जावळी:-आनेवाडीचा आधारवड- पत्रकार शहाजी गुजर.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
आनेवाडीचा आधारवड- पत्रकार शहाजी गुजर.
माणसांचा जन्म हा इतरांच्या कल्याणासाठी झालेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक युगपुरुषांनी आपल्या वाणी, लेखणी व कार्याने समाज घडवण्याचे काम केले. अशा युगपुरुषांचा विचार आत्मसात करून आनेवाडी तालुका जावळी येथील ज्येष्ठ पत्रकार शहाजी प्रतापराव गुजर यांनी जावळी तालुका सोबत संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्या नावाचा एक चांगला दबदबा निर्माण केलेला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर सरस्वती पवार, पोपटराव आराणके, दत्ताजी थोरात, डॉ .गजाभाऊ कुलकर्णी, अनुप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा अवस्थेमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते पदाधिकारी होण्याचे काम केले. सत्तेचा लवलेश नसताना सुद्धा प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आंदोलने करून त्यांनी जनतेच्या प्रश्नासाठी आवाज उठवला होता. सत्ता असेल की अनेक जण त्याभोवती हिडण्यासाठी पक्ष प्रवेश करतात. परंतु , पत्रकार शहाजी गुजर यांनी त्यांचे मार्गदर्शकदाते मधु सरस्वती पवार व नितीन फरांदे, किशोर सपकाळ, दिनेश शिंदे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून अनेक वर्ष काम केले. सत्ता नसली तरी आपल्याकडे असलेल्या कौशल्याने त्यांनी दैनिक तरुण भारत व दैनिक पुण्यनगरी सारख्या दर्जेदार वृत्तपत्रातून आनेवाडी परिसरातील अनेक समस्या सोडवण्यासाठी लेखणीला शस्त्र बनवले. आजही वृत्तपत्रामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्वीसारखी जागा मिळत नाही. अशाही परिस्थितीत लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी त्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतलेली आहे. अनेकांना न्याय सुद्धा मिळवून दिलेला आहे.
त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहिजे तर शांत स्वभावाचे संयमी पत्रकार म्हणून सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या वर्तुळात त्यांचं नाव घेतले जाते. पत्रकारिता ही समाजाचे प्रश्न सोडवणारे साधन आहे आणि उपजीविकेसाठी आपल्याला समाजमान्य कोणताही व्यवसाय करण्याशिवाय पर्याय नाही. अशी मनाशी खुणगाठ बांधून पत्रकार शहाजी गुजर हे वाहतूक व्यवसाय करत आहेत . आनेवाडी येथील शेती उत्पन्नातून ते स्वाभिमानाने जीवन जगत आहेत .अनेकांना मदतीचा हात देत असताना त्यांनी कधीही जात- धर्म- पंथ असा भेदभाव केलेला नाही. आजही पारधी, कातकरी, गोसावी समाजापासून ते ब्राह्मण समाजापर्यंत अनेक त्यांच्या मित्रपरिवार हा तयार झालेला आहे. वाहतूक व्यवसायामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे .ही त्यांच्या कामाची पोहच पावती आहे. शांताबाई या गाण्याचे लेखक संजय लोंढे यांच्या हस्ते व उद्योगपती बबनराव शेळके व रवींद्र जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांना पुरस्कारही मिळालेले आहेत.
पत्रकार शहाजी गुजर यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना त्यांच्या मित्रपरिवारासोबतच त्यांची नेहमीच काळजी घेणारे व त्यांना समजून घेणारी त्यांची सुविधा पत्नी सौ .अश्विनी तसेच मुलगी साक्षी , मुलगा शिवरूप राजे व या सर्व कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांच्या मातोश्री श्रीमती मंगल प्रतापराव गुजर आणि सर्व नातेवाईक मंडळी, मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्यांना समाजसेवेसाठी दीर्घायुष्य लाभो. अशी जावळी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आजही आपल्या नामकरण विधीचे पत्रक जपून ठेवणारे पत्रकार शहाजी गुजर यांच्या वाढदिवसानिमित्त जुन्या आठवणी नाही उजाळा मिळाली नाही.
——(शब्दांकन- अजित जगताप). पत्रकार प्रशांत गुजर. आनेवाडी
——————————————
फोटो -पत्रकार शहाजी गुजर यांच्या पन्नास वर्षांपूर्वीचे नामकरणाचे निमंत्रण व पुरस्कार स्वीकारताना शहाजी गुजर (छाया – निनाद जगताप, सातारा)