श्रीरामपूर:-छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह ( शिवपुतळा ) बसवीने व ” श्रीरामपूर जिल्हा ” घोषीत करावा हया मागणी करीता विराट मोर्चा.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
RPS स्टार न्यूज : –
छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह ( शिवपुतळा ) बसवीने व ” श्रीरामपूर जिल्हा ” घोषीत करावा हया मागणी करीता विराट मोर्चा.
श्रीरामपूर शहरातील आझाद मैदान येथून मोर्चास सुरूवात झाली. सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथुन निघुन मेनरोडमार्गे -भगसिंगचौक- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, गिरमे चौक, तुळजाभवानी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी पुतळा मार्गे श्रीराम मंदिर चौकात आला. श्रीराम मंदिर चौकामध्ये मोर्चाचा समारोप करण्यात आला. यावेळी सरकारचे व प्रशासनाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) “श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले
यावेळी नगर जिल्हयाचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नविन जिल्हा होणार नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होवू देणार नाही असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रताप (नाना) भोसले यांनी सांगितले. तर शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावाने म्हणजेच “श्रीरामपूर” हया नावाने भारतात जिल्हा अस्तित्वात नाही. तरी हिंदुस्थानातला श्रीरामांच्या नावाचा पहिला जिल्हा होण्याचा मान श्रीरामपूरला मिळावा.
या विराट मोर्चात श्रीरामभक्त-शिवभक्त, व्यापारी, वकील, इंजिनियर, कामगार, राजकीय नेतेमंडळी, पदाधीकारी यांच्यासह शिवप्रहारचे मावळे प्रचंड मोठया संख्येने सहभागी झाले होते.