ताज्या घडामोडी

सातारा:-साताऱ्यातील आठ मतदारसंघात आता मतदारांची गाठ.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यातील आठ मतदारसंघात आता मतदारांची गाठ.

सातारा दि : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात आता थेट मतदारांशी गाठ पडणार आहे .महागाई, बेरोजगारी व कृत्रिम विकास की सकारात्मक विकास याचा निर्णय आता मतदारांच्या हाती आलेले आहे. अवघ्या ४३ दिवसात प्रचाराची रणधुमाळी होत असली तरी प्रस्थापितांना पुन्हा संधी मिळेल असे संकेत मिळत आहे.
एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वातंत्र्य सैनिक किसन वीर आबा, बाळासाहेब देसाई यांचा शब्द पाळणारी पिढी राजकारणात सक्रिय होती. जातीपातीच्या पलीकडे जाऊन समाज म्हणून मतदारांकडे पाहिले जात होते. अलीकडच्या काळामध्ये जात फॅक्टर उदयास आला असून त्याचा छुपा प्रचार सुरू आहे. याला कोणताही मतदारसंघ अपवाद नाही.
सध्या सातारा जिल्ह्यामध्ये १३ लाख ३१ हजार २५४ पुरुष व बारा लाख ९७ हजार ५०५ महिला आणि ११२ तृतीयपंथी असे मिळून २६ लाख २८ हजार ८७१ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील आमदारांचे पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट व राष्ट्रीय काँग्रेस प्रत्येकी एक ,भारतीय जनता पक्ष व शिवसेना प्रत्येकी दोन आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन असे आठ मतदार संघात पक्षीय भूमिका घेऊन विजयी झालेले आमदार आहेत .आता त्यांच्यामध्ये चांगलीच फाटाफूट झाली आहे . प्रत्येकांना ही निवडणूक विकास कामांपेक्षा त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मतदारांच्या मनात काय आहे? हे स्पष्ट होणार आहे.
मागील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये २०१९ साली अवघ्या ३०४३ मतांनी विजयी झालेले भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे काठावर पास झाले असून गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी चांगला अभ्यास केल्यामुळे त्यांच्या मदतीला एकास एक उमेदवार ऐवजी अनेक इच्छुक असल्यामुळे त्यांनाही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे युवा नेते शेखर गोरे यांची उमेदवारी म्हणजे विजयाच्या पायघड्या ठरणार आहेत.
फलटण मतदारसंघात निंबाळकर घराण्यातील प्रस्थापितांच्या राजकीय वादविवादामध्ये सामान्य कुटुंबातील शिक्षक व फलटण राखीव मतदार संघातील आ. दीपक चव्हाण यांना भूमिका घेताना पक्षापेक्षा नेत्याचीच मर्जी सांभाळावी लागत आहे . त्यामुळे मांजरांचा खेळ होतो पण उंदरांचा जीव जातो अशा पद्धतीने या निवडणूक निकालानंतर त्यांची आमदार की टिकणार की जाणार? याची सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. त्यांच्या विरोधात सक्षम उमेदवार देण्यासाठी आता अजित पवार गटाने ही चांगलीच फिल्डिंग लावलेली आहे. भाजपचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे व युवा नेते सुशांत निंबाळकर यांच्यासह अनेक मातब्बर मंडळी आ. दीपक चव्हाण यांच्या पराभवासाठी आतापासूनच चांगला चिखल तयार करून त्यात कमळ उगवण्याची काळजी घेत आहेत .
कराड उत्तर मतदारसंघात गेल्या वेळी बाळासाहेब पाटील यांनी ४९ हजार २१५मताची आघाडी घेऊन अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांना रोखून धरले होते. सातारा जिल्ह्याचे संयमी पालकमंत्री म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. तसेच त्यांना कराड तालुक्यातून मोठा पाठिंबा असल्याने त्यांना सुद्धा या निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे त्याचा त्यांना निश्चितच फायदा होणार आहे.
कराड दक्षिण मधून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर त्यांना पक्षातूनच ॲड. उदयसिंह विलासराव पाटील उंडाळकर यांनी आव्हान दिल्यामुळे त्यांचे मताधिक्य ९१३० पर्यंत आले होते .आता राजकीय परिस्थिती बदलली असून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांचेही पारडे जड दिसू लागलेली आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघात राज्याचे वजनदार मंत्री शंभूराज देसाई हे शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी गेल्या वेळी १४,१७५ मतांनी सोपा विजय संपादन केला होता. यंदाही पुन्हा त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सत्यजित पाटणकर हे उमेदवार असणार आहेत .या मतदारसंघात शिवसेनेचे भानू प्रताप तथा हर्षल कदम यांची भूमिका शंभूराजे देसाई यांच्या विजयासाठी अवघड घाट ठरणार आहे.
वाई मतदार संघामध्ये किसनवीर सहकारी साखर कारखान्यासाठी अजितदादा पवार गटाकडे गेलेले आ .मकरंद पाटील यांनी पारंपारिक स्पर्धक माजी आमदार व भाजपमध्ये प्रवेश केलेली मदन भोसले या भाजप उमेदवारांचा ४३६४७ मताने पराभव केला होता. यंदा राजकीय समीकरण बदलली असली तरी आ. मकरंद आबा पाटील यांचे बंधू खासदार नितीन काका पाटील यांना खासदारकी बहाल केल्याने ही निवडणूक अवघड वाटत नाही. कारण त्यांच्याकडे असलेली मॅनेजमेंट ही कधीही फेल झालेली नाही. पाच वर्षांनी दाम दुप्पट खर्च करून ते निवडून येऊ शकतात. त्यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ज्यांची नावे येतात. त्यांच्या करिष्मा वाई- खंडाळा- महाबळेश्वर असा व्यापक दिसून येत नाही. निवडणुकीसाठी जी तयारी करावी लागते त्याचा खूप मोठा अभाव त्यांच्यामध्ये आहे याची त्यांनाही जाणीव आहे.
कोरेगाव मतदार संघामध्ये शिवसेनेचे आ .महेश शिंदे यांनी माजी मंत्री राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचा ६२३२ मताने निसटता पराभव केला होता. त्यांच्या विजयाने खऱ्या अर्थाने कोरेगाव मतदार संघामध्ये चैतन्य निर्माण झाले होते .परंतु त्यांच्या प्रत्येक कृतीकडे एक वेगळा दर्प चढला आहे. त्यामुळे अनेक जण नाराज झाले असले तरी सत्तेची उब आपल्याला उपयोगी पडेल म्हणून त्यांच्यासोबत आहेत. ही सूज या निवडणुकीत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या उलट आमदार शशिकांत शिंदे यांनी पाच वर्षाच्या काळामध्ये सातत्य टिकवून ठेवलेले आहे. या मतदारसंघात चमत्कार घडला तर आश्चर्य वाटणार नाही.
आमदार महेश शिंदे सोबत मूळचे शिवसैनिक नसल्यामुळे निष्ठावंत शिवसैनिकांना सोबत घेऊन आ.शशिकांत शिंदे यांना ही खिंड लढवावी लागणार आहे. ही त्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. तर आमदार महेश शिंदेंसाठी सातारचे दोन्ही राजे सज्ज झालेले आहेत. परंतु, लोकसभा निवडणुकीत राजेंचे घटलेले मतदान हे सुद्धा कारणीभूत ठरणार आहे.
सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना एक लाख १८ हजार ५ मते पडली असली तरी त्यांच्या विरोधात सुमारे ८० हजार मतदान झालेले आहे.४३४२४ मताधिक्य त्यांना मिळाले असले तरी दोन्ही राजे एकत्र आले आहेत. पण, कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत की नाहीत ?हे मतदानानंतर स्पष्ट होणार आहे.
या मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी असली तरी त्यांचा व्यक्तिगत करिष्मा हा त्यांच्या विजयासाठी कोणतीही अडचण निर्माण करणार नाही. त्यांचे मताधिक्य वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर बलाढ्य प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्यांना ही निवडणूक म्हणजे एक औपचारिकता ठरणार आहे. याची सुद्धा आता चर्चा सातारा जावळी मध्ये सुरू झालेली आहे.
या सर्व जर तर च्या गोष्टी असल्या तरी सातारा जिल्ह्याचे सुपुत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच त्यांनी मराठा आरक्षण वगळून घेतलेले अनेक निर्णय याचा महायुतीला फायदा होईल. असे सध्या तरी दिसत नाही. याउलट महाविकास आघाडीकडे सहानुभूतीने पाहिले जात आहे. शेवटी कोण कुणाची तुतारी फुकणार? कोण कुणाच्या हातामध्ये मशाल किंवा धनुष्यबाण देऊन दुसऱ्या हातात कमळ घेणार? हे सर्व चित्र २० नोव्हेंबर च्या मतदानानंतर २३ नोव्हेंबर च्या निकालाने स्पष्ट होणार आहे. वास्तविक पाहता प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त झालेली असून किमान सामान्य नागरिकांना कामांसाठी हेलपाटे वाचलेले आहेत. आता हे हेलपाटे पुन्हा निवडणूक संपल्यानंतर मारावे लागणार आहे. त्यात फारसा बदल होणार नाही. कारण, सत्ताधाऱ्यांच्या इशारावर नाचणारे प्रशासन अशी प्रतिमा झालेली आहे. त्याचा फायदा आता महाविकास आघाडी कशा पद्धतीने घेत आहे. याकडे आता एक नजर मारावी लागेल. तूर्त हा नुसता अंदाज असून कधी कधी अंदाज सुद्धा फसले जातात. काल आचारसंहिता लागू होताच आज पासून आपापल्या कामासाठी इसार घेणाऱ्यांची गर्दी इच्छुक उमेदवारांकडे वाढलेली आहे. त्यामुळे त अंदाज अपना अपना वाटत आहे. अंध व्यक्तीने बघितलेल्या हत्ती सारखे त्यांना वर्णन दिसू लागलेले आहे. हे सुद्धा आचारसंहितेचे पालन करण्यासाठी नेमलेल्या यंत्रणेला पहावे लागत आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button