सातारा:-साताऱ्यातील भिमाई स्मारकासाठी धावले हिंगोलीचे शिवसेना आ.बांगर …..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यातील भिमाई स्मारकासाठी धावले हिंगोलीचे शिवसेना आ. बांगर …..
सातारा दि: महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाई यांचे साताऱ्यात दि:२० डिसेंबर १८९६ रोजी आजारपणाने निधन झाले. साताऱ्यात अंतिम विधी करण्यात आला. त्याजागी आता भिमाई स्मारक उभारण्यात येत आहे. परंतु, त्याला गती मिळत नसल्याने अखेर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हिंगोली जिल्ह्यातील धडाडीचे कळमनुरी विधानसभेचे आ. संतोष बांगर यांनी आता धाव घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते व आंबेडकर अनुयायी भीमराव सावतकर यांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आ. बांगर यांनी भेट घेऊन याबाबत तातडीने हालचाली सुरू करण्यात आल्यामुळे आंबेडकर अनुयायांमध्ये सकारात्मक वातावरण निर्मिती झालेली आहे.
रामजी व भीमाबाई या दांपत्यांना १८९१ पर्यंत चौदा अपत्य झाली होती. त्यापैकी गंगा, रमा, मंजुळा, व तुळसा या चार मुली जीवंत राहिल्या होत्या. मुलांपैकी बाळाराम, आमंदराव, व भीमराव ही तीन मुले जिवंत होती. भीमराव सर्वात लहान व चौदावे अपत्य होता. भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव ‘भिवा’ असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. इ.स. १८९४ मध्ये सुभेदार रामजी सकपाळ इंग्रजी सैन्यातील मुख्याध्यापक पदाच्या नोकरीवरून निवृत्त झाले आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या मूळ गावाजवळीत दापोली या गावातील ‘कॅम्प येथे आले.त्यानंतर १८९६ साली रामजी आंबेडकर आपल्या कुटुंबास दापोली सोडली व सातारा येथे राहण्यात आले.या ठिकाणी त्यांनी कबीर पंथाची दीक्षा घेतली इसवी सन १८९६ मध्ये मस्तक शुळ या आजाराने मा माता भिमाई यांचे निधन झाले. त्यावेळी भीमराव आंबेडकर हे पाच वर्षाचे होते.
विद्या विभूषित झाल्यानंतर अनेकदा डॉक्टर आंबेडकर यांनी सातारच्या भेटीच्या वेळेला जरंडेश्वर नाका येथील महसनवाटा डोक या जागी जाऊन आपली माता भीमाबाई यांच्या समाधीचे दर्शन घेतल्याची नोंद आहे. याच जागेमध्ये भिमाई स्मारक व्हावे यासाठी दोन भीमाबाई आंबेडकर प्रतिष्ठान उभे राहिले त्यापैकी एक मुंबईचे काँग्रेस माजी नगरसेवक आर. एन. चव्हाण मास्तर व ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक प्रा. पार्थ पोळके यांनी प्रयत्न केले पण न्यायालयात प्रक्रियेमध्ये स्थगिती आदेश आल्यामुळे हे काम रखडले. दिनांक 9 मे 1889 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेब व स्थानिक मंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये या स्मारकाचे भूमिपूजन करून दोन लाख ५७ हजार रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर पुढे न्यायालयीन प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे हे काम रखडले आहे. असा आरोप आता काँग्रेस व राष्ट्रवादीच्या त्या काळच्या सरकारवर केला जात आहे.
याच भिमाई स्मारकासाठी आता डोमेस्टिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश प्रवक्ता व सातारचे माजी नगरसेवक अमर गायकवाड व ऍड .विलास वहागावकर, अनिल वीर, प्रा. अरुण गाडे, पत्रकार अजित जगताप व इतर सहकारी प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर पत्रकार महेश नलावडे हे सुद्धा सातत्याने या स्मारकासाठी पाठपुरावा करत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आमदार संतोष बांगर व आंबेडकर अनुयायी भीमराव सावरकर यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी याबाबत तातडीने मंत्रालय पातळीवर बैठक लावण्याची सूचना एसडीओ यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.
दरम्यान, सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना याबाबत विचारले असता, पालकमंत्री म्हणून मी त्या बैठकीला उपस्थित राहणारच आहे तसेच साताऱ्यातील भिमाई स्मारकाचे काम गतीने व दर्जेदार व्हावे. यासाठी प्रयत्न केला जाईल असे त्यांनी भरगच्च झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.