मायणी:-माण_ खटाव चा दुष्काळी कलंक मी कायमचा पुसणार_____आमदार जयकुमार गोरे.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
माण_ खटाव चा दुष्काळी कलंक मी कायमचा पुसणार_____आमदार जयकुमार गोरे.
मायणी येथे भव्य शेतकरी मेळावा. मायणी प्रतिनिधी—कायम दुष्काळाचं ओझं खांद्यावर घेऊन जगणाऱ्या माण खटाव तालुक्यात सध्या जिहे कटापूर उरमोडी, तारळी इत्यादी योजनांची पाणी उपलब्ध होत असून सध्या चार कारखाने सुरू आहेत व पाचवा कारखाना सुरू होण्याच्या मार्गावर आहे विरोधकांनी कधीही पाण्यासाठी आणि विकास कामासाठी संघर्ष केला नाही त्यांनी रस्ते पाणी याचा कधीही विचार केला नाही फक्त माझा पराभव करणे हा एकमेव अजेंडा ठेवला गेल्या निवडणुकीत माझा पराभव करण्यासाठी 28 कार्यकर्ते एकत्र आले पण मी त्यांचा या मायबाप जनतेच्या जीवावर करेक्ट कार्यक्रम केला यापुढे मी माण खटावचा लागलेला दुष्काळी कलंक पुसणार आहे असे ठोस प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे यांनी मायणी येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना केली या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर दिलीपराव येळगावकर होते तर खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, व युवा मोर्चा अध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, वडूज नगराध्यक्ष सो मनीषा काळे, रघुनाथ घाडगे, मेघाताई पुकळे, सुरज पाटील, मानसिंग देशमुख, विशाल बागल, प्रचार प्रमुख सोमनाथ भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी जाफिरभाई नदाफ यांनी प्रास्ताविक करून उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पहार देऊन स्वागत केले यावेळी मायणी परिसरात नव्याने सुरू केलेल्या 18 कोटी रस्त्याच्या विकास कामाचे उद्घाटन धुमधडाक्यात झाले. माढ्याचे खासदार रणजीत सिंह निंबाळकर म्हणाले जयकुमार गोरे यांच्या कामाच्या झंजावातामुळे विरोधक निस्तेज झाले आहेत केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक पाणी योजना, एमआयडीसी अशी अनेक कामे मार्गी लागली आहेत जि हे कटापूर योजनेसाठी स्वतः पंतप्रधान येणार आहेत असे त्यांनी सांगितले यावेळी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा अभिनंदनचा ठराव करण्यात आला यानंतर झालेल्या भाषणात धैर्यशील कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला नंतर झालेल्या भाषणातडॉक्टर दिलीपराव येळगावकर म्हणाले दोन गुन्ह्यामध्ये जामीनावर सुटलेल्या माणसांनी माझी मापे काढू नयेत मायनी जिल्हा परिषद गटात चुकीची प्रवृत्ती जन्माला आल्याने हा गट पंचवीस तीस वर्षे मागे गेला आहे टेंभूचे पाणी मायणी तलावात मी आणले व मायणीसाठी 24 बाय सात ही योजना मीच आणली आहे मात्र विरोधक दिशाभूल करत आहेत योग्य वेळ आल्यानंतर विरोधकांना चोख उत्तर दिले जाईल असे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास मायणी जिल्हा परिषद गटातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी राजाराम कचरे यांनी आभार मानले.