वाई:-(भुईंज):-!! ९० डेज (९० दिवस) राजकीय कळवंड!!
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अनिता शिंदे महाराष्ट्र राज्य महिला संघटक
RPS STAR NEWS
!! ९० डेज (९० दिवस) राजकीय कळवंड!!
नव्वदीच्या दशकात १००(हंड्रेड) डेज नावाचा एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध झाला होता सस्पेन्स, हॉरर धाटणीचा सिनेमा त्यातील नायीकेला सिक्सथ सेन्सद्वारे पुढे घडणाऱ्या घटनांचा साक्षात्कार व्हायचा,चाहूल लागायची असे कथानक होते अर्थात तो विषय वेगळा होता. महाराष्ट्रात येवू घातलेल्या विधानसभा निवडणुका जवळपास तीन महिन्यांवर म्हणजे ९० दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत त्या अनुषंगाने सामान्य जनता, कार्यकर्ते, नेते, राजकीयपक्ष, विचारवंत, राजकीय विश्लेषक आडाखे बांधण्यात व्यस्त आहेत, जो तो आपापल्या परीने भाकीत मांडतो आहे जणू काही प्रत्येकाचा सिक्सथ सेन्स जागृत झालाय अशीच परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. जनतेमध्ये कमालीचा उत्साह व उत्सुकता आहे, एका अर्थाने मतदारराजा खरोखरच जागा झालाय, झोपेतून उठून बसलाय असे मानायला हरकत नाही, मतदारांचा तिसरा डोळा उघडला की काय होते हे नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभा निवडणुकीत लोकांनी दाखवून दिले. जनतेने देव, धर्म, पैसा व इतर प्रलोभनांना थारा दिला नाही हे महाराष्ट्रात प्रकर्षाने जाणवलं हेच तर लोकहितवाद्यांना अभिप्रेत असणाऱ्या खऱ्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मतदानाचा अधिकार यातून जनता जागरूक असल्याचे दिसलं, बहुमत म्हणजे जनतेवर अन्याय करण्याचा परवाना नाही हे जनतेने जगाला दाखवून दिलं.
देशाची आर्थिक राजधानी मुंबई महाराष्ट्रात आहे, विद्वत्तेची, विवेकाची कुठेही कमी नाही परंतु खपलीचा भारही सहन होत नाही अशा काही जखमा असतात त्याप्रमाणे अनेक वर्षापासून असे काही प्रश्न आहेत की ते इथल्या जनतेला भेडसावत आहेत. गरीब, शिक्षितांच्या हाताला काम नाही, शेतीचे प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालले आहेत,शेतकरी पार मेटाकुटीला आलाय. २०२४ मध्ये जानेवारी ते मे या ५ महिन्यात राज्यात १०४६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत एकट्या अमरावती विभागात ५५७ शेतकरी आत्महत्या घडलेल्या आहेत, शेतमालाला हमीभावाची मागणी कित्येक वर्षापासूनची आहे,चार पैसे शेतकऱ्याला मिळण्याची आशा वाढली की निर्यातबंदी होते, शैक्षणिक बाबतीतही तेच १ली ते ८वी गरिबांच्या मुलांना फक्त सरकारी शाळात मोफत शिक्षण परंतु एक किलोमीटरच्या बाहेर असणाऱ्या खाजगी शाळांना हा नियम लागू नाही म्हणजे नक्की शासनकर्त्यांना काय करायचे आहे? सरकारी शाळा बंद पाडून खाजगी शाळांना अभय देण्याचा उद्योग सुरू आहे, रोजगार उपलब्ध करून देणारे मोठमोठे उद्योग शेजारच्या राज्यात, सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची कुठलीही दीर्घकालीन योजना नाही. निवडणुकांचे तोंडावर नुसत्या फसव्या योजना व भूलथापांचा सुकाळ आहे. लाडकी बहीण रु १५००, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, लाडका भाऊ ६००० ते ८०००. जनतेनं न मागताच सत्ताधाऱ्यांनी भरभरून द्यायचा सपाटा लावलाय, बहिणभाऊ लाडके आहेत का खुर्ची लाडकी आहे,लोकांना स्वाभिमानाची,अस्मितेची, कष्टाची,हक्काची भाकर पाहिजे. कष्टाचा छदाम माणसाला जगायला शिकवतो हे तर सर्वसामान्यांना लाचार, आळशी, परावलंबी करायला निघालेत. सध्या नीट, यूपीएससी स्पर्धा परीक्षेचा घोटाळा उघड होईल या भीतीने आर एस एस चे कट्टर समर्थक असणाऱ्या चेअरमन यांनी सदर संस्थेचा राजीनामा दिलाय हे कशाचे द्योतक आहे ,सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश बाकी आहे, मुलांना लागणारे कागदपत्र, दाखले सेतू कार्यालयातून वेळेत मिळत नाहीत, लाडक्या बहिणींची एवढी झुंबड उडलीय की कित्येक तास सर्वर काम करत नाही, विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान, मानसिक त्रास याकडे कोणी बघायला तयार नाही. राजकारण्यांच्या पुढे मर्यादित दिवस बाकी असल्याने निवडणुकीसाठीची त्यांची लगबग, कलाकारी पाहिलीतर ९० डेज म्हणून सिनेमा तयार होईल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना कमालीचा वेग आलाय, प्रत्येक पक्षाचा मतदारसंघावर दावा, सक्षम उमेदवारांचा शोध चालू आहे. अलीकडच्या काळात राजकारणात इलेक्टिव्ह मेरिट (निवडून येण्याची क्षमता) हा शब्द चांगलाच रूढ झालाय अर्थात उमेदवार पैशापाण्याने गब्बर पाहिजे मग तो पैसा कुठल्या का मार्गाने आलेला असो.सध्याच्या राजकीय परिस्थितीत कुठलाही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढण्याचं धाडस दाखवणार नाही. विधानसभेची ही निवडणूक भाजपप्रणित महायुती व काँग्रेसप्रणित महाविकास आघाडी अशीच होणार इतर मतदारसंघाप्रमाणेच वाई विधानसभाची अवस्था आहे वाई विधानसभेचे तीन वेळचे आ. श्री मकरंद पाटील महायुतीचे प्रमुख दावेदार आहेत, तालुक्यातील दोन महत्त्वाचे मार्ग एकत्र आल्याने महायुती निर्धास्त असल्याचे चित्र आहे, ऐन निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान आमदारांनी तुतारीचा मार्ग धरला तर परिस्थिती बदलू शकते. महाविकास आघाडीकडे मात्र सक्षम व तगड्या उमेदवाराचा शोध युद्धपातळीवर सुरु आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांकडे तसं चर्चेतले नाव नसल्याने अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, जणू काही उमेदवारांची मांदियाळीच आहे.मतदार संघात इच्छुकांची संख्या वाढताना दिसतेय ही एक प्रकारे चांगली गोष्ट आहे कारण त्यातून सर्वोत्तम उमेदवाराची निवड करणं आघाडीच्या नेत्यांना सोयीचं होईल, सक्षम उमेदवार उभा करणे महाविकास आघाडीपुढचं मोठं आव्हान आहे. निवडणुकीच्या केंद्रस्थानी अनेक प्रश्न आहेत तसेच किसनवीर कारखाना असणार हे उघड आहे, लोकांच्या आग्रहास्तव कारखाना ताब्यात घेतला असा दावा आमदार गटाकडून वारंवार केला जातो परंतु कुठल्या लोकांनी एवढा आग्रह धरला होता का एलियन्सनी (परग्रहावरील लोकांनी) आग्रह धरला होता हे समजायला मार्ग नाही. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात जनमत असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आहे परंतु समोर दुसरा चांगला चेहरा दिसत नाही ही भावना सर्रास बोलून दाखवली जाते त्यामुळे वाई विधानसभेचं आव्हान सोपं नाही हे जरी खरं असलं तरी महाविकास आघाडीकडे श्री शरद पवारांसारखा अनुभवी, लढाऊ संघर्षयोद्धा आहे, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या मतदारसंघात दखलपात्र आहे.”अनहोनी को होनी”करण्याची क्षमता श्री शरद पवार साहेब बाळगून आहेत.
शेवटी मतदारात संघातील जनता सर्वोच्च आहे, मतदारराजा (निवडणुकी पुरता) कोणाच्या झोळीत दान टाकतो हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे परंतु कर्म वसुलीवर येतं तेव्हा त्याच्यासमोर सर्व गोष्टी निष्प्रभ ठरतात हा इतिहास आहे, असो.
श्री कल्याण पिसाळ देशमुख – ओझर्डे.
सरचिटणीस- सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी.
फोन ९८५०४१२९०९.
Mallikarjun Kharge
Indian National Congress
Rahul Gandhi
Sharad Pawar
Nana Patole
Prithviraj Chavan
Prithviraj Chavan FC
Indian National Congress – Maharashtra
Maharashtra Pradesh Congress Committee
Jayant Patil – जयंत पाटील
Dr. Suresh जाधव