कात्रजच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण करणारे कात्रजचे सुपुत्र नमेश बाबर
प्रतिनिधि:- रफीक शेख पुणे

कात्रज, दि २१ (रफिक शेख) : कात्रजच्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषण करणारे कात्रजचे सुपूत्र नमेश बाबर हे जनतेसाठी प्राण त्यागाला लावणारे नेतृत्व असून गेली चार दिवस झाले अन्न पाण्याचा त्याग केला असून जनतेच्या विविध मागण्या प्रशासनाकडून मान्य करून घेण्यासाठी उपोषणाला बसले आहेत.
यावेळी रूपालीताई चाकणकर यांनी प्रशासकीय अधिकारी वर्गाशी कात्रजच्या विविध समस्यांबाबत चर्चा केली असून स्वःत आयुक्त नमेश बाबर यांच्याशी विविध मागण्यांवर सविस्तर बोलण्यासाठी कात्रजला येत असल्याचे सांगीतले.
मल्टि जिनियसचे एम. डी. व समाजसेवक फिरोजभाई शेख यांनी मुस्लिम समाजाकडून समस्या मांडल्या, ते म्हणाले मुस्लिम समाजाचा नमेश बाबर यांना उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच पाठींबा आहे. शिवाय कात्रज चौकातील वारंवार होणा-या अपघाताचा प्रश्न, शहर आणि परिसरातील पाण्याचा प्रश्न आदि अडचणी मांडून मुस्लिम समाजातील दफनभुमीला रस्ता नसल्याने पावसाळ्यात एखादे मयत कब्रस्तानमध्ये घेऊन जाताना तारेवरची कसरत करावी लागते. शिवाय भागातील पंचक्रोशीसाठी एकच कब्रस्तान असल्याने अडचणीस सामोरे जावे लागते त्यासाठी रस्ता बनवण्याबाबत समाजाकडून आपले मत मांडले.
संबंधित आमरण उपोषण हे स्वःतासाठी नसून जनतेसाठी आहे तरी प्रशासनाने नमेश बाबर यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अशी विनंती केली.
तसेच यावेळी नमेश बाबर यांनी दफनभूमी रस्ता मंजूरीचे पत्र आम्ही लवकरच मुस्लिम बांधवाच्या हातात देणार असल्याचे सांगीतले असून अल्लाहकडे आमच्यासाठी दुवाँ करण्यास मौलानांना सांगीतले.
यावेळी दत्ताभाऊ धनकवडे, सरपंच, भागातील पदाधिकारी, महिला भगिनी, ग्रामस्त मुस्लिम समाजातील मशीदीचे ट्रस्टी तसेच मौलाना शकिल देशपांडे, नासीर शेख,रेहान शेख,फारूक वाईकर, बंदेनवाज मुल्ला, ईस्माइल शेख, मौलाना साजिद पटेल, सलिम मुल्ला, तौसिफ, नासिर, रमजान शेख, आदि मुस्लिम समाज सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होता.