ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

साताऱ्यात भाजप आमदारांसाठी मराठा नेत्यांमध्ये शाब्दिक झुंज.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यात भाजप आमदारांसाठी मराठा नेत्यांमध्ये शाब्दिक झुंज.

सातारा दि: एक मराठा… लाख मराठा… असा जयघोष करून मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे. यासाठी महाराष्ट्रात मोठा लढा सुरू आहे. या लढ्यासाठी अनेक जण सहभागी झालेले आहेत. साताऱ्यातही सर्वच नेते व कार्यकर्ते या मागणीसाठी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहेत. परंतु याच साताऱ्यात ओ.बी.सी. भाजप आमदारांच्यासाठी दोन मराठा नेत्यांची झुंज लागली आहे. यामुळे सकल मराठा समाजातील तरुण व युवक नाराज झालेले आहेत. तुमचे राजकारण तुमच्यापर्यंत ठेवा. अन्यथा तुम्हालाही मराठा व ओबीसी बांधव धडा शिकवतील असा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक दादासाहेब राजेश शिर्के यांनी दिलेला आहे.
याबाबत माहिती अशी की, भारतीय जनता पक्षाचे माण- खटाव मतदार संघातील हॅट्रिक केलेले ओ.बी.सी. समाजाचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर मेळाव्यातून माण – खटावच्या दोन राजकीय नेत्यांबद्दल खिल्ली उडवणारे भाषण केले होते. यावेळी अनेकांनी टाळ्या वाजवून त्याचे स्वागत केले.
त्यानंतर सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष व भाजपचे नेते अनिल देसाई यांनी माण तालुक्यातील दहिवडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शेलक्या शब्दात उत्तर दिले. त्यानंतर सातारा भाजप कार्यालयांमध्ये भाजप जिल्हा अध्यक्ष धेर्यशील कदम यांच्यासह भाजप नेत्यांनीही पत्रकार परिषद घेऊन अनिल देसाई, अभय जगताप यांचा पायउतार करणारे आरोप केले.
माण तालुक्यातील एका ग्रामपंचायतीमधील एक स्वयंघोषित नेता आम्हाला शहाणपणा शिकवला आहे. त्यांनी पडलेली मते आणि त्यांना आवक याचा अभ्यास करून नंतरच भारतीय जनता पार्टीला नाव ठेवावेत. अन्यथा जिल्हा परिषद सोडा त्यांच्या ग्रामपंचायत मध्ये सुद्धा त्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही. अशा तिखट शब्दात टीका करून अनिल देसाई यांचा चांगला पान उतार केलेला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी आरोप केले. त्यांनी भाजपच्या नेत्यांची अनेक वेळा मागे लागून पक्षाची पदे घेतली. तीन वर्षे जिल्हा उपाध्यक्ष पद आणि नंतर सहकार आघाडी पश्चिम महाराष्ट्र संघटक अशी पदं घेतली. उदयनराजे भोसले यांनी जिल्हा कार्यालयात आमदार गोरे यांचा फोटो फेकून दिला अशी खोटी माहिती प्रसारमाध्यमाला देऊन दोन भाजप नेत्यात भांडण लावण्याचा उद्योग केला. असाही गंभीर आरोप केला होता.
त्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अनिल देसाई यांनी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना चांगले टार्गेट करून आमदार जयकुमार गोरे आणि श्री कदम तुम्ही काँग्रेसमध्ये असताना जे उद्योग केले. ते उद्योग आता भाजपमध्ये सुरू आहेत. त्याबाबतच्या चर्चा पक्षातील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचत आहेत. छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारी पासून जयकुमार गोरे आणि तुम्ही काय केलं? काय काय उद्योग केला? याचे सगळे पाढे श्री छ खा उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडे आहेत. काही दिवसापूर्वी साताऱ्यात आलेल्या खासदार मेगा कुलकर्णी यांच्याकडे पोहोचविण्याचे काम तुमच्यातीलच कोणी तरी केलेले आहे. असे प्रसिद्ध पत्रकाद्वारे सांगून या मुद्द्यावरती चांगलेच रान तापवलेले आहे.
वास्तविक पाहता मराठा बांधव व इतर मागासवर्गीय म्हणजे ओ.बी.सी. बांधव गुण्यागोविंदाने सातारा जिल्ह्यात राहत आहेत. आपापल्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनावर सुद्धा एकमेक पाठिंबा देत आहेत .त्यामुळे कुठेही जातीपातीचे वर वर राजकारण दिसत नसले तरी अंतर्गत हेवेदावे व टीकाटिपणी ही सुरूच आहे. आता मात्र भाजपच्या ओ.बी.सी. आमदारांसाठी चक्क मराठा क्रांती मोर्चा मध्ये सक्रिय सहभागी घेणारे माण- खटाव तालुक्यातील दोन मातब्बर नेते एकमेकांचे चांगलेच वस्त्रहरण करीत आहेत. या गोष्टींमुळे सातारा जिल्ह्यातील आरक्षणाच्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होणारे मराठा समाजातील युवक व तरुण चांगलाच पेटून उठलेला आहे. हा भाजपमधील अंतर्गत वाद असून हा वाद मिटवण्याची कुणालाही इच्छा दिसत नाही. त्यामुळे आता प्रसारमाध्यमातून टीकाटिपणी होऊ लागलेली आहे. मुळातच आमदार जयकुमार गोरे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई हे तिघे मिळून राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आता त्यांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी एका दिल्याने एकाजूटीने, एका दिलाने, भाजप पक्षाचे ध्येय धोरण तळागाळात राबवत आहेत. एकमेकांची वाभाडे काढण्यामध्ये ते धन्यता मानत आहेत . त्यामुळे माण खटाव तालुक्यात गावोगावी चर्चेतला स्वरूप आलेले आहे. जो स्वतःच्या पक्षाशी प्रामाणिक व उद्दिष्टेने वागत नाही. तो जनतेशी किती निष्ठा दाखवून वागणार ? असा मार्मिक प्रश्न विचारला जाऊ लागलेला आहे. खरं म्हणजे तिन्ही नेत्यांची सामाजिक, राजकीय, आर्थिक मजल खूप मोठी आहे. त्यांच्या हातून समाजाची चांगली सेवा अनेकदा घडलेली आहे. माणुसकीची हे दर्शन घडवलेले आहे. हे त्यांनाही माहिती आहे. परंतु व्यक्तिगत पातळीवर टीकाटिपणी करून त्यांनी राजकीय वातावरण दूषित करू नये. अन्यथा स्वाभिमानी जनता या तिघांनाही जागा दाखवून चक्रवाढ व्याजासह सर्व परतफेड करेल अशी आता चर्चा रंगू लागलेली आहे. दरम्यान, हा वाद मिटवून सर्वांनीच गुण्यागोविंदाने समाजकारण करावे. अशी नम्र विनंती गावोगावच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे.
——————————

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button