ताज्या घडामोडी

वाई:- छत्रपती शिवाजी महाराज न्यायप्रिय राजे – ॲड. उमेश सणस.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

वाई दि 20 छत्रपती शिवाजी महाराज न्यायप्रिय राजे – ॲड. उमेश सणस.

 

छत्रपती शिवाजी महाराज मातृभक्त होते. तसेच कर्तव्यनिष्ठ न्यायाधीशही होते. त्यांनी दिलेल्या न्यायनिवाड्यांवरुन ते न्यायप्रिय जाणते राजे होते, असे प्रतिपादन शिवचरित्राचे लेखक ॲड. उमेश सणस यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसर वीर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे धावडी येथील विशेष श्रमसंस्कार शिबिरात ‘छत्रपती शिवरायांचे न्याय निवाडे’ या प्रबोधनपर विषयावर ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. धावडी गावच्या सरपंच वनिता ननावरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या, याप्रसंगी सदस्य दिप्ती मांढरे, ग्रामस्थ पुरुषोत्तम मांढरे, मानसिंग मांढरे, समर्थ मांढरे, प्रणव भिलारे, कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, कॅप्टन डॉ. समीर पवार, डॉ. अंबादास सकट, रेखा भोसले, प्रतिक्षा मांढरे, कांचन मोरे यांची उपस्थिती होती.
ॲड. सणस म्हणाले, आज आपल्याला शिवरायांना न्यायाधीश म्हणून समजून घ्यायचे आहे. अत्याचारी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करण्याची शिक्षा देऊन वयाच्या १६ व्या वर्षी शिवरायांनी पहिला न्यायनिवाडा केला. स्त्रीयांना त्रास देणाऱ्या बाबाजी गुजर या नराधमाला त्यांनी शासन केले. रंगो कुलकर्णी हा स्वराज्यातील नराधम महिलेवर अत्याचार करुन जावळीच्या मो-यांच्या आश्रयाला गेला, पण शिवरायांच्या दहशतीने तो तिकडेच ह्रदयविकाराने मरण पावला. शिवरायांच्या दक्षिण दिग्विजयावेळी बेलवडीच्या देसाई नामक व्यक्तीने शिवसैनिकांचे बैल पळविले म्हणून त्याला त्या अपराधाबद्दल जिवे मारले, पण पुढे स्वराज्याविरुध्द लढणा-या त्याच्या बायकोवर अत्याचार करणाऱ्या सखोजी गायकवाड या सैनिकाचे त्यांनी डोळे काढले.
स्वराज्यद्रोह करणाऱ्या खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ यांना शिवरायांनी शासन केले. अफजलखान वधावेळी पराक्रम गाजविणारे संभाजी कावजी पुढे शाहिस्तेखानास मिळाले म्हणून, त्यांनाही शिवरायांनी राजद्रोहाबद्दल शिक्षा केली. मोरया गोसाव्याने शेतकऱ्यांना त्रास दिला म्हणून शिवरायांनी त्याची खरमरीत पत्र पाठवून कानउघाडणी केली.
शिवरायांच्या अशा अलौकिक कार्यामुळेच त्यांच्यासाठी तानाजी, मुरारबाजी, बाजीप्रभू, शिवा काशीद प्राण द्यायला सज्ज झाले. जगाच्या पाठीवर शिवरायांच्यासारखा दुसरा राजा झाला नाही म्हणूनच आज चारशे वर्षांनंतरही महाराष्ट्र शिवरायांवर नितांत प्रेम करतो.
सरपंच वनिता ननावरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून तरुणांनी शिवचरित्राचे पारायण करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राणी सणस, कल्याणी जाधव, साक्षी नरुटे, अश्विनी गोळे, धनश्री जाधव, नसिम सय्यद, भाग्यश्री कोरे, आरती इंगवले व स्वीटी नरवाडे यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमिका वाडकर हीने केले. भूमिका घोडके हीने पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रावणी जाधव हिने सूत्रसंचालन केले तर राणी काळे हिने आभार मानले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button