दहिवडी:-वंचितच्या उमेदवारीने माण खटावच्या राजकारणाला गती….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
वंचितच्या उमेदवारीने माण खटावच्या राजकारणाला गती….
दहिवडी दि: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहे. प्रत्येक इच्छुक उमेदवार श्रेय वादातून जाहिरात बाजी करत आहेत . कोणतीही जाहिरात बाजी न करता सामान्य माणसांची जातीपातीच्या पलीकडे जाऊन कामे करावीत. राजकारणातून सुदृढ विचारसरणी असलेला समाज घडवावा. या दृष्टीने प्रयत्न करणारे वंचितने माण खटाव मधून उमेदवारी जाहीर केली आहे. या राजकीय खेळीने राजकारणाला गती आलेली आहे. माण -खटाव विधानसभा मतदारसंघांमध्ये दुष्काळी भाग अशी अवहेलना होत होती. परंतु, त्या ठिकाणी अनेक बुद्धिमत्तेच्या जोरावर हिरे रत्न तयार झालेले आहेत. सर्वाधिक प्रशासकीय अनुभव असलेल्या या माण खटाव तालुक्यामध्ये राजकीय नेतृत्व उभे राहणे फार सोपे नव्हते. कारण, या ठिकाणी स्वावलंबी नेतृत्व नसल्यामुळे बाहेरचे नेतृत्व स्वीकारावे लागत होते. याला खऱ्या अर्थाने छेद देण्याचे काम येथील सुज्ञ मतदारांनीच केले. आजच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रभावी नेतृत्व म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड .प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिले जाते. राजकारणात काही समाजाला गृहीत धरून प्रस्थापित मंडळी राजकारण करतात. त्यांना त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत दाखवण्याची किमया सध्या होत आहे.
आंबेडकरवादी नेते व मान तालुक्यातील सुपुत्र इम्तियाज भाई नदाफ यांची उमेदवारी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केली आहे. ते माण तालुक्यातच राहून माण – खटाव च्या लोकांचा विकास व्हावा.यासाठी झटत आहेत.त्यामुळे माण खटाव मध्ये चैतन्य पसरलेले आहे. याउलट काही जण पुणे, सातारा शहरात बंगल्यात राहून माण खटावच्या विकासच्या गप्पा मारत आहेत. हे सुद्धा नमूद करावे लागत आहे.
सातारा जिल्ह्यात सर्व आंबेडकरवादी विचारवंत व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांचे पुन्हा एकदा विचार मंथन सुरू झालेले आहे. वास्तविक पाहता माण खटाव मतदारसंघाची रचना पाहिली तर इतर मागासवर्गीय उमेदवारांची संख्या ५० ते ५५ हजार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय मतदारांची संख्या ३५ ते ४० हजार आहे आणि उर्वरित साठ टक्के सर्वसाधारण मतदार आहेत . धनगर, वंजारी, लोणार या जातीचेही प्राबल्य आहे.२००८ च्या पुनर्रचनेनंतर खऱ्या अर्थाने अपक्ष ,राष्ट्रीय काँग्रेस व भाजप अशा तीन घटकातून निवडून आलेले भाजप विचारवंत नेते आ. जयकुमार गोरे हे चौथ्यांदा निवडून येण्यासाठी आटोकाठ प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना यश मिळेल की नाही? हे ठरवण्याचा अधिकार वंचित बहुजन आघाडीला मिळालेला मतांवरच अवलंबून राहणार आहे.
वास्तविक पाहता वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते असलेले आंबेडकरी चळवळीतील खंदे समर्थक इम्तियाज भाई नदाफ यांच्या उमेदवारीने वंचित चेहरा समोर आणलेला आहे.
माण तालुक्यातील आंधळी ग्रामपंचायती पासून आपल्या सार्वजनिक जीवनात सुरुवात करणाऱ्या इम्तियाज भाई नदाफ यांनी बामसेफ पासून प्रामाणिकपणाने व निस्वार्थीपणे फुले- शाहू- आंबेडकर विचारांची कास धरलेली आहे. बहुजन समाजातील पुरोगमी विचारवंतांची व्याख्याने देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केलेली आहे .बहुजनवादी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. घरातच वारकरी संप्रदायाची घट्ट पकड असल्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची प्रतिमा चांगली करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत.
माण खटाव मतदारसंघात मुस्लिम समाजाचे मतदार कमी असले तरी वैचारिक भूमिका घेऊन मतदान करणारा हा समाज आता खऱ्या अर्थाने वंचित घटकापासून जोडला गेलेला आहे. आतापर्यंत प्रस्थापित मंडळींनी वंचित समाजातून स्वावलंबी पणाने कधीही नेतृत्व उभं राहू नये. यासाठी प्रयत्न केला. आता वंचितने इम्तियाज नदाफ यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाकडे आता राजकीय नेते सुद्धा लक्ष देऊ लागलेले आहेत. माण- खटाव चा दुष्काळ निवारण व्हावा. यासाठी अनेक नेते गण मनापासून प्रयत्न करत होते. आजही रस्त्यावरील आंदोलन असो किंवा चळवळ असो जिवंत ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज नदाफ सारखे अनेक कार्यकर्ते प्रामाणिकपणाने झटत आहेत. या ऐतिहासिक निवडणुकीत त्यांना मतदारांची सुद्धा साथ मिळणार आहे. माण – खटाव च्या मातीमध्ये कर्तव्यवादी व फुले- शाहू – आंबेडकरवादी कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यामुळे या विधानसभा निवडणुकीकडे सकारात्मक दृष्ट्या पाहणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज व इतर विचारवंतांचा वारसा सांगणारे इम्तियाज भाई नदाफ यांच्या रूपाने सक्षम उमेदवार लाभलेला आहे. गावगाड्यातील सर्वसाधारण घटक व इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त जाती- जमाती, अनुसूचित जाती व सर्व घटकांना न्याय देण्यासाठी आतापर्यंत वंचितनेच प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहेत .
सध्या सकल मराठा क्रांती मोर्चात सामील होऊन मराठा समाजाला न्याय मिळावा. अशी भूमिका काही संधीसाधू चांगल्या पद्धतीने हाताळतात. तेच नेते इतर मागासवर्गीय समाजाच्या आंदोलनातील सहभागी होऊन आमचा पाठिंबा आहे. हे दर्शवण्याचा प्रयत्न करतात. पण कधीही दोन्ही समाजाने केलेल्या मागणीचा जाहीरपणाने ते उल्लेख करत नाहीत. याउलट वंचित वंचित चे इम्तियाजभाई नदाफ यांची भूमिका स्पष्ट आहे.
मराठा समाजाला नक्कीच आरक्षण द्यावे परंतु इतर मागासवर्गीय समाजाच्या कोट्यातून ते आरक्षण देऊ नये. अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. आणि त्या भूमिकेशी ठाम सुद्धा आहेत. या उलट काही इच्छुक उमेदवार व नेते हे भूमिका घेताना मराठा व ओबीसी समाजात गेल्यानंतर वेगवेगळे रूप दाखवून देतात. आता निवडणुकीच्या तोंडावर साडेचार वर्षे ज्यांनी कर्तव्य शून्य कामगिरी करून समाजामध्ये त्रास देण्याचाच व छुपा जातीवाद करण्याचा प्रयत्न केला. आज तीच मंडळी या निवडणुकीमध्ये मताचा जोगवा मागत आहे. परंतु, आता वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी असल्यामुळे अनेकांचे स्वप्न भंग होणार आहे.
आता बहुजन समाजातील काही मतदारांचे मत असे आहे की, आमच्या धडावर आमचेच डोकं असावे. या दृष्टीने या निवडणुकीमध्ये वंचित फॅक्टर आज खऱ्या अर्थाने राजकारणात रंगत आणणार आहे. हे सुद्धा स्पष्ट झालेले आहे.
———————————————
महत्वाची चौकट—– माण खटाव विधानसभा मतदारसंघात २०१९ साली झालेल्या मतदानामध्ये भाजपचे विजयी उमेदवार आ. जयकुमार गोरे यांच्या विरोधात १ लाख ३६ हजार ३१७ मत पडली होती. त्यामध्ये अपक्षांना १० हजार ३५२ व अवघ्या ३०४३ मताधिक्याने आ. गोरे निवडून आले होते. याचाच अर्थ भाजपचे आ. जयकुमार गोरे यांना ९१ हजार ४६९ मिळाल्यामुळे ते विजय झाले होते. पण, त्यांना मिळालेल्या मता पेक्षा त्यांच्या विरोधातील मते सर्वाधिक आहेत . याचा बोध आ. गोरे यांना विरोध करणारे घेणार नाहीत. हे सूर्य प्रकाश इतके स्वच्छ आहे. हेच महायुतीसाठी बेरजेचे राजकारण ठरणार आहे. आमदार गोरेंना प्रस्थापित वर्गातील विरोधकच अनुकूल वातावरण तयार करून देत असल्याचेही चर्चा होत आहे. त्या अर्थाने ए पासून झेड पर्यंतची टीम सध्या कार्यरत झाल्याचे दिसून येत आहे.