राहाता- नांदुर्खी बु.समस्थ गावकरी म्हणून पाटाच्या कडेला असलेल्या गावच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण लवकरात लवकर काढावे यासाठी पत्रकार वसंत काळे यांचे ग्रामपंचायतला निवेदन.
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
RPS STAR NEWS
राहाता- नांदुर्खी बु.समस्थ गावकरी म्हणून पाटाच्या कडेला असलेल्या गावच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण लवकरात लवकर काढावे यासाठी पत्रकार वसंत काळे यांचे ग्रामपंचायतला निवेदन.
राहाता: – नांदुर्खी बु.गावामधे पाटाच्या कडेला समस्थ गावकरी म्हणजेच सर्वांची जमीन आहे.आणी त्या जमिनीवर एका बाहेरील गुंठे बहाद्दराने समस्थ गावकरी जमिनीच्या शेजारी शेतजमिनीचा एक गुंठा हा चुकीच्या पद्धतीने खरेदी करून म्हणजेच तुकडा बंदी कायद्याचे उलंघन करून त्यात घर बांधले.समस्थ गावकरी जमिनीवर शेडनेट कापड लावून जेवढी जागा शेजारी खरेदी केली आहे त्यापेक्षा जास्त गावकरी जमिनीवर अतिक्रमण केले आहे.ग्रामपंचायतलाही ही बाब माहित आहे तरी ग्रामपंचायत या गोष्टीकडे का कानाडोळा करते काहि समजायला मार्ग नाही.जर तो व्यक्ती ग्रामपंचायतच ऐकत नसेल तर त्यावर गावची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करावा किंवा तो व्यक्ती ऐकत नसेल तर पन्नास हजार रूपये दंड आकारून तसा मासिक मिटिंगचा ठराव करावा किंवा ग्रामसभेचा ठराव करून तो बोजा त्याचा घर पट्टीवर चढवावा अथवा रोख स्वरूपात वसुल करावा.तसे ग्रामपंचायतला अधिकार आहेत.ग्रामपंचायत जर लोकांच्या खाजगी गावठाण हद्दीतील घरांच्या जागा साफ करू शकते. आणि त्यासाठी वेळ ग्रामपंचायतला मिळू शकतो.मग गावची जमीन काय बाहेरील लोकांना वाटून देण्यासाठी राखीव ठेवली आहे का? उपसरपंच पद निवडीसाठी रात्रंदिवस मीटिंगा घ्यायला जे निवडून आलेत त्यांना वेळ मिळतो.पण गावची जमीन अतिक्रमण मुक्त करायला कोणी एवढ मन लावून काम करताना दिसत नाही.मग आपण काय फक्त नावामागे ग्रामपंचायत सदस्य म्हणून लावण्यासाठी निवडणूक लढवत असतो का? गावची जबाबदारी आपल्यावर निवडून आल्यावर असते.लोकांच्या अपेक्षा असतात त्याप्रमाणे त्या सोडवण्यासाठी काम करावे लागते…आणि माझं अस वैयक्तिक मत आहे की आपण जर गावच्या समस्या आणि गावातील इतर कामे योग्य पद्धतीने सोडवण्यासाठी वेळ देऊ शकत नसेल तर खड्यात गेल ते सरपंच पद,उपसरपंच पद आणि सदस्य पद.काय उपयोग आहे मग आपला…गाव काय पद फक्त कपाळावर मिरवण्यासाठी देत असत का? लोक खूप अपेक्षा ठेऊन निवडून देत असतात.विचार करा मी किती वर्षांपासून गावासाठी काही ना काही करण्याचा प्रयत्न करतो तर गाव मला नाही स्वीकारत.म्हणजे जे गावाने निवडून दिले ते माझ्यापेक्षा खूप चांगले काम करतात म्हणून तर गावाने त्यांना निवडून दिल आहे ना.मग आपण पण त्या विश्वासाने कामे केली पाहिजेत.जे निवडून आले त्यांना अभिमान पाहिजे की लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे.आम्ही तुमच्या पेक्षा खूप मागे आहोत आणि आम्ही आणखी चांगल काय करता येईल की ज्याने लोकांचा विश्वास वाढू शकेल हा प्रयत्न कितीक वर्षांपासून करतोय.तुम्ही खूप नशीबवान आहात की लोकांनी डोळे झाकून तुमच्यावर इतका विश्वास ठेवला.आणि आता तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे की लोकांचा विश्वास जिंकता यावा.बाहेरील लोक येऊन गावाला लुटतायेत आणि आपण डोळे झाकून बसलो तर चालेल का.चांगली कामे करा अतिक्रमन काढा.गावची संपत्ती वाचवा..नक्कीच गावचा विश्वास वाढेल…असे प्रतिपादन पत्रकार वसंत पा.काळे यांनी केले आहे.
९७६७६५३३०९