सातारा:-शिवसेनेच्या आंदोलनाने वाढे पुलावर संतप्त आंदोलकांनी केले वृक्षारोपण…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
शिवसेनेच्या आंदोलनाने वाढे पुलावर संतप्त आंदोलकांनी केले वृक्षारोपण…
सातारा दि: सातारा शहरा नजीक असलेल्या सातारा लोणंद रस्त्यावरील राजकीय दृष्ट्या जागृत असलेल्या वाढे येथील वेण्णा पुलावर आज शिवसेना व ग्रामस्थांनी चांगलेच आंदोलन केले व खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करून संताप व्यक्त केला. या रस्त्याची नेमकी दुरुस्ती कुणाकडे आहे हे मात्र अद्यापही गुलदस्त्यात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा तालुक्यातील वाढे फाटा येथे वेण्णा नदीच्या पुलावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत . या ठिकाणी नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे मानवनिर्मित अपघात होत आहेत. अनेकांना जायबंदी व्हावे लागले. वाहनांचे तर प्रचंड नुकसान होत आहे. मुळातच या भागाचे नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी महायुतीशी संलग्न आहेत भाजपचे खासदार व मुख्यमंत्री गटाच्या शिवसेनेचे आमदार असून सुद्धा या रस्त्याच्या बाबत न्याय मिळत नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थ व शिवसैनिकांनी हाती मशाल घेऊन आंदोलन केले.
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)उपजिल्हाप्रमुख दत्ताभाऊ नलावडे यांच्या नेतृत्वाखाली वाढे येथे वेण्णा नदी पुलावर रस्त्यातच वृक्षारोपण करून मुर्दाड प्रशासनाचा निषेध केला . यावेळी दत्ताभाऊ नलावडे, रमेश बोराटे संभाजी वाघमले , वाढे उपसरपंच ज्ञानेश्वर नलावडे व ,श्रीकांत नलावडे , मनोज नलावडे, युवराज नलावडे,गणेश नलावडे, गणेश अहिवळे,रवींद्र शेळके,सागर नलावडे, अण्णा निगडे, सागर नलावडे ,सुजित जगताप, साहिल पिसाळ ,उमेश नलावडे , शशिकांत घाडगे व वाढे परिसरातील वाहन चालक आणि ग्रामस्थ व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते. पुणे व कोल्हापूरकडे जाणारी अवजड वाहने व इतर वाहनांना आनेवाडी टोल नाका चुकवण्यासाठी या मार्गाचा वापर करतात. त्यामुळे रस्ता मोठा प्रमाणात खराब झाला असून स्थानिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींकडे याबाबत स्थानिकांनी सातत्याने गाऱ्हाणी मांडली जातात. पण या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत लोकप्रतिनिधी असो किंवा ठेकेदार व दलाल आणि प्रशासनातील काही भ्रष्टाचाराचे महामेरू यांना त्याचे काही ही सोयर सुतक नसल्याने आगामी विधानसभेच्या निवडणुकीत वडाचे तेल वांग्यावर निघण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेने आंदोलन केल्यामुळे अनेक वाहन चालकांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत . सध्या कोसळणाऱ्या पावसामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून हा आदिवासी भाग म्हणून परिचित होऊ लागलेला आहे अशी टीका विरोधक करत आहेत.
—————————————–
चौकट— वाढे फाटा व महामार्गावर शुभेच्छाचे फलक लावणाऱ्यांच्या नेत्यांच्या निष्क्रियपणाची ओळख म्हणून अशा फलकाकडे आवर्जून पहावे लागत आहे. अशी माहिती काही ग्रामस्थ व नियमित प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी दिली.