कोरेगाव:-दलित अल्पसंख्याकांच्या फाटलेल्या योजना शिवण्याचे काम आर.पी.आय. निश्चित करेल- दादासाहेब ओव्हाळ.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
दलित अल्पसंख्याकांच्या फाटलेल्या योजना शिवण्याचे काम आर.पी.आय. निश्चित करेल- दादासाहेब ओव्हाळ.
कोरेगाव दि: कोरेगाव मतदार संघामध्ये हॉटेल- धाबे यांच्या दरबार निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेला आहे. प्रस्थापित उमेदवार आणि विस्थापित प्रचारक असे चित्र आहे . कष्टकरी, दलित, बहुजन समाज व अल्पसंख्याकांच्या फाटलेल्या योजना शिलाई मशीन शिवून देणार आहे असे रिपब्लिकन पक्षाचे कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष मदन खंकाळ यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना माहिती दिली आहे.
काम प्रस्थापितांचे लोकप्रतिनिधी यांना निवडणूक म्हणजे पैशाचा बाजार समजत आहेत. या उलट विस्थापित, गरीब ,अल्पसंख्यांक, दलित यांचा फाटलेला विकास चांगल्या पद्धतीने शिवून देण्याचे काम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट नेहमीच करत आहे. त्याचा भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात मोठ्या जिद्दीने व स्वाभिमानाने उमेदवार उभे असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अ गट कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष खंकाळ यांनी सातारा येथे दिली.
संविधान निर्माता परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गट यांची भूमिका ही कधीही भांडवलदार व प्रस्थापित वर्गासाठी अनुकूल नव्हती. त्यामुळेच रिपब्लिकन पक्षाला जाणीवपूर्वक वंचित ठेवण्याचे काम प्रस्थापित व धनदांडगे राजकीय पक्षाने इमाने इतबारे केलेले आहे. अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो. आज महाराष्ट्रातील चित्र पाहिले तर नरेंद्र मोदींचा दास मनाला आठवेल तसं साठवलेले बोलत आहे. तमाम दलितांची चेष्टा लावली आहे.
या उलट रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे अध्यक्ष बाळासाहेब पवार ,उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व पक्षाच्या स्वाभिमानासाठी कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे तमाम कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हाती घेतलेली आहे.
गोरगरीब व कष्टकरी शेतमजुरांची फाटलेले कपडे शिवण्याचे काम शिलाई मशीन करत असते . त्याचा दोरा हा निष्ठावंत असावा लागतो. तर ते कापड शिवलेले कायम टिकून राहतात .आज खऱ्या अर्थाने विकाऊ कार्यकर्त्यांपेक्षा टिकाऊ कार्यकर्त्यांना समाजामध्ये मानाचे स्थान मिळत आहे.
सातारा जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात बहुजन, शेतमजूर, कष्टकरी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्यांक, दलितांचे विचारधारा टिकवण्याचे काम म्हणजे ही निवडणूक आहे. आज स्वाभिमानी रिपब्लिकन कार्यकर्ते स्वाभिमानाने वाड्या वस्ती व गावामध्ये प्रचार करत असताना अभिमानाने छाती फुलून येत आहे .याउलट आता धारी व प्रस्थापितांची प्रचार करण्यासाठी आलेल्या प्रचारकांना मतदार जाब विचारत आहेत. बाबांनो, तुमच्या ज्या हातामध्ये जे पत्रक आहे. ते कुठल्या पक्षाचे आहे? त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या व त्यांची पाय चाटणारे कार्यकर्ते खाली मान घालत आहेत. हाच आमचा विजय आहे. संख्यात्मक कार्यकर्त्यांपेक्षा गुणात्मक कार्यकर्ते आम्हाला अधिक प्रिय आहेत.
फुले शाहू आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्याग केला आहे. ते कार्यकर्त्याची इतिहासामध्ये नोंद होणार आहे. पण, ज्यांनी डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची अवहेलना केलेले आहे. त्यांच्या समवेत महायुती व आघाडी केली आहे. त्या नेत्यांनी धनशाही नेतृत्वाने त्यांची जागा दाखवलेली आहे. आज आम्ही एक संघ, एक नेता, एक मतदार, एक आवाज या भूमिकेतूनच निवडणुकीला सामोरे जात आहे . कोरेगावचे उमेदवार दादासाहेब ओव्हाळ, वाईचे उमेदवार अमित मोरे, माण खटावचे उमेदवार सनिदेव खरात, पाटणचे उमेदवार विकास कांबळे व उत्तर कराडचे सर्जेराव बनसोडे हे पाच बलदंड व पंचतत्व मानणारे कार्यकर्ते आमचे उमेदवार आहेत.
शंभर कौरवांना पाच पांडवांनी पराभव केला होता. लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या चळवळीतले पाच पांडव हा इतिहास घडवणार असल्याची माहिती जेष्ठ अभ्यासक विशाल कदम यांनी दिली आहे. या निवडणुकीमध्ये सामान्य कुटुंबांचे उपजीविकेचे साधन असणारी शिलाई मशीन सर्वांच्या आता लक्षात राहिलेली आहे. आमचा विजय हा गरिबांची चूल पेटवण्यासाठी आहे. गरिबांची शिलाई मशीन सुरू करण्यासाठी आहे. हे पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आलेले आहे. पदोपदी मिळालेला उदंड प्रतिसाद हा रिपब्लिकन पक्षाच्या भवितव्य वाटचालीसाठी उपयुक्त ठरणार आहे. अशी माहिती केशव सखाराम कांबळे यांनी दिले आहे.
——————————————
चौकट– संगमनगर येथील पाटबंधारे विभागाच्या ताब्यातील नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेतील भंगार चोरी करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात आंदोलन केले होते. आता चोरीच्या भंगार चा वाटा मिळाल्यामुळे काहीजण प्रचारात उतरले असल्याचे दिसून आले आहे. या सर्व प्रकरणाचे आता पोलिसांनी चौकशी करावी. कारण याबाबत पोलिसांवर ही आरोप करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.अशी मागणी कोरेगावचे रिपब्लिकन पक्षाचे व उमेदवार दादासाहेब ओव्हाळ यांनी केली आहे.