सायगाव:-(सातारा)-महायुतीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांना मताधिक्य देण्यासाठी सायगाव भाग सज्ज -प्रवीण देशमाने.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
महायुतीचे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांना मताधिक्य देण्यासाठी सायगाव भाग सज्ज -प्रवीण देशमाने.
सायगाव दि: सातारा- जावळी मतदार संघाच्या प्रचार यंत्रणेचा शुभारंभ जावळी तालुक्यात झालेला आहे. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी सायगाव भाग सज्ज झालेला आहे. असे प्रतिपादन युवा नेते प्रवीण देशमाने यांनी प्रभूची वाडी ता. जावळी या ठिकाणी झालेल्या मेळाव्यात व्यक्त केले.
भाजप बूथ शक्तिस्थळ प्रमुख प्रभूची वडी येथील मेळाव्याला केंद्रीय निरीक्षक धनंजय चव्हाण, ज्येष्ठ मार्गदर्शक अंकुशराव शिवणकर, ऍड .शिवाजीराव मर्ढेकर ,राजेंद्र फरांदे- पाटील व संदीप गायकवाड व स्थानिक नेतेगण मंडळी उपस्थित होते.
सायगाव भागातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून या ठिकाणी भाजप उमेदवारांनी केलेल्या कामाचे त्यांनी मनापासून कौतुक केले. महायुतीच्या माध्यमातून एकजूट दिसून येत आहे. ज्या उमेदवारांना मताधिक्य जास्त मिळणार आहे. त्यांचा वरिष्ठ पातळीवर पक्षश्रेष्ठी विचार करून त्यांना महत्त्वाची पद देतील. असा विश्वास यावेळी भाजप नेत्यांनीही बोलून दाखवल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दिली.
गेली दहा वर्ष सातारा जावळी मतदारसंघांमध्ये सातत्याने संपर्क ठेवून काम करणाऱ्या भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कमळ चिन्ह घरोघरी पोहोचवले आहे. लोकशाहीमध्ये सर्वांना समान वागणूक देणाऱ्या भाजपचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मताधिक्य देणे. हे आता मतदारांचे कर्तव्य नव्हे तर अधिकार बनलेला आहे. याची खात्री जावळी तालुक्यातील सायगाव भागात मिळाली आहे.
सातारा लोकसभेला काही विरोधकांनी जाणीवपूर्वक प्रचार यंत्रणा राबवताना फेक नरेटीव्हचा प्रचार केला होता. त्यामुळे आता प्रचार करताना वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक कार्यकर्त्यांची जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असल्याचे मनोगत युवा नेते जयदीप शिंदे सौरव शिंदे व शांताराम नाना पवार यांनी व्यक्त केले.
भाजप पक्ष निरीक्षक धनंजय चव्हाण यांनी राम आणि रवी निवडणुकीत उभे होते. रवीने रामाच्या घरापासून प्रचारला सुरुवात करत असल्याने रवीचा एका मताने का होईना विजय झाला . अशा शब्दात चांगले प्रबोधन केले. जे मताधिक्य मिळवून देतील त्यांचा सन्मान राखला जाईल. असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला विष्णू मोरे, पृथ्वीराज कदम, बाळासाहेब देशमुख, स्वप्निल डोंबे, रवी ससाणे, बापू नलवडे, आगुंडे गुरुजी, मुरलीधर शिंदे, मी वडार महाराष्ट्राचा जावली तालुका अध्यक्ष संतोष पिसाळ, डॉ. विकास फरांदे ,अतिश फरांदे, शरद निकम, भानुदास गायकवाड, भाजप तालुका अध्यक्ष श्रीहरी गोळे ,जिल्हा संघटक सयाजी शिंदे, सोन्या पवार, तसेच सायगाव, खर्शी तर्फ कुडाळ मोरघर ,महि गाव, दूदुस्करवाडी, पवारवाडी, दरे , महामुलकरवाडी, मेरुलिंग, येरुणकरवाडी व आनेवाडी, कुडाळ, मेढा परिसरातील नेतेगन मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेते मच्छिंद्र मुळीक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
——————————————–
केंद्रीय निरीक्षक श्री चव्हाण यांचा सत्कार करताना मान्यवर (छाया- अजित जगताप ,सायगाव)