नांदूर्खी बु.ग्रामपंचायतचा नविन इमारतीच्या उदघाटना आधीच गावकार्यांना कशाने काय शिक्षा होईल याचे बोर्डाचे दर्शन पहावयास मिळत आहे.प्रहारची लवकरात लवकर बोर्ड काढून टाकण्याची ग्रामपंचायतकडे मागणी.
प्रतिनिधी:- वसंत काळे :- 9767653309

नांदूर्खी बु.गावात नविन ग्रामपंचायत इमारतीचे काम झाले आहे.या कार्यालयाचे अजुन उद्घाटनही झालेले नाही.जनतेचे कामेही शुन्य.अशी अवस्था नांदूर्खी बु. गावची झालेली जनतेला पहायला मिळत आहे.अजुन ग्रामपंचायतचे स्थलांतरही झालेले नाही.कामही अजुन खुप बाकी आहे.पण जनतेला धमकी देणारा फलक मात्र सर्वात अगोदर कार्यालयात लावलेला दिसतो.म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय काय जनतेला धमकी देण्याचे केंद्र आहे का.जनतेने समस्या मांडायच्या नाहित का.जनता काय ग्रामपंचायतची गुलाम आहे का.उलट ग्रामपंचायतच जनतेची नोकर असते.जनता तीचे मालक आहेत.आणि तुम्हाला काय जनतेने असे बोर्ड ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यासाठीच निवडून दिलेले असते का.लोकांसाठी काय काय योजना येतात त्याचे बोर्ड ग्रामपंचायतने कार्यालयात लावणे गरजेचे आहे.लवकरात लवकर जर हा बोर्ड ग्रामपंचायतने काढून टाकला नाही तर प्रहारच्या पद्धतीने आम्ही काय करायचे ते करु.जनतेच्याच जोरावर निवडून यायचे आणि जनतेच्याच विरोधात कोणते कायदे आहेत याचे बोर्ड कार्यालयात लावायचे हा सामान्य जनतेला कोणता न्याय.ही कोणती लोकशाही आहे.हा जिथे चुक आहे तिथे लोकांना नोटिस द्या ना.आणि तिथे लोकांना सुधारणा करायला सांगा.ते काही मतदानसाठी करणार नाही . लोकांनी ग्रामपंचायतचा कारभार कसा चाललाय ही माहिती घेऊ नये म्हणून असे हुकुमशाहीचे बोर्ड लावले जातात.म्हणजेच काहितरी चुकीचेच कामे होत असतील.म्हणून तर अशा बोर्डची अधिकार्यांना गरज वाटत असेल.मुळात असे बोर्ड लावण्याचाच अधिकारच ग्रामपंचायतला नाही.मग हा काय मनमानी कारभार कशाच्या जोरावर चाललाय.जिथून ग्रामपंचायतचे सूत्र हलतात ते तहसिल कार्यालय तिथे सुद्धा अश्या प्रकारचे कोणतेही कृत्य आपल्याला पहायला मिळनार नाही.आणि मग इकडे काय पाकिस्तानचा भाग आहे का.लोकांनी जरा विचार करा.लवकरात लवकर तो बोर्ड काढून फ़ेका नाहीतर आम्ही काढून फेकू. असा इशारा प्रहारने दिला आहे