वैजापूर:-संस्कृती टिकविण्यासाठी मुलांवर संस्कार करने गरजेचे – ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पवार
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे मराठवाडा संघटक
RPS STAR NEWS
संस्कृती टिकविण्यासाठी मुलांवर संस्कार करने गरजेचे –
ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पवार
दैनिक समर्थ गांवकरी व साहित्यपुष्पच्या वतीने अभिनव उपक्रमाची सुरूवात.
वैजापुर-
मोबाईलमुळे लोप पावत चाललेले संस्कार टिकवून ठेवण्यासाठी व भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी लहान मुलांवर संस्कार करने खुप गरजेचे आहे. असे प्रतिपादन ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पवार तलवाडेकर यांनी केले.
भादली (ता वैजापूर) येथे अखंड हरिनाम सप्ताह निमीत्ताने संपादक डाॅ.विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाने दैनिक समर्थ गांवकरी व साहित्यपुष्प यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या हरिपाठ मुखपाठ स्पर्धेतील गुणवंत विद्याथ्याचा सन्मान सोहळा प्रसंगी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पवार, साहित्य पुष्पचे संपादक दुर्वास काळे, दैनिक समर्थ गांवकरीचे जिल्हा प्रतिनिधी कुंडलीक वाळेकर, दैनिक देशोन्नलीचे पत्रकार तैमूर सय्यद् ,कृषीवार्ताचे संपादक मिनानाथ सोनवणे,कवी अशोक गायकवाड, रेश्मा वाळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रथम विद्यार्थांना वारकरी ड्रेस, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज म्हणाले की, हरिपाठ मुखपाठ स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला हि काळाची गरज आहे. भादली गावाने सर्वासाठी एक आदर्श घालून दिला आहे. कारण मोबाईलच्या वापरामुळे मुले संस्कार विसरत चाललेत
आणि संस्कार विसरल्यामुळे त्याचे अनेक विपरीत परीणाम समाजावर होतांना आपण पाहतो आहे. मुलांना या वयात जे संस्कार मिळायला पाहिजे ते मिळत नसुन त्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार होणे खुप गरजेचे आहे. त्यासाठी याठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्याथ्याना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. आणि प्रत्येक गावात अखंड हरिनाम सप्ताहांमध्ये भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, हरिपाठ मुखपाठ स्पर्धा आयोजित करने गरजेचे आहे. कारण मुलांना मार्गदर्शन खुप महत्वाचे असते. मार्ग दाखवुन दिला की मुले आपोआप यामार्गाने जात असतात आणि आज याठिकाणी दैनिक समर्थ गांवकरी व साहित्यपुष्प समुहाच्यावतीने एक चांगला उपक्रम राबविला त्यांचेही कार्य कौतुकास्पद आहे. याप्रसंगी उत्तम दादा सोनवणे, बाळनाथ सोनवणे, सुनिल सुर्यवंशी, श्रावण थेटे, धनराज राठोड, एन.डी.मगर (तलवाडा) बाबासाहेब सोनवणे, विजय भोसले, जगन्नाथ सोनवणे, वाल्मीक सोनवणे, काकासाहेब सोनवणे, राजाराम निकम, पांडुरंग निकम, ज्ञानदेव सोनवणे, मिननाथ जाधव, रामभाऊ सोनवणे ,लक्ष्मण सोनवणे, प्रभाकर निघु, आनंदा भोसले, सुर्यमान सोनवणे, दिनेश सोनवणे, साहेबराव जाधव, मिननाथ सोनवणे, लताबाई सुर्यवंशी, मंगल सोनवणे, विमलबाई सोनवणे, यासह ग्रामस्थ ,महिला व भाविकंची मोठ्या संख्येने उपस्थित होते.