वाई:- वक्तृत्व कला हा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा सुंदर दागिना आहे – सरोजकुमार मिठारी.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि. 10
वक्तृत्व कला हा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा सुंदर दागिना आहे – सरोजकुमार मिठारी.
विद्यार्थ्यांनी प्रयत्नपूर्वक साधना करून वक्तृत्व कलेचे कौशल्य आत्मसात केले पाहिजे, वक्तृत्वाच्या साथीनेच आपल्या कर्तुत्वाला झळाळी प्राप्त होते’ असे उद्गार अखिल भारतीय मराठी विश्वकोश कार्यालयातील विद्याव्यासंगी सहाय्यक (संपादक) मा. सरोजकुमार मिठारी यांनी काढले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित देशभक्त आबासाहेब वीर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेच्या उदघाटन समारंभा मध्ये ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे होते. जनता संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी आणि ज्येष्ठ संचालक श्री सुरेश यादव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बाळासाहेब कोकरे पर्यवेक्षक श्री अर्जुन जाधव स्पर्धा संयोजक सौ. गौरी पोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे हे ५४ वे वर्ष होते आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये श्री. सरोजकुमार मिठारी पुढे म्हणाले की वक्तृत्व कलेमुळेच नेतृत्व गुणांचा विकास होतो,ही कला आत्मसात करण्यासाठी विविध विषयावरील पुस्तकांचे सतत वाचन केले पाहिजे. उत्तम वक्ते हेच समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य करीत असतात.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मा. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, वक्तृत्वाच्या जोरावर यशाची उंच शिखरे सहज गाठता येतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी मनाची एकाग्रता साध्य करावी, अभ्यास ध्यानधारणा आणि सतत सराव यांच्या जोरावर वक्तृत्वाचे कौशल्य आत्मसात करता येते. विद्यार्थी दशेतूनच वक्तृत्व कलेची आवड निर्माण झाल्यास भविष्यामध्ये समाजसुधारक आणि राजकीय नेते यांची मांदियाळी तयार होईल. याच हेतूने या महाविद्यालयाने गेली ५३ वर्ष हा यज्ञ अखंड चालू ठेवला आहे.
दुपारच्या सत्रात बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषकांचे वितरण करण्यात आले.या स्पर्धेत इ ५ वी ते ७ वी या गटा मध्ये आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मेडीयम स्कुल मधील रुदरांश जगताप याने प्रथम क्रमांक, राजेंद्र विदयालय खंडाळा मधील सारंग गर्जे याने द्वितीय क्रमांक, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी विद्यालय मधील वेदराज अनपट याने तृतीय क्रमांक,ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल वाई मधील स्मरणिका मांढरे हिने चतुर्थ क्रमांक तर प्रियदर्शनी गर्ल्स हायस्कूल भुईंज मधील आरोही गायकवाड हिने पाचवा क्रमांक मिळवला.
इ ८ वी ते १० वी या गटा मध्ये राजेंद्र विदयालय खंडाळा येथील वैष्णवी विलास जाधव हिने प्रथम क्रमांक,कन्या शाळा वाई येथील प्राची खरात हिने द्वितीय क्रमांक, ब्लॉसम चिल्ड्रेन्स अकॅडमी वाई येथील कौस्तुभ हगीर याने तृतीय क्रमांक, मालोजीराजे विद्यालय लोणंद येथील यश संतोष क्षीरसागर यांनी चतुर्थ क्रमांक तर लक्ष्मीबाई वीर माध्यमिक विद्यालय शेंदुरजणे मधील सिद्धी दिगंबर निकम हिने पाचवा क्रमांक मिळवला.
कार्यक्रमाचे आरंभी देशभक्त आबासाहेब वीर, प्रतापराव भोसले (भाऊ) आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाची विद्यार्थीनी भक्ती वायदंडे हिने शारदास्तवनाचे गायन केले. सौ.गौरी गोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
छोट्या गटासाठी मंदा पवार, स्नेहल पाटणे, मोठ्या गटासाठी अरुण सोनकांबळे,दीक्षा मोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले .नीलिमा महाडिक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शिवाजी जाधव यांनी पारितोषकांच्या यादीचे वाचन केले, दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले तर संतोष दोरके यांनी सूत्रसंचालन केले.
वाई खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील विविध माध्यमिक विद्यालयांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेसाठी सहभाग नोंदविला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सतीश तावरे,राजन करपे, उमेश आडुळकर प्रवीण मोरे नितीन कस्तुरे,श्रावण पवार, हरेश कारंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. समिती मधील सर्व सहकारी प्राध्यापक प्रशासकीय अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.