सातारा:-फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची आसगाव ग्रामस्थांना लागली आस..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची आसगाव ग्रामस्थांना लागली आस..
सातारा दि: सातारा तालुक्यातील यशवंत ग्रामपंचायत आसगाव (पुनर्वसीत ) या गावाने माझी वसुंधरा योजनेत अभियानात सक्रिय सहभाग घेतला .यंदाच्या वर्षी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची आसगाव ग्रामस्थांना आस लागली आहे. या विधायक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले की, आसगाव सर्व क्षेत्रांमध्ये नावलौकिक प्राप्त करावे. यासाठी ग्रामस्थांनी एकजूट दाखवलेले आहे. वास्तविक पाहता शासकीय योजना विकास कामांसाठी अत्यंत परिवर्तन वादी आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय योजनेचा लाभ मिळतो. शासकीय योजना आपल्या गावात पोहोचल्या पाहिजे. तशा पद्धतीने ग्रामस्थांची ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडताना आसगावच्या हरित गाव व स्वच्छता कायम राखण्यासाठी ऑगस्ट महिन्यातच ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेला आसगाव फटाके मुक्त, कचरामुक्त, पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला होता. वास्तविक पाहता प्रदूषण मानवी जीवनासाठी घातक ठरलेले आहे. त्याचबरोबर पशु- पक्षी व इतर जनावरांसोबतच निसर्गाचा समतोल बिघडत आहे.
मानवी संकट फार भयानक असून त्यावर मात करण्यासाठी आता मानवी स्वभावाचेच औषध लागू होणार आहे. यासाठी माझी वसुंधरा अभियान रामबाण उपाय ठरलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा (माय अर्थ) हा पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
भारतातील पहिला एकात्मिक उपक्रम आहे. जो निसर्गाच्या पंचमहाभूतातील पाचही घटकांवर लक्ष केंद्रित करतो. त्यात भूमी (जमीन), जल (पाणी), वायू (हवा), अग्नी (ऊर्जा), आकाश (संवर्धन) यांचा समावेश असून त्यातून राज्याच्या शाश्वत विकासाप्रति प्रयत्न केले जातात.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना वातावरणीय बदल आणि पर्यावरणीय समस्यांच्या परिणामांची जाणीव करून देणे आणि पर्यावरण सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. हाच आता आसगावकरांचा प्रमुख उद्दिष्ट ठरलेले आहे.
वास्तविक पाहता मनशांतीसाठी आज शहरात राहणारे लोक ग्रामीण भागात येत आहेत .कारण, ग्रामीण भागामध्ये ध्वनी प्रदूषण नसते पण अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असल्याने त्यावर सुद्धा नियंत्रण आणण्याची भूमिका ग्रामस्थ घेत आहेत. या विधायक उपक्रमासाठी गावचे प्रथम नागरिक सरपंच सुनंदा शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी अनुजा भगत, ग्राम सदस्य हर्षल शिंदे, रेश्मा शिंदे ,आशा शिंदे, हिरालाल शिंदे, लता शिंदे, प्रभा कांबळे, बाजीराव शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कृष्णदेव शिंदे आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सर्व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.
आधी केले आणि मग सांगितले. या प्रमाणे सध्या गावामध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावचा विकास करण्यासाठी महिला पुढाकार घेत आहेत. बांबू लागवड, इंधन बचत तसेच कुऱ्हाड बंदी, प्लास्टिक बंदी अशा विविध उपक्रमाने गावचे गाव पण टिकवण्यासाठी प्रयत्न होत आहेत .अनेकांना गड्या आपला आस गाव बरा अशी म्हणण्याची वेळ आसगावकरांनी आणलेले आहे. पूर्वी शहरातून येणारी लोक एक ते दोन दिवस थांबत होते. आता आठवडाभर आसगावला थांबून नैसर्गिक आनंद घेत आहेत.आसगावचे काही मूळ रहिवासी शहराकडे धाव घेत आहेत. शहरांमध्ये व्यवसाय, रोजगार, नोकरी निमित्त जावे लागत असताना सुद्धा अनेकांचे आसगावच्या विधायक उपक्रमाला मोलाचे सहकार्यबाबत आहे. या विधायक उपक्रमासाठी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले, अर्चना वाघमळे, सातारचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे ,सहाय्यक अधिकारी पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक विधायक उपक्रम राबविण्यात येत असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक सूचनांचे पालन करण्यासाठी ग्रामस्थांचा उत्स्फूर्तपणे सहभाग लाभत आहे . आसगाव ग्रामपंचायत नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी ठरणार आहे. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
फोटो- आसगाव माझी वसुंधरा अभियानातील रॅली