कोरेगाव:-कोरेगावातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यां विरोधात शेतकऱ्याची लोकायुक्त कडे तक्रार …
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
कोरेगावातील वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यां विरोधात शेतकऱ्याची लोकायुक्त कडे तक्रार …
कोरेगाव दि: अस्तित्वात नसलेल्या शेत जमिनीवरील रस्त्याबाबत एकतर्फी निकाल देऊन शेतकऱ्याचे नुकसान केल्याप्रकरणी कोरेगावातील वरिष्ठ तीन महसूल अधिकाऱ्यांच्या विरोधात शेतकरी श्री.धन्यकुमार जाधव यांनी लोक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. दस्तुरखुद शेतकऱ्यांनीच लोकायुक्तांकडे कैफियत मांडल्यामुळे खळबळ माजलेली आहे.
याबाबत माहिती अशी की, दुधनवाडी पोस्ट बनवडी ता. कोरेगाव येथील शेतकरी संघटनेचे नेते व शेतकरी श्री धन्यकुमार जाधव यांनी गावातील रस्त्याबाबत तक्रार अर्ज केला होता. या अर्जाची चौकशी निपक्षपातीपणाने होऊन त्यांना न्याय मिळावा. यासाठी ते लोकशाही मार्गाने लढा देत होते. परंतु, वाठार स्टेशन मंडलाधिकारी यांनी खोटा अहवाल सादर करून तसेच स्थानिक चौकशी न करता निकाल देण्यासाठी पैशाची मागणी केली. त्या मागणीची पूर्तता न केल्यामुळे उपविभागीय अधिकारी कोरेगाव, तहसीलदार कोरेगाव व मंडलाधिकारी वाठार स्टेशन यांनी चुकीचा अहवाल करून चुकीचे रेकॉर्ड बनवले आहे. तसेच त्या आधारे निकाल दिला आहे. असा गंभीर आरोप शेतकरी श्री जाधव यांनी केला आहे. याबाबत कोरेगाव तालुक्यात कार्यरत असणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या स्थावर जंगम मालमत्तेची चौकशी करावी व त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. असा लेखी अर्ज लोकायुक्त, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे केला आहे . सदर प्रकरणाबाबत कोरेगाव तालुक्यातील महसूल खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकायुक्त कडे धाव घेतल्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांनी केलेली आहे. कोरेगाव तालुक्यात तीन आमदार असताना शेतकऱ्यांना न्यायासाठी लोक आयुक्ताकडे तक्रार करावी लागत आहे. याचे आता मतदारांनीच विचार करणे गरजेचे आहे. असेही आता शेतकरी सांगू लागलेले आहेत.
शेतीसाठी आवश्यक रस्ता मिळावा. यासाठी महसूल खात्याकडे प्रत्यक्ष अर्ज आले आहेत का? अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडले आहेत का? संपूर्ण या रस्त्याबाबतचे सर्व सत्य माहिती समोर आली आहे का? असे प्रश्न त्यांनी अर्जात उपस्थित केलेले आहेत .काही व्यक्तींचा त्या रस्त्याशी कोणताही संबंध नसतानाही त्यांना पाठीशी घातले जात आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. अशी अर्जात नमूद केले आहे. सदर प्रकरण हे गट नंबर २३६,२३९ ते २४८ व १८० बाबत असूनही ज्यांची नावे सातबारा यामध्ये आढळून येत नाही. त्यांच्यासाठी रस्ता म्हणजे हवेत तीर मारण्याचा प्रकार असल्याचे श्री जाधव यांनी पुराव्यानिशी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. गट नंबर २४३ वरील जमिनीचे मालक व वारसदार यांचा उल्लेख केलेला नाही. वास्तविक पाहता शेत जमिनीसाठी जाणारा रस्ता तयार करताना कोणाचीही नुकसान होऊ नये. ज्यांचे शेतीक्षेत्र जाणार आहे. त्यांना मोबदला देणे. नुकसान भरपाई देणे .आवश्यक व गरजेचे असतानाही महसूल प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेतला आहे. यावरून शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याविरोधात लोक आयुक्ताकडे दाद मागितलेली आहे. या प्रकरणी चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी केलेली आहे.
या प्रकारामुळे कोरेगाव तालुक्यातील रस्त्याबाबत शेतकऱ्यांनीच आवाज उठवल्यामुळे अधिकाऱ्यांची चौकशी होणार का नाही? याची आता चर्चा रंगू लागलेली आहे. दरम्यान, याबाबत संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकलेले नाहीत. सध्या शेतजमिनीचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना दिवाणी दावा करूनच न्यायालयात न्यायासाठी धाव घ्यावी लागत आहे. न्यायालयाच्या निकालांमध्ये तारीख पे तारीख चा खेळ सुरू असल्यामुळे न्याय मिळण्यास उशीर होत आहे . तोपर्यंत शेतकरी तग धरू शकत नाही. याचाही फायदा काही जण हेतू परस्पर घेऊ लागलेले आहेत. असेही बोलले जात आहे. वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यातील प्रामाणिक व महसूल अधिनियमाच्या अधीन राहून काम करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांनी सत्यतेची पडताळणी करून अनेकांना न्याय दिलेला आहे. पण या प्रकरणाबाबत आता थेट लोकायुक्ताकडे तक्रार केल्यामुळे काय निकाल लागेल? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.—————————–&-&—————-
फोटो — लोक आयुक्तांकडून न्यायाची प्रतीक्षा करणारे शेतकरी श्री धन्यकुमार जाधव