सातारा शहरात आणखी दोन जाहिरात फलकाची दिमाखदार उभारणी…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
सातारा शहरात आणखी दोन जाहिरात फलकाची दिमाखदार उभारणी…
सातारा दि: एखाद्या गोष्टीमुळे जर अपघात घडला की त्याबाबत सावधानता बाळगली जाते. आपत्ती व्यवस्थापन समितीने काळजी घेण्याची अनेक सल्ले दिलेले आहेत. पण ,सध्या सातारा शहरातील जरंडेश्वर नाका परिसरात महामार्ग नजीक दोन मोठे जाहिरात फलक दिमाखदार पणे उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे साताऱ्यातील जाहिरात फलकाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होण्यापूर्वीच आणखीन दोन जाहिरात फलकाची भर पडल्याची चर्चा सुरू झालेली आहे. सातारा शहराच्या वैभववात भर पडावी. लोकांना त्याचा फायदा व्हावा. या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. मात्र, सध्या सातारा नगरपालिका म्हणजे लोकांच्या नागरी सुविधांपेक्षाही इतर गोष्टींमध्येच अधिक रस असणारी महाराष्ट्रातील मोठी ग्रामपंचायत असे त्याचे वर्णन केले जाते. याला कारणे सुद्धा अनेक आहेत. त्याबाबत सातारा शहर सुधार समिती नेहमीच खुलासा करीत असते. मुंबई येथे दिनांक १३ मे २०२४ रोजी दुपारी वादळ वाऱ्याच्या पावसामुळे घाटकोपर नजीक पेट्रोल पंपा जवळ असलेला अनाधिकृत जाहिरात फलक कोसळून १४ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले. आजही त्यांच्या वेदना कमी झालेल्या नाहीत. १६ मे रोजी मोशी जय गणेश साम्राज्य चौकात ३० बाय ३० फूट आकाराचा जाहिरात फलक साडेचार वाजता कोसळून दोन वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. सुदैवाने या ठिकाणी कोणीही मनुष्य हजर नसल्यामुळे जीवित हानी झालेली नाही. दिनांक २९ मे रोजी मुंबईतील दादर टीटी प्रीतम इस्टेट इमारतीखाली शहापूर परिसरात जाहिरात फलक कोसळून तीन जण गंभीर जखमी झाले. या तिन्ही घटना मानवनिर्मित आहेत. त्यामुळे एखादी घटना घडल्यानंतर त्याबाबत काळजी घेणे हे सर्वांच्या हिताचे आहे. तरी सातारा शहरातील जरंडेश्वर नाका परिसरात विद्युत डी.पी.च्या शेजारीच जाहिरात फलक उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.
सध्या साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते तयार करायचे. त्यासाठी केंद्र, राज्य व नगरपालिकेने निधी खर्च करायचा. आणि या रस्त्या नजीक मोठ मोठे जाहिरात फलक लावून राजकीय हितसंबंध व व्यावसायिक ठेकेदार हे जाहिरात फलक लावून प्रचंड नफा कमवत आहेत. काही महाभाग तर विविध प्रकारच्या केबल टाकण्यासाठी रस्त्याची खोदकाम करून रस्त्याची दुरावस्था करत असतात.
महाराष्ट्राला वीज देण्याचे काम पाटण तालुक्यातील कोयना धरण करत आहे. पण, अलीकडे वादळ वारा व पाऊस पडला की संपूर्ण पाटण तालुक्यातील वीज गायब होते. याउलट अशा मोठमोठ्या जाहिराती फलकांना वीज पुरवठा सुरळीत केला जातो. त्याच्या प्रकाशामुळे वाहन चालकांचे डोळे दिपून जातात. त्यामुळे महामार्ग असो, राज्यमार्ग असो ,किंवा जिल्हा मार्ग असो. या ठिकाणी मोठा रात्री जेवढे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अशा जाहिरात फलकाला बंदी घालावी. अशी सक्त सूचना अभ्यासकांनी केलेली आहे. त्याला केराची टोपली दाखवण्याचा प्रकार सातारा शहरात राजेरोसपणाने सुरू झालेला आहे. भविष्यात घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर जशा पद्धतीने दुर्घटना घडली तशा पद्धतीने जर दुर्दैवी घटना सातारा शहरात घडली तर त्याला जबाबदार कोण? याचे उत्तर आता शोधणे गरजेचे आहे.
घटना घडल्यानंतर अनेक विश्लेषक व राजकीय सत्ताधारी व विरोधक यांच्यामध्ये कलगी तुरा लागतो. आता मात्र सर्वांनी मौन पाळलेले आहे. हे मौन धोकादायक आहे .आता साताऱ्यातील वाहन चालक व सुज्ञ नागरिकांनी याबाबत आवाज उठवावा. अशी मागणी सातारा शहरात येणाऱ्या ग्रामीण भागातील लोकांनी केलेली आहे. दरम्यान, याबाबत सातारा नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांची भक्कम व सत्य बाजू पुढे आलेली नाही. शेवटी नगरपालिकेलाही उत्पन्न हवे आहे. अशा मार्गाने उत्पन्न मिळवण्यापेक्षा प्रत्येकाच्या कर वसुली नियमाप्रमाणे वसुली झाली तर अशा नव्याने बांधण्यात येणाऱ्या लोखंडी जाहिरात फलकाची आवश्यकता नाही. असे काहीही सूचित केले आहे.
————————————————–