सातारा:-कोविड काळा मधील साताऱ्यातील सर्वच उपाययोजनांची चौकशी व्हावी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
कोविड काळा मधील साताऱ्यातील सर्वच उपाययोजनांची चौकशी व्हावी.
सातारा दि: कोरोना काळात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी यश मिळाले असले तरी अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत. त्याच्यावर कोणी ही राजकारण करू नये. असे अनेकदा सांगितले जात होते पण आता उच्च न्यायालयात माण खटावचे आ .जयकुमार गोरे यांच्या काळातील कोरोना रुग्णू उपाय योजनेबाबत भ्रष्टाचाराचा आरोप करून याचिका दाखल करण्यात आलेले आहे. ही याचिका मायणी मेडिकल कॉलेज बाबत असली तरी जिल्ह्यातील कोविड काळातील सर्वच उपाययोजनांची चौकशी करावी. अशी मागणी आता सातारा जिल्ह्यातून होऊ लागलेली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की बुहान चीन या ठिकाणी ९ मार्च १९२० रोजी पहिला कोरोना रुग्ण आढळून आला. त्यानंतर त्याचा जगभर प्रसार झाला १ जानेवारी २० ते ३१ डिसेंबर २० या कालावधीमध्ये भारतात ४७ लाख तर महाराष्ट्रात चार लाख ८१ हजार लोक कोरोना महामारीमुळे मृत्युमुखी पडले. आजही त्यांच्या कुटुंबातील लोक सावरलेले नाहीत.
सातारा जिल्ह्याचा विचार केला कोरोना आजारामुळे एक लाख ५५ हजार ४९० लोक बाधित झाली होती. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. यामध्ये ३५२९ जणांचा कोरोनामळे मृत्यू झाला. या घटनेला आता तीन ते चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर मायणी मेडिकल कॉलेजच्या संदर्भात माण- खटावचे भाजपचे आमदार जयकुमार गोरे, त्यांची पत्नी सोनिया गोरे व इतर यांच्या विरोधात याचिकाकर्ते दीपक देशमुख यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. दिनांक पाच जुलै रोजी सुनावणी होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. याबाबत आता न्यायालयातच निकाल लागणार आहे. परंतु, इतर कोरोना काळातील आर्थिक व्यवहाराबाबतही तपासणी होणे गरजेचे आहे. असे काहींना वाटू लागलेले आहे.
मायणी मेडिकल कॉलेजच्या कोरोना काळातील उपयोजना व व्यवहाराबाबत ही याचिका असली तरी जनतेच्या माहितीसाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यातीलच कोरोना काळातील उपाययोजनांची निपक्षपातीपणाने चौकशी व्हावी. अशी आता चर्चा सुरू झालेली आहे. मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन खरेदी तसेच कोविड सेंटरची उभारणी करून रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी महाविद्यालय व क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालय, सतरा ग्रामीण रुग्णालय,७१ प्राथमिक आरोग्य केंद्र सहा आरोग्य पथके४०० उप आरोग्य उपकेंद्र १७ आयुर्वेदिक दवाखाने व अनेक वाहनांची व्यवस्था केली. त्याचबरोबर रुग्णांसाठी औषध व खाद्यपदार्थ याची खरेदी करण्यात आलेली आहे. या सर्व गोष्टींचा पारदर्शक तपास झाल्यानंतरच सत्य समजणार आहे. त्यामुळे फक्त मायणी मेडिकल कॉलेज बाबत प्रश्न उपस्थित करणे. म्हणजे इतर सर्व गोष्टी या नियमाप्रमाणे घडलेले आहेत. त्याबाबत कुणाचीही तक्रार नसले हे जरा अतिशयोक्ती वाटत आहे. त्यामुळे या सर्व प्रकारचीच चौकशी व्हावी. अशी मागणी होऊ लागली आहे. दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमाशी बोलताना आ. जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले की, शासन व पोलिसांनी तातडीने या सर्व प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी. मी सर्व चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. यापूर्वी मायणी मेडिकल कॉलेजला २० कोटी रुपयांचा दंड करण्यात आला होता. त्यानंतर मायणी मेडिकल कॉलेजमध्ये मी आलो आहे. असे त्यांनी स्पष्ट केले आहे.