सातारा:-लाडली बहिणांमुळे साताऱ्यात इतर दाखले झाले….नकोसा…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
लाडली बहिणांमुळे साताऱ्यात इतर दाखले झाले….नकोसा…
सातारा दि: महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी लाडली बहनांसाठी दरमहा दीड हजार रुपये मानधन देण्याची योजना घोषित केली. यामुळे सातारा जिल्ह्यात अनेक माता भगिनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ग्रामपंचायत ते तहसील कार्यालयामध्ये गर्दी करत आहेत. या लाडली बहिणांमुळे इतर दाखले साताऱ्यात नकोसे झाले आहेत का? असा मार्मिक सवाल भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री मनीष महाडवाले यांनी केला आहे.माता-भगिनींना लाडली बहिण बहिण योजनेचा लाभ होण्यासाठी रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवसापर्यंत ही योजना व त्याची अंमलबजावणी करावी. अशीही मागणी केलेली आहे.
सातारा जिल्ह्यात नागरी सेतू सुविधा केंद्र, ई -सेवा केंद्रामधून आवश्यक कागदपत्र जोडल्यानंतर उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, डोंगरी दाखला, आर्थिक दृष्ट्या मागास असलेला दाखला, शेतकरी, भूमिहीन, शेतमजूर, अल्पभूधारक दाखला तसेच इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती- जमाती, विमुक्त भटक्या जमाती, जातीचे दाखले, क्रिमिलियर दाखले वितरित करण्यात येतात. पण, सध्या महाराष्ट्र शासनाने दोन दिवसापूर्वी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लाडली बहीण योजनेची घोषणा केल्यापासून सातारा जिल्ह्यात किमान पंधरा ते वीस हजार माता-भगिनी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी ग्रामपंचायत पासून ते तहसील कार्यालयापर्यंत गर्दी केली आहे. नागरी सुविधा केंद्र व ही सेवा सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सकाळी आठ ते रात्री आठ तसेच सुट्टीच्या दिवशी कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे लाडली बहिणायोजनेने इतर दाखले नकोसे झाले आहेत का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
शासकीय योजनेचा लाभ हा गरजवंतांना मिळावा. हा त्यांचा अधिकार आहे. परंतु, अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे तसेच एकाच वेळी दाखले मागणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे इंटरनेट सुविधावर परिणाम झालेला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून महायुतीच्या सरकारने किमान रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवसापर्यंत या योजनेला मुदतवाढ मिळावी.
अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री मनीष महाडवाले यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीला भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रशांत जोशी, सौ सुनिषा शहा , सौ.रीना भणगे, श्रीमती गीता लोखंडे, अविनाश खर्शीकर ,विक्रम बोराटे, चंदन घोडके, धनंजय पाटील, हर्षल चिकणे, विजय काटवटे, सौ .कुंजा खंदारे, सौ .नेहा लाटकर खैर व सुनिल काळेकर,अमोल कांबळे यांनी पाठिंबा दिला आहे. अशी माहिती श्री महाड वाले यांनी दिली.
सध्या सातारा जिल्ह्यात ई -सेवा केंद्र व ऑनलाईन दाखले काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात माता भगिनी व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी होत आहे. सध्या नेट कंपन्यांवर खूप मोठा लोड आलेला आहे. सातारा तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात दोन दिवसांमध्ये हजार ते बाराशे अर्ज स्वीकारण्यात आल्याची माहिती देण्यात आली . वास्तविक अनेक साइड ओपन होण्यास अडचण येत आहेत. याचा गांभीर्याने विचार करून या लाडली बहीण योजनेसाठी मुदत वाढ मिळावी. अशी मागणी होऊ लागलेली आहे. दरम्यान, बुधवार दिनांक ३ जुलै रोजी विविध महिला संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या सातारा जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डूडी यांची भेट घेवून मागणीचे निवेदन देणार असल्याची माहिती महिला पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
——————————————
फोटो -सातारा तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात माता भगिनींची झालेली गर्दी (छाया- अजित जगताप, सातारा)