सातारा:-भारतीय संविधान हे देशाचे प्रतीक- – अजित जगताप, सायगाव
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
भारतीय संविधान हे देशाचे प्रतीक-
– अजित जगताप, सायगाव
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग केला व बौद्ध धम्म स्वीकारला. या पाठीमागे त्या काळची भयानक परिस्थिती कारणीभूत होती. आज तसं पाहिलं तर जगात मानवतेचा संदेश देणाऱ्या युगपुरुषांच्या विचाराचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आज संपूर्ण जगातील मानव जात ही एकमेकांना सहकार्य करून प्रगती करत आहे. जगातील प्रगत देशांमध्ये राष्ट्रप्रेम व मानव प्रेम श्रेष्ठ ठरलेले आहे. धम्म प्रचार करणारे व समाज परिवर्तन घडवणारे विद्वान लोक नसतील तर धर्माला व समाजप्रबोधनाला ग्लानी येते.ज्ञानी माणसाने धर्म ज्ञान सांगितले पाहिजे. त्याप्रमाणे समाज परिवर्तन व प्रबोधन केले पाहिजे. विरोधकांशी वादविवाद करण्यासाठी चुकीचा संदेश देणारे धर्माचा प्रचारक व समाज सुधारक असतील तर धर्माला व समाजाचे खूप मोठे नुकसान होते. या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर अस्मिता जोपासणाऱ्या सर्वच भारतीयांना कायमस्वरूपी संविधान लक्षात ठेवणे गरजेचे झालेले आहे. विशेषता डॉ. आंबेडकर यांच्या अनुयायांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की बौद्ध तत्त्वज्ञान हे संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम घेणारी एक प्रक्रिया आहे. भगवान गौतम बुद्धांनी उत्पत्ती, स्थिती व अंत या विचारांच्या अभ्यास करूनच कर्मकांड, स्त्रोत, धार्मिकतेच्या भ्रमक कल्पना, जातिभेद, अस्पृश्यता उच्चनीचता, गैर पंथाचा त्याग करूनच नवीन पहाट निर्माण केलेले आहे.
आणि त्या अर्थाने भारतीय धम्म म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन देशप्रेम दाखवून दिलेले आहे. आपला भारत देश हा विविध जाती धर्माच्या धाग्याने गुंफलेले आहे. त्यामुळे वैचारिक मतभेद निर्माण होऊ शकतात पण यातूनही त्यांनी मार्ग काढून व्यक्ती स्वातंत्र्य याचा खोलवर विचार करून संविधानाच्या माध्यमातून त्यांचे अधिकार शाबूत ठेवलेले आहेत.
व्यक्ती स्वतंत्र्याच्या मूलभूत तत्त्वाने समता स्वातंत्र्य बंधुत्व कार्य करण्यास मुभा दिलेली आहे. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. हे कधी विसरता येणार नाही.
या महामानवांच्या जयंती निमित्त शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होत आहे. जगभरातील बौद्ध धर्मीय मित्रपरिवार आहे. एवढेच नव्हे तर व्यक्तिगत जीवनातील घडामोडी मध्ये दलित- सर्वसाधारण, मराठा ,ब्राह्मण ,इतर मागासवर्गीय ,अल्पसंख्यांक पददलित कष्टकरी लोकांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या अडीअडचणीला सहकार्य करण्याची भावना ही सर्व जाती धर्मातील युगपुरुषांची शिकवण आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा या ठिकाणी झालेले आहे. त्यांच्या जडणघडणीचा पहिला टप्पा म्हणा किंवा प्रारंभ हा साताऱ्यातून झाल्यामुळे खऱ्या अर्थाने सातारचे नाव जगप्रसिद्ध झालेली आहे. त्याला दोन प्रमुख कारणं आहेत.
एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून आणि दुसरं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राथमिक शिक्षण घेतले ते सातारा हायस्कूल तथा प्रतापसिंह हायस्कूल हे राजवाड्यातच होते .त्यामुळे राजवाडा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नैसर्गिक अतूट नाते आहे. ते कुणालाही विसरता येणार नाही. फलटणच्या निंबाळकर राजे घराण्याने त्याकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या राजवाड्यामध्ये निमंत्रण देऊन बोलवले होते. सन्मान केला होता. त्याची इतिहासात नोंद झालेली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या शेड्युल कार्ड फेडरेशन पक्षातून सातारचे पहिले दलित आमदार खंडेराव सावंत यांना निवडून देण्यासाठी सातारकरांनी सहकार्य केले होते. याचा निश्चितच अभिमान आहे. आजही देशभरातील अनेक आय.ए.एस. आय.पी.एस. व राजकीय मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून प्रगती करत आहेत.
तसं पाहिलं तर अस्पृश्य उद्धार व देश बांधवांचे सर्व हित मानवी मूल्यांचा विकास साधण्याच्या दृष्टीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२० ते १९३५ या कालावधीमध्ये कर्मट हिंदू धर्माचा व अनिष्ट रितीरिवाजाला त्याग करणे. यामध्ये नवीन परिवर्तन घडवून नवीन विचार देण्याचे महान कार्य केले आहे. बौद्ध धम्माच्या आचरणशील वागणुकीने बौद्ध समाजातील अनेक व्यक्ती हे बुद्ध तेथे शुद्ध असे आचरण करत आहेत .आज मानवी जीवनातील अनेक मूल्य बदलत चाललेले आहेत.
फार पूर्वीच्या काळी अस्पृश्य व स्त्रियांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. अस्पृश्यता पाळली जात होती. अलीकडच्या काळामध्ये अस्पृश्यता, वर्णभेद, जातीयता नष्ट झाली आहे. परंतु, काही राजकीय पक्ष आपले हित साधत आहे. याबाबत आता गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. खोट्या धार्मिक कल्पनांच्या परंपरेने जखडलेल्या बाबी आपण नष्ट करतो. तशा पद्धतीने आपण काही गोष्टीचा त्याग करताना नवीन गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे.
भारतीय राज्यघटना ही समता- स्वतंत्र- बंधुत्वावर आधारित आहे. आज या समता- स्वतंत्र- बंधुत्वाचा नारा देत असलो तरी काही प्रमाणात जातीयता व अंधश्रद्धा या दोन गोष्टी आपल्या देशाला न परवडणारे आहेत. आणि यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. म्हणून फक्त एका समाजाला नव्हे तर सर्व समाजाला उद्देशून शिका- संघटित व्हावं- संघर्ष करा असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नारा दिला होता . अस्पृश्यवर ही लाभलेली गुलामगिरी आहे. ही गुलामगिरी तोडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्याची मुहूर्तमेढ ही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभी केली होती. म्हणून तर शाहीर सांगतात. दोनच राजे होऊन गेले. एक त्या रायगडावर… एक त्या चवदार तळ्यावर…. यातून बोध घेणे गरजेचे आहे. महाडच्या चवदार तळ्याच्या पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रणसिंग फुंकले. कायदेशीर न्यायालयात लढा लढून आपले हक्क शाबूत ठेवले . एवढेच नव्हे तर परिवर्तन व सुधारण्याच्या आड येणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. हे दहन म्हणजे जुन्या रुढी टाकून द्या व नवीन परंपरा आत्मसात करा .हा त्यातून उद्देश होता. सर्व जाती धर्मात विखुरलेल्या माणसांना त्यांनी हक्क मिळावा. या भावनेतून १९३० साली नाशिकचे प्रसिद्ध काळाराम मंदिरात प्रवेश करण्याचा प्रदीर्घ सत्याग्रह केला. हा सत्याग्रह चार ते पाच वर्ष सुरूच होता.
अलीकडे संविधानाच्या माध्यमातून अधिकार मिळाले आहेत. पण काही वेळेला या अधिकाऱ्याची अंमलबजावणी होत नाही आणि याचा प्रारंभ काही राजकीय पक्षांनीच केला होता. हे सुद्धा विसरता येणार नाही. जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणून भारतीय राज्यघटना जगप्रसिद्ध झालेली आहे. अनेक क्रांती घडली तशा पद्धतीने भारतात सुद्धा संविधान क्रांतीने मानवाच्या कल्याणाचे निर्णय घेतलेले आहे .पण काही राजकीय पक्ष हे सातत्याने आपल्या फायद्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना धोक्यात आहे. असा अपप्रचार करतात वास्तविक पाहता राज्यघटना सुरक्षित असल्यामुळेच खऱ्या अर्थाने भारतीय नागरिक आपले अधिकार वापरत आहे.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी सांगितले राज्यघटना ही उत्कृष्ट कवच आहे पण त्याचा अंमलबजावणी करणारे जर नालायक निघाले तर ह्या राज्यघटने ला काही अर्थ राहणार नाही. आपण पाहिलं की ७० वर्ष काँग्रेस पक्ष सत्तेत आहे. ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले. त्याच्या निम्म्या वर्ष काँग्रेस विचारधारा सत्तेमध्ये आहे. पण जेव्हा त्यांची सत्ता सर्वसामान्य मतदारांनी बदलून टाकली .त्यावेळेला मात्र त्यांना राज्यघटना आठवू लागलेली आहे. तसं पाहिलं तर इतिहासामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला. हे आपण पाहिले आहे . विधान परिषदेच्या किंवा इतर कोणत्याही निवडणुकीत मताधिक्य असूनही दलित शोषित समाजातील काँग्रेसचे उमेदवार पराभूत होतात. याचे कारण नेमके काय आहे ? हे अजूनही कुणाला समजले नाही. निवडणुकीतील जय-पराजय हा महत्त्वाचा नाही तर आपण सर्वधर्मसमभाव मांडणाऱ्या सर्व समाजातील लोकांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. त्या अर्थाने सर्वच राजकीय पक्ष अपयशी ठरलेले आहे. हे आता अधोरेखित झालेले आहे.
कन्हान (नागपूर) या ठिकाणी झालेल्या लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी आणि रामटेकचे राजू पारवे यांच्या प्रचार प्रचारार्थ कन्हान या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले की राज्यघटना सुरक्षित आहे. एक देश एक राज्य घटना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आम्ही सत्तेत आहोत .असे असताना संविधान धोक्यात आणणे हा वाक्यप्रयोग थोडा बदल करून सांगण्याचे धारिष्ट काँग्रेसने दाखवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृती व विचार यामध्ये खूप मोठा फरक आहे कारण जागतिक पातळीवर ज्या ठिकाणी बौद्ध राष्ट्र आहेत त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा ते अस्मिता म्हणून उपयोग करतात आणि दुसऱ्या बाजूला नवीन संसद भवन चे उद्घाटन करताना आदिवासी राष्ट्रपती महिलना बाजूला केले जाते. यातून काय संदेश जातो ? हे लोकांपर्यंत पोहोचलेला आहे.
आज संविधान ग्रंथ सुरक्षित आहे. तेवढा काही राजकीय पक्ष किंवा विचारधारा संपत चाललेली आहे. हे आता सर्वांनाच मान्य करावे लागेल. सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले- छत्रपती शाहू महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा अशा अनेक युगपुरुषांनी खऱ्या अर्थाने कष्टकरी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी परिश्रम घेतलेले आहेत.
आज लाखोच्या संख्येने भीम अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना एका दिल्याने, एका विचाराने वागत आहेत .काही गोष्टींचा अपवाद असू शकतो. हिंदूंच्या काही रुढीपरंपरा मुळे त्रास भोगाव लागलेला आहे. पण अलीकडची पिढी ही समजूतदार आहे .आज आपण पाहिलं की गटातटाच्या भाऊबंदीच्या राजकारणामुळे अनेक फायदे व तोटे बाजूला करून लोक एकत्र येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा सुद्धा गटातटात विखुरलेले राजकीय पक्ष आहेत. त्यांनी एकत्र येऊन जे काही योग्य व मनाला पटेल अशीच भूमिका घ्यावी. कारण दुसरे सांगते म्हणून ते खरं मानण्यापेक्षा भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहे जे सत्य आहे. तेच अंतिम सत्य असते. ते परिवर्तनशील असते. याचे विचार करणे गरजेचे आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देताना मनस्वी आनंद वाटत आहे. आज देशभर नव्हे तर जगभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती पोहोचलेली आहे. भाजप सरकारने लंडन येथील डॉक्टर आंबेडकर यांचे निवासस्थान हे राष्ट्रीय स्मारक केलेले आहे. हिंदू मिलच्या जागेमध्ये भव्य दिव्य असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक होत आहे. एवढेच नव्हे तर दीक्षाभूमी व चैत्यभूमी हे आता राष्ट्रीय प्रतीक बनलेले आहेत. अशा या महामानवाला विनम्र अभिवादन करून अस्पृश्यता नष्ट झाली आहे .फक्त आता तिचं कव्हर बाकी आहे. हे कव्हरही नाहीशी होईल. अशी अशा व्यक्त करतो. जय भीम,, जय भारत,,,, जय संविधान,,,,——- ( अजित जगताप, सायगाव ता. जावली जिल्हा सातारा.