कातर -खटाव:-खटाव – माण दुष्काळ जाहिर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कातर खटाव मध्ये रस्ता रोको.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
खटाव – माण दुष्काळ जाहिर करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कातर खटाव मध्ये रस्ता रोको.
कातर खटाव दि:महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस वगळता सत्तेच्या व खुर्चीच्या सारिपीठातकाही राजकीय पक्ष दंग आहेत. जुलै महिना संपायला आला. तरी खटाव- माण तालुक्यात अद्याप पावसाची हजेरी नाही. या सरकारला जागे करण्यासाठी खटाव – माण तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी
अखिल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने
खटाव – माण तालुका दुष्काळ जाहिर करण्यासाठी शनिवारी दि: २२जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता कातर खटाव चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते रणजितसिंह देशमुख (भैय्यासाहेब)
सदस्य,,अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केले जाईल. अशी माहिती खटाव- माण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष डॉ महेश गुरव यांनी दिली आहे.
खटाव – माण तालुका दुष्काळ जाहिर करावा.,उरमोडीचे पाणी त्वरीत सोडावे, खरीप हंगाम वाया गेल्याने त्याची नुकसान भरपाई मिळावी, पीक कर्ज माफ करावे, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत मिळावे,
टंचाई ग्रस्त गावासाठी पिण्याच्या पाण्यासाठी ट्रॅकर चालू करावेत, जनावरासाठी चारा पाण्याची सोय करावी. अशा प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनाला राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यांनी तसेच ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
दरम्यान ,यंदाच्या वर्षी खटाव माण तालुक्यात पावसाळ्यात पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेती व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भविष्यात करावी लागणार आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नशिबाने साथ लाभली व पाऊस पडला तर कृषी विभागाच्या वतीने मोफत बी बियाणे व खत देण्यात यावे. असे ही शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.
खटाव माण तालुक्यात बाजरी पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे. पण, यंदा पाऊस होईपर्यंत पेरणी साठी शेतकऱ्यांना वाट पहावी लागणार आहे. असे चित्र निर्माण झाले असून सत्ताधारी मंडळीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच नैतिक जबाबदारी स्वीकारून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरली आहे. असे ही डॉ महेश गुरव यांनी सांगितले.
—————————————————————– फोटो – खटाव माण तालुक्यात पावसाळ्यात दुष्काळ सदुर्श्य स्थिती (छाया – अजित जगताप, सातारा)