सातारा:-महायुतीत मोठे मित्र आल्याने आरपीआयच्या नाव कुठेही नाही- रामदास आठवले.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
महायुतीत मोठे मित्र आल्याने आरपीआयच्या नाव कुठेही नाही- रामदास आठवले.
सातारा दि:२०१२ च्या मुंबई महानगर पालिका निवडणुकीत शिवसेनेला मनसेचे राज ठाकरे यांचे मोठे आव्हान असताना आरपीआय पक्षाने मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवून दिली. आता महायुतीला मोठे मित्र आल्याने आरपीआयच्या नाव कुठेही नाही. अशी खंत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
आर पी आय चे मतदार इमानदार आहेत .आर.पी.आय. मध्ये मोठा वर्ग आहे. सर्व राज्यात आर.पी.आय. पोचला असून विधानसभा निवडणुकीत २० ते २५ आमदार निवडून येऊ शकतात. लक्षदीप सारख्या ठिकाणी ६५ हजार मतदारांचा लोकसभा मतदारसंघ आहे. या ठिकाणी पक्षाची ताकद आहे.
काँग्रेस पक्षाची सत्ता असताना दलित पद दलित यांची कामे झाली नाहीत. याउलट नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात कामे झालेली आहेत. मुंबईतील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदु मिलचे स्मारक असो किंवा लंडनचे स्मारक असो ही काम गतीने झालेले आहेत. संविधान बदलणार हे काँग्रेसची अफवा आहे.
आज भारत जोडो अभियान राहुल गांधी राबवत आहेत. त्यांनी भारत जोडण्यापेक्षा काँग्रेस पक्ष जोडण्याचे काम करावे. कारण, काँग्रेस पक्ष सोडून अनेक जण गेलेले आहेत .अयोध्या येथे सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध मंदिर होते. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचीच केंद्रात सत्ता येईल. कारण, महिला आरक्षण बिल, राष्ट्रीय महामार्ग व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास यश आलेले आहे.
दलित ,पद दलित व मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय यांनी काँग्रेसच्या जाळ्यात अडकू नयेत. महायुतीच्या ४५ जागा जिंकतील हा आमचा ओव्हर कॉन्फिडन्स नाही. असेही त्यांनी सांगितले. रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळावा. यासाठी आमचा प्रयत्न आहे .सातारा जिल्हा नियोजन मंडळावर अशोक गायकवाड यांची वर्णी लागावी अशी सूचना शंभुराज देसाई यांना केले असून सुरुवातीच्या काळात नाव नाही. मात्र, महामंडळ संचालक पद मिळावे .अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षण दहा टक्के दिलेले आहे .आता मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची भाषा करू नये. राज्य सरकारच्या या निर्णयाबाबत न्यायालयाची याचिका दाखल केली आहे. या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले न्यायालयात उत्तर दिले जाईल. आरक्षण मिळवण्यासाठी आठ लाख रुपये ज्यांचे उत्पन्न आहे त्यांनाच आरक्षणाचा लाभ मिळतो . असेही त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला आर.पी.आय. कार्यकर्त्यांनी नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. त्यामुळे काही पत्रकार जागा शोधत होते. अखेर जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी सूचना केली. त्यानंतर पत्रकारांना जागा मिळाली. या पत्रकार परिषदेला महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे, आप्पासाहेब गायकवाड ,अण्णा वायदंडे, संतोष भालेराव, कुणाल गडांकुश, प्रतीक गायकवाड, विशाल गायकवाड तसेच रोकडे ,डॉ. संपतराव कांबळे, आप्पा तुपे, सतीश रावखंडे आधी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते भूमी शिल्प या साप्ताहिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
—————-&&&—————-
सातारा येथील रामदास आठवले यांच्या पत्रकार परिषदेतील मान्यवर (छाया निनाद जगताप ,सातारा-)