साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची हुल्लडबाजी विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रमक…..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची हुल्लडबाजी विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेना आक्रमक…..
सातारा दि: सातारा शहर परिसरात पोलिसांनी खूप मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे संकेत दिले. तरी ही पेन्शनर्सचे गाव असलेल्या सातारा शहरात मोती चौक परिसरात श्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत काही युवकांनी नशापान केले . परवानगी नसतानाही गुलालाची उधळण केली. महिला व मुलींच्याकडे पाहून हातवारे केले. या हुल्लडबाजी विरोधात ऑल इंडिया पॅंथर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी कडक कारवाईसाठी सातारा पोलीस दलाकडे निवेदन दिले आहे.
सातारा शहर परिसरात श्री गणेश विसर्जन दिवशी गुलाल उधळण्यास परवानगी नाही . पोलीस बंदोबस्त असूनही नशापान केलेल्या काही युवकांनी गुलालाची उधळण केली तसेच बुडी का बाल खाद्यपदार्थ विकणाऱ्या व फुगे विक्रेत्यांचे नुकसान केले. एवढेच नव्हे तर नशापान करून ट्रॅक्टर वर नाचकाम केले. यामुळे कायदा धाब्यावर बसवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.
सातारा पोलीस अधीक्षक व पोलीस यंत्रणेने दिलेल्या आदेशाचे पालन करून सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहून तातडीने कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आलेली आहे. या मागणीचे निवेदन सातारा पोलीस अधीक्षक कार्यालय व शाहूपुरी पोलीस ठाणे यांना देण्यात आलेले आहे. साताऱ्यातील श्री गणेश उत्सव व गणेश चतुर्दशी दिवशी शांततेत व आनंदाने सण साजरा व्हावा. यासाठी पोलीस यंत्रणा व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते व स्वयंसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत .
या परिश्रमाला गालबोट लावण्याचा प्रकार काही हुल्लड बाजी करणारे युवक करत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई झाली तर खऱ्या अर्थाने कायदा व सुव्यवस्था राखण्यास सातारा पोलिसांना यश मिळाले. असे अधोरेखित होणार आहे. त्यामुळे परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी करून संबंधित हुल्लडबाजी करणाऱ्या संबंधित व्यसनी युवकांवर कारवाई करून प्रसारमाध्यमाला त्याची माहिती द्यावी. अशीही मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री आदित्य गायकवाड व कार्यकर्त्यांनी केलेली आहे. याबाबत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न प्रशासन व पोलीस यंत्रणे जाणीवपूर्वक केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा साताऱ्यातील शांतता प्रिय नागरिकांनी दिलेला आहे. असेही कळविनेत आले आहे.