्या मनस्थितीत नव्हते. यापूर्वीच स्थानिक भूमिपुत्रांनी विकासक बनू नये. यासाठी जाणीवपूर्वक काही बंधने घातली असली तरी इतर मात्र, अतिक्रमण करून सर्व नियम धाब्यावर बसवत आहेत. त्यांच्यावर ठोस कारवाई होत नाही. या भागात पर्यटन वाढले तर रोजगार उपलब्ध होणार आहे. परंतु पर्यटक बाहेरचे आणि व्यावसायिक ही बाहेरची…. त्यामुळे भूमिपुत्र व येथील साधनसामुग्रीची काळजी घेणारे शेतकरी आणि स्थानिकांना आता या बैठकीच्या रूपाने प्रथमच आवाज उठवलेला आहे. शासन दरबारी या प्रकल्पाची माहिती उघड न करता आराखडा तयार करण्यात येणार आहे. असे काहींना अनुभव आहे. सातारा जिल्हा प्रशासन, महसूल व वन विभाग यांनी वरिष्ठ पातळीवर वस्तुनिष्ठ माहिती दिली आहे . पण स्थानिकांचे म्हणणे काय? याचे दखल घेतली नाही. असे दिसून आले आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पासाठी प्रयत्न जरूर व्हावेत. पण, कुणावर अन्याय होऊ नये. या परिसरात सुमारे ६० हजार शेतकरी व भूमिपुत्र आहेत. त्यांच्या रोजगार, नागरी सुविधांबाबत जागरूकता न दाखवणारे अनेक जण हा प्रकल्प कसा चांगला आहे. यामुळे कसा रोजगार होईल? असे चित्र निर्माण करत आहेत. या फसव्या चित्राला कोणी फसू नये. अशी मागणी प्रामाणिकपणे स्थानिक भूमिपुत्रांबद्दल काम करणारे सामाजिक कार्यकर्ते करू लागलेले आहेत. एखाद्या भागाचा विकास झाला तर त्या ठिकाणी जलद गतीने रोजगार उपलब्ध होतो. विकासामुळे आर्थिक जीवनमान उंचावते . सध्याच्या काळात पर्यटन वाढीसाठी जी गावे जाहीर केलेले आहेत. त्या गावातील लोकांना लाभ होण्याऐवजी मुठभर धनदांडगे व काही राजकीय मंडळींशी संलग्न असलेले काहींना लाभ झाल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे स्थानिकांचा वाढता विरोध होत आहे. सातारा, जावळी, महाबळेश्वर, पाटण येथील भूमिपुत्रांचा विरोध हा काही अधिकारी व राज्यकर्त्यांवरील सुद्धा असू शकतो. असे मानण्यात येत आहे. त्यामुळे नवीन महाबळेश्वर प्रकल्प हे दुहेरी शस्त्र होऊ नये .अशी मागणी या निमित्त पुढे आले आहे.


ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button